परमेश्वर

  



'हे परमेश्वरा वाचावं रे ह्या संकटातून', 'हे परमेश्वरा ह्या जगाला ह्या संकटातून मुक्त कर' सर्वांच्या मुखात हि विनवणी सरत्या वर्षात होती. संकटांच्या वर्षात खूप काही झालं, जाणवलं पण सर्वात जास्त जाणवलं ते परमेश्वराचं अस्तित्व.  जाणाऱ्या वर्षात हा परमेश्वर वेगळ्या वेगळ्या रूपात दिसला किंवा बघितला आणि माणसाने जगण्याची भाषाच बदलली.

आप्तस्वकीयांचं महत्व, नातेसंबंधांचा ओलावा, मैत्रीचा आधार आणि जगण्याचा अर्थ ह्या दिवसात विशेष करून जाणवला. परिस्थितीने पैश्यांचा आणि माणुसकीचा एकमेकांशी असलेला सलोखा माणसाला शिकवला. जगतांना माणसाने स्वतःला अनेक बंधनांमध्ये अडकवून घेतल्यामुळे स्वतःच जगणं विसरल्याचं या काळात प्रामुख्याने जाणवलं.

ह्या वर्षात आपला श्वास अजूनही सुखरूप चालू आहे यातच सर्वानी परमेश्वराचे धन्यवाद मानले. या वर्षात आपण माणूस आहोत आणि माणसाला परमेश्वराची गरज आहे. ह्या जगात कोणीही व्यस्त नसत, माणसाने स्वतःच वेळापत्रक त्याच्या पद्धतीने व्यस्त करून घेतल्याचं सर्वाना जाणवलं आणि संकट कोणावरही येऊ शकत हे सर्वानी अनुभवलं. कितीही अवघड परिस्थिती ओढवली तरी त्यातून सावरता येत आणि त्या प्रत्येक क्षणात परमेश्वर मार्ग दाखवतो. 

नेहमीच प्रत्येक क्षणाला आपण परमेश्वराला आठवत असू पण या वर्षात त्याच्या अस्तित्वामुळे आपण सुखी आहोत ह्याची जाणीव नक्कीच झाली. वर्ष संपताना खूप काही झालं पण आपण जगलो ते परमेश्वराच्या प्रेमामुळे. हे वर्ष जातांना खूप काही शिकवून गेलं आणि माणसाचं आयुष्य बदलवून गेलं. 

माणसाने जीवन जगत असताना आपल्या जवळील प्रत्येक माणूस जपावा आणि परमेश्वरावर आपली श्रद्धा निस्वार्थपणे ठेवावी  हीच ह्या वर्षाची शिदोरी आयुष्यभरासाठी माणसाला भेटली. जाणाऱ्या वर्षाचे आभार मानत येणाऱ्या वर्षात परमेश्वराची कृपादृष्टी अशीच राहो हीच सदीच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

सत्ताधीश

 


"दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.." ह्या गीताच्या ओळींना कायमस्वरूपी सार्थ ठरवणारा महाराष्ट्रातील राजकारणी म्हणजे श्री.

शरद पवार साहेब. दिल्लीत कोणाचीही सत्ता असो शेवटी त्यांना म्हणावं लागत कि "आम्ही पवारसाहेबांचे हात धरून राजकारणात आलो". इतिहासापासून महाराष्ट्राच्या भूमीने दिल्लीच्या सत्तेची लगाम आपल्या हातात ठेवली आणि त्याच ऐतिहासिक वारशाला आजतागायत मोठ्या दिमाखाने पुढे नेणारे पवार साहेब. 

वयाची ८० वर्ष पूर्ण करणाऱ्या पवार साहेबांनी आयुष्याची ५० वर्ष महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात यशस्वीरीत्या घालवलीत. वयाच्या ३७ व्या वर्षी सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या पवार साहेबांनी महाराष्ट्र सारख्या प्रगतिशील राज्याचं चार वेळा मुख्यमंत्री पद सांभाळलं. राजकारणात असतांना ७ वेळा आमदार, ७ वेळा खासदार म्हणून प्रतिनिधित्व  केलं. केंद्रात १० वर्ष संरक्षणमंत्री आणि कृषिमंत्री सारख्या महत्वाच्या पदांना सन्मानानं भूषवलं.

राजकारणात असतांना काँग्रेस पक्षातून सुरवात करून पुलोद सारखी आघाडी उभारण्याचा यशस्वी प्रयत्न केला. राजकारणातील काँग्रेस नेतृत्वाला विरोध करून स्वपक्षाची "राष्ट्रवादी काँग्रेस" म्हणून निर्मिती केली.

राजकारणाबरोबर खेळात बिसिसिआय बरोबर आंतरराष्ट्रीय आयसीसीआय ह्या क्रिकेट संघटनेचं यशस्वी नेतृत्व केलं. कुस्ती, कब्बडी सारख्या मातीतल्या खेळांचं नेतृत्व करतांना त्यांना जागतिक स्थरावर नेण्यात महत्वाची भूमिका घेतली. उद्योगक्षेत्र असो वा शेती प्रत्येक क्षेत्रात अभ्यास करून देशाच्या विकासात योगदान दिल.


पवार साहेब कधीच कुणाला समजले नाहीत, कारण पवार साहेब कुठलंही वक्तव्य करतात त्याचा राजकीय पटलावर मोठा परिणाम होतो. राजकारणाचा नवा अध्याय लिहितांना राजकारणातील प्रत्येक शैलीला नवा आकार देत आपलं राजकीय अस्तित्व कायमस्वरूपी अबाधीत ठेवलं. राजकारणात पवार साहेब काय निर्णय घेतील हे स्वतःला राजकारणातले चाणक्य समजणार्यांनाही पवार साहेब कधी समजले नाहीत म्हणून 'महाविकासआघाडी' सारखा नवा प्रयोग करण्यात ते यशस्वी झालेत. 

महाराष्ट्राचं मराठी माणूस म्हणून प्रंतप्रधान होण्याचं स्वप्न पवार साहेबांच्या माध्यमातून होण्याची आशा कदाचित पवार साहेबाच्या काँग्रेस सोडण्याच्या निर्णयामुळे अधुरी राहिली. महाराष्ट्र मातीला दिल्लीत आणि जागतिक स्थरावर सन्मानाने नेणाऱ्या श्री. शरद पवार साहेबांचा मराठी माणूस म्हणून नक्कीच अभिमान आहे. महाराष्ट्राचं राजकीय वर्चस्व नेहमी अबाधीत ठेवणाऱ्या सत्ताधीश शरदचंद्र पवार साहेबांना ८० व्या वाढदिवशी अनेक शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...