मोलकरीण ..


संसारातील थोडी जवळची झालेली व्यक्ती. हातावर पोट असणारी हि व्यक्ती आपला संसार करतांना दुसऱ्याच्याही संसाराला हातभार लावते. स्वतःच्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुसऱ्याच्या घरी धुणीभांडी करते. कुठलीही मनात भीती न ठेवता एका अनोळखी परिवारासाठी काम करणारी व्यक्ती म्हणजे मोलकरीण.

कोरोनाच्या संकटात आपल्या संसाराचा गाडा ओढण्यासाठी दुसऱ्याच्या घरी कामाला जाणारी हि माउली आज घरीच आहे. लॉक डाऊन चालू झाल्यानंतर सोसायटीच्या वॉचमनने तिला गेटवरच थांबवलं. झालेल्या कामाचे पैसे घेण्यासाठी ती आली होती. आपल्या कष्टाचा पैसा मिळेल पण पुढे काम असेल नसेल ह्याची चिंता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. तिची ती चिंता हेरली आणि अजून पैसे लागत असतील तर सांगा असं विचारलं. ती गरीब माऊली आपसूकच बोलली "नाही जितकं काम केलं तितकेच द्या". गरीब कष्टाळू माणूस किती संतुष्ट असतो त्याची जाणीव झाली. ती नाही म्हंटल्यावर तिला स्वतःहून बोललो "पुढचे काही दिवस कामावर येता येणार नाही तरी तुम्हाला पैसे लागले तर सांगा". माझे बोल संपत नाही तितक्यात तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसला, जणू तिला पैसेच भेटलेत अशी भावना दिसली.

अगदी आठशे नऊशे रुपयांसाठी स्वतःचा संसार चालवून दुसऱ्याच्या घरी काम करणारी स्त्री म्हणजे रनरागीणीच. लोकांच्या वेळेनुसार आपल्या संसाराची सांगड घालणारी हि माउली आपल्या रोजच्या वेळेचं नियोजन प्रभावीपणे करते. तिच्यातील कामाचं कौशल्य, चिकाटी जणू ती स्वतःच्या घरातच काम करते तसंच असत.

कोरोनाच्या संकटात लॉक डाऊन वाढला आणि तिचंही आर्थिक संकट वाढत गेलं. न राहता ती पैसे घेण्यासाठी सोसाईटीच्या गेटवर आली. हातावरच पापी पोट तिला इथपर्यंत घेऊन आलं होत. तिला एका महिन्यांचे पैसे दिलेत आणि पुन्हा पैसे लागतील तर सांगा असंही सांगितलं. पण पुढच्या महिन्यात ती स्वतःच आली नाही. जणू तिने आहे त्याच पैश्यात उदरनिर्वाह करण्याचं शिकून घेतल्याचं जाणवलं.

आपल्याकडे कामाला येणाऱ्या मोलकरणीचे माणूस म्हणून मोल करा आणि संकटाच्या काळात त्या माऊलीला संसारासाठी मदत करा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

पक्षनेता विरोधातला...



कोरोनाच्या संकटात अनेक गोष्टी सर्वांना बघायला भेटल्या. महाराष्ट्राच्या राजकारणाने पण खूप काही घडामोडी बघितल्या. सत्तेत नसणारे काही पक्ष सत्ताधारी सरकारला राजकारण बाजूला सारून मदत करतांना दिसले. कुठे लोकांची मदत तर कुठे प्रशासनाची मदत सगळं काही वेगळं दिसतांना विरोधी पक्षनेता मात्र राजकारणात गुंतल्याच वेळोवेळी दिसून आलं.

आज विरोधी पक्षनेत्यांची सोसिअल मीडियावर पोस्ट बघितली. मुंबईतील सायन येथील रुग्णालयात एका कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृतदेह दुसऱ्या रुग्णाच्या बाजूला असल्याचा विडिओ सगळीकड़े प्रसारित झाला. ह्याबद्दल सरकारला सूचना करण्याची हि पोस्ट होती. आज दिवसभराचा कार्यकाळ बघितला तर सर्व राजकीय पक्षातील नेत्यांची कोरोनाच्या संकटासंदर्भात बैठक झाली आणि त्यात ह्या विषयावर संक्षिप्त चर्चाही झाली. आरोग्यमंत्र्यांनी त्यावर सत्यताही माध्यमांसमोर सांगितली. एका परिपक्व नेत्यांनी हा सगळा घटनाक्रम बघता किंवा परिस्थितीच गांभीर्य बघता अशी पोस्ट करणं शोभनीय नव्हतं. कदाचित त्यांच सोसिअल माध्यमांवर ट्रोलिंग होण्याचं हेच कारण असू शकत.

कोरोनाच्या संकटात विरोधी पक्षाची भूमिका हि विरोधाची न ठेवता प्रतिमुख्यमंत्री म्हणून असणं सामान्य जनतेच्या हिताचं होत. अगदी छोटयाछोट्या गोष्टींसाठी राज्यपालांना ह्या संकटाच्या काळात अनेक वेळा भेटणं हे तितकस योग्य नव्हतं. ह्या घडामोडीत राज्यपाल हे पद निपक्षीय असत, ह्याच संविधानिक तत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतांना दिसलं. जेव्हा जनतेवर संकट येत तेव्हा पक्षीय भेद नसावा हि माफक अपेक्षा कोणाचीही असते. शेवटी ह्यात राजकारण हे श्रेयाच गणित असत, असं म्हंटल तर वावग ठरणार नाही.

कोरोनाच्या संकटात राज्याला पैश्यांची गरज असतांना अनेक लोकांनी मुख्यमंत्री निधीत पैसे जमा केलेत. पण राजकीय बुद्धिमत्तेमुळे विरोधी पक्षाने आपले पैसे पंतप्रधान निधीत देऊन आपण ह्या संकटात राज्याचा विचार कितपत करतोय हे दाखवून दिल. ह्या राजकारणाला सोसिअल मीडियावर खोचकपणे संबोधण्यात आलं "पैसे दिल्लीला आणि सल्ला राज्याला". कदाचित सद्यपरिस्थिती हेच सत्य समोर दाखवतेय..

राज्यातील विरोधी पक्षनेता हा मुख्यमंत्री ह्या पदाइतका समान असतो. ह्या संकटात ती परिपक्वता एका जाणकार नेत्याने दाखवणं महत्वाचं होत. पुरोगामी महाराष्ट्राला अशा राजकारणाचा इतिहास नसतांना हे घडत असल्याचं बघून पराक्रमी महाराष्ट्राचं हे दुर्दैव समजावं का? हाच प्रश्न सामान्यांच्या मनात येतो...

सद्य परिस्थिती बघता परमेश्वर सर्वांना सदबुद्धी देवो आणि माझ्या महाराष्ट्राला ह्या संकटातून लवकर मुक्त करो हीच प्रार्थना.

डॉ. प्रशांत शिरोडे.

कणखर देशा ..



महाराष्ट्र दिन आमच्या काळजाच्या अभिमानाचा दिवस. महाराष्ट्र भूमी आज संकटाच्या काळात मोठ्या अंधारातून जात आहे. हि भूमी संकटात सुद्धा मोठ्या धीराने उभी आहे. कोरोनाच्या संकटात देशात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहे. कणखर बाणा असल्यामुळे ह्या संकटाला मोठ्या प्रयत्नांनी हि भूमी लढा देत आहे. महाराष्ट्र भूमीत सर्वात जास्त परदेशातून येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या असल्यामुळे हा आकडा जास्त आहे.

महाराष्ट्र भूमीला अनेक प्रांत आहेत त्यात कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र. प्रत्येक प्रांताची आपली विविधता आणि बोलीभाषा आहे. महाराष्ट्रात दक्षिण आणि उत्तर दोन्ही भारतीय प्रदेशातील पदार्थ बनविले जातात. भारतातील सर्व सण महाराष्ट्रात साजरे केले जातात. महाराष्ट्राला अनेक गोष्टीत विविधता आहे आणि त्या विविधतेत इतर राज्यांनीही विविधता मोठ्या मानाने सामावून घेणारा माझा महाराष्ट्र. माय मराठी बोलीभाषेच्या मधुर शब्दांनी बहरलेला सदाबहार महाराष्ट्र.

इतिहासाची परंपरा महाराष्ट्राला जितकी लाभली तितकी इतर राज्यांना लाभली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गर्वाचा इतिहास ह्या भूमीला लाभला. शौर्याच्या भूमीला इतिहासाबरोबर भूगोलही तितकाच दिमाखाचा लाभला. ह्या भूमीला डोंगरदऱ्यांच्या सह्याद्री, अखंड महासागराचा अरबी, सपाटीच्या प्रदेशाचा कास पठार, निसर्गाची किमया असलेला कोकण, कोळशाची खान असलेला विदर्भ अश्या अनेक रत्नांची नैसर्गिक देणगी लाभली आहे.

महाराष्ट्र भूमीला साधू संतांची एक अदभूत परंपरा लाभली आहे. संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वरांचा वारसा ह्या भूमीला लाभला आहे. ह्याच भूमीत १२ ज्यातिर्लिंगापैकी चार ज्योतिर्लिंग आहेत. सहकार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्राचा मोठा वारसा ह्या भूमीला लाभला आहे. देशाच्या सैन्यात दोन रेजिमेंट आणि अनेक सैनिक देणार एकमेव राज्य म्हणजे महाराष्ट्र.

हिमालयाच्या मदतीला नेहमीच पाठीराखा असणारा आमचा सह्याद्री. कुठल्याही संकटाला हरवणारा हाच कणखर महाराष्ट्र कोरोनालाही त्याच हिमतीने हरवणार ह्यात तिळमात्र शंका नाही. कणखर देशा.. महाराष्ट्र देशा..

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा..

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...