विश्वविजेता...


"अरे यार न्यूझीलंड जिंकायला हवं होत, काय मॅच झाली जबरदस्त, वर्ल्डकप फायनल व्हावी तशीच मॅच झाली, वर्ल्डकप फायनलला सुपरओव्हर?? काय खेळला स्टोक्स, विलिअमसनने काय कॅप्टनशिप केली".. हे सर्व कालच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर तर ते आतापर्यंतच्या चर्चेचा विषय..

भारतीय टीम विश्वचषकातून सेमी फायनल हरल्यानंतर भारतीयांचा ह्या स्पर्धेत रस राहिलाच नव्हता कारण विश्वचषकाचा ह्या वर्षीचा प्रभळ दावेदारचं स्पर्धेतून बाहेर गेला होता. विश्वचषकात १० पैकी ८ संघाना धूळ चारणारा भारतीय संघ ज्या दोन संघांसोबत पराभूत झाला तेच दोन संघ अंतिम सामन्यात पहिल्यांदा विश्वचषकाचे दावेदार  होण्यासाठी खेळत होते. गेल्या दोन्ही विश्वचषकात अंतिम सामन्यात पराभूत झालेला न्यूझीलंडचा संघ ह्या विश्वचषकात जिंकावा अशी कुठेतरी परिस्थिती झाली होती. इंग्लंड २७ वर्षानंतर अंतिम सामन्यात आपलं नशीब अजमावत होता. क्रिकेट ह्या खेळाला जन्म देणारा इंग्लंड हा क्रिकेटचा विश्वउत्सव असलेला चषक जिंकू शकला नव्हता.

विश्वचषकाचा कालचा अंतिम सामना म्हणजे न भूतो न भविष्यती. इंग्लंडची फलंदाजी चालू असताना हा सामना इतका रोमांचक होईल असं मुळीच वाटत नव्हतं. अखेरच्या चेंडूवर मॅच वेगळ्याच वळणाकडे गेली आणि अंतिम पर्याय सुपरओव्हर झाली आणि तिथे पण मॅच अंतिम चेंडूपर्यंत पोहचली आणि जास्त चौकारांच्या जोरावर क्रिकेटचा जन्मदाता इंग्लंड विश्वविजेता संघ झाला आणि न्यूझीलंडने विश्वचषकाचा अंतिम सामना पराभूत होण्याची हॅट्ट्रिक केली. इंग्लंडने १९७९, १९८३ आणि १९९२ ह्या तीन विश्वचषकात अंतिम सामन्यात हारल्याची जखम अंततः भरून काढली आणि ४४ वर्षाची विश्वचषक जिंकण्याची प्रतीक्षा संपली.

१९७५ पासून सुरु झालेला विश्वचषक ऑस्ट्रेलियाने पाच वेळेस, वेस्टइंडीज आणि भारत २ वेळेस, श्रीलंका आणि पाकिस्तान १ वेळेस जिंकला. कालच्या अंतिम सामन्यात एक वेगळाच खेळ बघायला भेटला आणि क्रिकेटच्या पंढरीत क्रिकेट जिंकल्याची भावना मनाला जाणवली. इंग्लंड संघ विजेता ठरला त्याबरोबरच न्यूझीलंड उत्कृष्ट उपविजेता संघ ठरला... वेल्डन इंग्लंड.. नाईस प्लेड न्यूझीलंड..

डॉ. प्रशांत शिरोडे.

अलविदा वर्ल्डकप..


विश्वचषक स्वप्न हवेत स्थिरावल्यानंतर खूप दिवसानंतर स्पर्श ब्लॉगच्या लेखणीला थोड्या दिवसांच्या अलविदा नंतर पुन्हा लिहताना वर्ल्डकपची आजची मॅच कारण ठरली..

विश्वचषकात पंढरीच्या वारीसारखी अविरत असणारी विजयाची परंपरा आज अचानक खंडित झाली. विराटसेना जगात पहिल्याक्रमांकावर, विराट फलंदाजीत, जसप्रीत गोलनंदाजीत पहिल्या क्रमांकावर आपलं वर्चस्व टिकून होते. इंग्लंड सोडून सर्व संघाना पराभवाची चव चाखवली आणि न्यूझीलंडने भारताच्या संघाला पराभूत करून पुन्हा एकदा विश्वविजेतेची स्वप्न संपुष्टात आणली. दोनदा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तिसऱ्या विश्वचषकाचा घास तोंडात आल्यावर काढून घेतला. पहिला विश्वचषक ज्या भूमीत जिंकलो त्याच भूमीत हा विश्वचषक आहे म्हणून खूप आशा होत्या पण त्या आता पूर्णपणे संपल्या. दुसरा विश्वचषक आपल्या भूमीत मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर जिंकणारा भारतीय संघ क्रिकेटच्या पंढरीच्या लॉर्ड्सला मुकली.

पाच शतक करणारा रोहित, पाच अर्धशतक करणारा विराट, आणि चांगली सुरवात करणारा राहुल आज जणू मधल्या फळीची परीक्षा बघण्यासाठीच अवघ्या एक धावेवर बाद झालेत. गेलेल्या सामन्याच्या आशा पल्लवित केल्या त्या सर जडेजाने, हो आजच्या सामन्यासाठी तो सरच. गोलंदाजीत अव्वल असणारा जडेजा फलंदाजीतही आज अव्वल होता, पण त्याच्या प्रयत्नांना यशाची

किनार थोडी कमीच पडली. २०११ चा विश्वचषक षटकाराने जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनी आज ५० धावा करून खेळत असताना आपलं उत्कृष्ट सामना संपवण्याच कौशल्य कुठेतरी गमावून बसल्याच जाणवलं आणि अटीतटीच्या लढतीत आपली विकेट गमावून बसला. २०११ चा विश्वचषक सचिनला समर्पित केला तसा २०१९ चा विश्वचषक धोनीला समर्पित करण्याच स्वप्न स्वप्नच राहील. दुसरीकडे पूर्ण विश्वचषकात बूम बूम बुमराला जगाच्या पहिल्या क्रमांकाचा गोलन्दाज म्हणून लौकिक करण्यात पूर्णपणे यश येताना नेहमीसारखा संकटमोचक म्हणून धावत राहिला.

विश्वचषकात पाकिस्तान आणि बांगलादेश सारख्या अखिलाडूवृत्तीना हरवून जणू भारतीयांचा आनंद वाढवून दिला, पण तोच आनंद द्विगुणित नाही करता आला. असो भारतीयांना विराट सेनेच्या खेळातून आनंदच भेटला. जिंकणे किंवा हारने हा खेळाचाच भाग, कोणीतरी एकच जिंकणार.. म्हणून भारतीयांसाठी अलविदा वर्ल्डकप आणि विराटसेनेसाठी वेल्डन इंडिया...

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...