तंत्रज्ञानाच्या मानगुटीवर..



कोरोनाच्या महासंकटात माणूस खूप वेगळ्या दुनियेचे अनुभव घेतोय. घरात थांबून माणूस जगाची सफर करतोय. दुसऱ्याच्या जगण्याची चिंता करण्याअगोदर स्वतःच्या जीवाची काळजी घेतोय. त्यामुळेच माणसाने स्वतःला घरात कोंडून घेतलंय. रोजचं काम म्हटलं तर ऑफिसला जाण्यापासून तर घरी परतण्यापर्यंत सगळं घरात बसूनच चाललंय. "वर्क फ्रॉम होम" म्हणजेच घरी राहूनच काम करणं शक्य होतंय ते तंत्रज्ञानामुळे..

अरे हा तंत्रज्ञानामुळे खूप काही चालतंय. आज टीव्हीवर बातमी ऐकली आणि मन हळहळल. बातमी होती ती एका मृत्यूची. कोरोनाच्या महासंकटात पतीच्या निधनानंतर पत्नीला प्रवासास शक्य नसल्यामुळे पतीचं अंतिम दर्शन मोबाईलवरच घेतलं. ज्याच्याबरोबर उभं आयुष्य घालवलं त्याच जिवलगाबरोबर अंतिम क्षणाला प्रत्यक्षात मुकावं लागलं, पण मनाला कुठेतरी समाधान म्हणून मोबाईलच्या विडिओ कॉलद्वारे म्हणजेच तंत्रज्ञाने ती इच्छा भरून काढली.

माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आय टी क्षेत्राचा उल्लेख कुठेही होतांना दिसत नाहीये. थांबलेल्या शहरांना, गावांना चालविण्यासाठी आय टी क्षेत्र मोलाची भूमिका बजावत आहे. बँक, मोबाइल, टीव्ही, मीडिया, कंपनी सारखे अनेक विभाग यांच्याच जोरावर चालू आहेत. घरात बसून बोर होण्यापेक्षा इंटरनेटवरची सर्फिंग ह्या कठीण काळात दिवस घालवताना दिसतेय. काही क्षेत्र माणसा अभावी थांबलेत पण बरेचशे क्षेत्र आय टी मुळे चालू आहेत.

ह्या संकटाच्या काळात हॉस्पिटलमधील सॉफ्टवेअर असो वा सरकारने बनवलेले आरोग्यसेतू अँप असो सर्व काही ह्या आय टी मुळे  झालं. सर्वांचे आभार मानताना ह्या लॉक डाऊन मध्ये ह्या आय टी क्षेत्राचे पण आभार मानायला हवेत. कारण त्यांचा कर्मचारी वर्ग राबतोय म्हणून तंत्रज्ञानाच्या मानगुटीवर बसून भरपूर प्रमाणात काम होतांना दिसतंय, नाही तर सर्वच डुबल असत.

सर्व आय टी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना एक सलाम..

डॉ. प्रशांत शिरोडे.

शापित योध्दा ..


युद्ध चालू असलं कि त्यात प्रत्येक योध्द्याचा  सहभाग महत्वाचा असतो. युद्ध पुकारलं तर त्या प्रत्येक योध्द्याला आपलं योगदान हे द्यावचं लागत. युद्धभूमीला त्याच्या योगदानाची जाण नक्कीच असते. सर्व योद्धे आपलं कर्तव्य बजावत असताना, कुणा एका योध्द्याकडे लक्ष देण्यात आलं नाही तर त्याच मनोबल खचण्याची शक्यता असते. पण आपल्याकडे लक्ष नसलं तरीही आपल्या कर्तव्यासाठी तो योध्दा शेवट्पर्यंत रणांगणावर लढत असतो. कारण त्याच्यासमोर शत्रूला नेस्तनाभूत करण्याचं ध्येय असत.

कोरोनाच्या महासंकटात देवासारखे धावून आलेले योद्धे म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सफाई कामगार आणि प्रशासनातील कर्मचारी. हे सर्व अहोरात्र ह्या महासंकटात लढत आहेत. कोरोनाच्या लढाईत ह्या प्रत्येकाचा उल्लेख कुठल्यानं कुठल्या माध्यमातून होताना दिसतोय. स्वतःचा जीव धोक्यात घालून आपलं कार्य प्रामाणिकपणे करणाऱ्या ह्या सर्व घटकांचं मनोबल वाढावं हा त्या मागचा उद्देश असतो. ह्या सर्व लढाईत सगळ्यांचं नाव अनेक वेळा घेण्यात आलं, पण "फार्मासिस्ट" म्हणजेच "औषधनिर्माणशास्रज्ञ" मात्र कुणाच्याही नजरेत आला नाही. ह्या महासंकटात त्याचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याच्या मनोबलाचा कुठंतरी विचार होताना दिसत नाही. तरीही तो आपल्या कर्तव्यात कमी पडताना दिसत नाही, त्याने स्वतःला "शापित योद्धा" समजून घेतल्यामुळे त्याचा कुणावर रागही नाही.

कोरोनाच्या घडामोडीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी फार्मासिस्टच्या योगदानाचा उल्लेख करून त्यांचं मनोबल वाढविण्यासाठी ट्विट केलं आणि ते ट्विट फार्मा जगतात व्हायरल झालं. एक मंत्र्याच्या दोन शब्दांनी सगळं फार्मसी क्षेत्र खुश झालं. छोटीशी माफक अपेक्षा बाळगणारा हा वर्ग नेहमीच दुर्लक्षित राहिला. त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यापेक्षा त्याच्या उपेक्षाच जास्त झाल्या. उदाहरण द्यायचं झालं तर त्याची जॉब सेक्युरिटी. अलीकडच्या काळात एक दोन महिन्यानंतर कानावर बातमी पडते, अमुक कंपनीतून ३०० फार्मासिस्ट कामावरून काढलीत, तमुक कंपनीतून ८०० लोक काढलीत. खूप मोठ्या घडामोडी झाल्या तरी फार्मासिस्टच्या प्रश्नाला कोणी वाचा फोडताना दिसत नाही. आपल्या पोटावर दगड पडला तरी त्याची दखल घेतली जात नसल्याचं माहित असून तो स्वतःला कुठेतरी गुंतवून घेतो आणि आपलं जगणं चालू ठेवतो. तो मन मारून जगणारा शापित योद्धा म्हणजे फार्मसिस्ट असतो.

कोरोनाच्या महासंकटात हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर्स, मेडिकल एजन्सी, रिसर्च, औषध उत्पादन ह्या प्रत्येक क्षेत्रात लॉकडाऊनच्या काळात आपलं कर्तव्य मोठ्या अभिमानाने निभावताना दिसणारा शापित योध्या प्रसिद्धीपासून दूरच आहे. मेडिकल स्टोअरवर कुठलीही लक्षण असलेला रुग्ण किंवा सामान्य माणूस आला तरी त्याला निसंकोचपणे औषध देणारा योद्धा म्हणजे फार्मासिस्ट. आज "हैड्रोक्सिक्लोरोक्वीन" नावाच्या औषधाची जागतिक स्थरावर मागणी असताना, देशाची गरज पूर्ण करून जगाच्या मदतीला हे औषध बनवून पाठवण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारा योद्धा  म्हणजे फार्मासिस्टच आहे. म्हणून त्याच मनोबल वाढविण्यासाठी त्याला त्याच्या कामाची शाबासकी देणं तितकच महत्वाचं आहे.

देशाच्या महासंकटात कणखरपणे उभ्या राहणाऱ्या "फार्मासिस्ट" ह्या शापित योध्द्याला  त्याच्या निस्वार्थी सेवेसाठी तिवार सलाम..

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...