शिवरत्न हरपला

 



"महाराजांचा जिथे जिथे पदस्पर्श झाला, तिथे तिथे मी आजपर्यंत अनेकदा जाऊन आलो आहे. आता फक्त एकच जागा उरली आहे, महाराज जिथे गेलेत तिथे जायची !" बोलता बोलता बाबासाहेब हे बोलले असतील आणि आज कदाचित ते प्रत्यक्षात स्वर्गातल्या स्वराज्यात सामीलही झाले असतील..

महाराष्ट्राचं शिवरत्न आज हरपलं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या वारसातील नेहमीच चर्चेत असलेलं नाव. १०० वर्षाच्या आयुष्यातील जवळपास ९० वर्ष छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या अदभूत चैतन्यासाठी आपलं आयुष्य समर्पित करणारा शिवभक्त म्हणजे बाबासाहेब पुरंदरे.. शिवइतिहासावरील अद्वितीय कार्याबद्दल महाराष्ट्ररत्न आणि पद्मविभूषणसारख्या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होत. त्यांच्या ऐतिहासिक कार्याची दखल घेत छत्रपती शिवरायांच्या साताऱ्याच्या सिंहासनान त्यांना "शिवशाहीर" हि पदवी बहाल केली.

शिवरायांचा इतिहास संशोधन करतांना अनेक माहिती नसलेल्या ऐतिहासिक गोष्टी त्यांनी जगासमोर आणल्या. "राजा शिवछत्रपती" सारखी अवर्णनीय कादंबरी लिहून "शिवाजी महाराज" जगाला सांगितले. १३ कादंबरी आणि पुस्तक लिहून मराठी साहित्याची शोभा वाढवली. "जाणता राजा" सारखं महानाट्य प्रत्यक्षात उतरवून जगाच्या पाठीवर महाराजांच्या प्रत्यक्ष इतिहासाची ओळख करून दिली. 

शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना बाबासाहेब बेधुंद होऊन जायचे. सनावळी अगदी तोंडावर असत. त्यांच्या बोलीतून १२००० पेक्षा जास्त व्याख्यान त्यांनी जगभरात दिलीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि ऐतिहासिक गोष्टी सामान्यांना प्रत्यक्षात समजाव्या म्हणून पुण्याजवळ "शिवश्रुष्टी" उभारून एक निश्चय पूर्ण केला.

आयुष्याच्या वाटेवर अनेक यशाच्या कौतूकासह त्यांना आरोपांचाही सामना करावा लागला. प्रत्येक गोष्टीला उत्तर न देता आपलं शिवकार्य चालू ठेवणारा निर्भीड शिवभक्त आज भूतलावावरील स्वराज्य सोडून स्वर्गातील स्वराज्याकडे निघाला. शिवशाहिरांच्या अखेरच्या इच्छेप्रमाणे त्यांना  छत्रपती शिवाजी महाराजांकडे जागा मिळो हीच भावपूर्ण श्रद्धांजली..

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...