आमदार ..


गणपतराव देशमुख एक सर्वसामान्य आमदार. प्रश्न पडला असेल कि आमदार कसा सर्वसामान्य असू शकतो?  आजपर्यंत स्वतःच्या आहे त्याच घरात राहून सर्वसामान्याना सहजपणे भेटता येणारे आमदार. जवळजवळ ५५ वर्ष नेतृत्व केलेलं असताना अजूनही एसटी बसने प्रवास करणारे आमदार. सयुंक्त महाराष्ट्र चळवळीत अभूतपूर्व सहभाग असणारे भारदस्त व्यक्तिमत्व.

देशातील सर्वात जास्त कार्यकाळ असलेला आमदार, म्हणजे ११ वेळा सलग निवडून येणारे ९२ वर्षीय लोकाभिमुख तरुण आमदार. १९६२ साली वयाच्या ३४ व्या वर्षी सांगोला मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आल्यानंतर सलग ५५ वर्ष एक मतदारसंघ, एक झेंडा, एक पक्षातून देशात निवडून आलेला एकमेव आमदार. ५१ वर्ष विरोधी बाकावर बसून दुष्काळग्रस्त मदारसंघाला पाणीदार करण्यासाठी लढणारा लढवा आमदार.

आपल्या विजयी घौडदोडीत एकदा १९२ मतांनी पराभव झाल्यानंतर त्या पराभवाचा निकाल सांगण्यासाठी कुठला अधिकारी पुढे येत नव्हता, विजयी उमेदवार मतमोजणी कक्षातून बाहेर येत नव्हता, कार्यकर्ते फेरमतमोजणीची मागणी करत असताना, आमदार साहेब मतमोजणी अधिकाऱ्याला बरोबर घेऊन जनमाणसासमोर निकाल जाहीर करून आपला पराभव आनंदाने स्वीकारला. दिलदार राजकारणीच राजकारणाचा हा अध्याय घडवू शकतो हे तितकच खरं.

गरिबांपासून श्रीमंतांना सहजपणे उपलब्ध असणारा आमदार. सामान्य राहणीमानापासून ते उच्च विचारसारणीपर्यंत जीवनाचा प्रवास करताना महाराष्ट्राच्या राजकारणात अनन्य साधारण स्थान टिकवून ठेवणाऱ्या निष्ठावान आमदार गणपतराव देशमुख यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

शत-प्रतिशत



एक्सिट पोल म्हंटल कि किती विश्वास ठेवावा आणि किती नाही तेच समजतं नसत. आताच पाच राज्यांच्या निवडणूका झाल्या आणि त्यात एक्सिट पोल गेल्या चारवर्षांपेक्षा थोडे वेगळेच आले. सत्ताधारी पक्षाने नेहमीप्रमाणे विजयरथाची चाक तयारच ठेवली होती आणि दुसऱ्या पक्षांनी आपली मनाची धास्ती मनात जागीच राहू दिली होती. पाच राज्यांच्या निवडणुकीचा एक्सिट पोल प्रत्यक्षात कितपत खरा ठरतो ह्याची प्रतीक्षा आज संपली आणि निकाल जवळजवळ एक्सिट पोलच्या अनुमानानुसार लागला आणि सत्ताधारी पक्षाची विजयरथाची चाक जागेवरच उभी राहिली.

सत्ता एक अशी गोष्ट आहे जिचा उपयोग केला तर सन्मान होतो आणि दुरुपयोग केला तर अपमान होतो. ६० वर्ष सत्ता भोगणारी काँग्रेस सत्तेच्या नशेतून जनतेने उतरवली आणि त्याच सत्तेची नशा भाजपालासुद्धा लवकर चढली आणि जनतेने एकाच वेळेस त्यांची हि नशा ह्या निवडणुकीत उतरवली. २०१४ नंतरच्या कुठल्याही निकालानंतर भाजप कार्यालयासमोर मंडप, फटाके आणि जलोषाबरोबर प्रतंप्रधानाचं भाषण व्हायचं, आज मात्र सगळं शांत होत आणि जिथे शुकशुकाट असतो तिथं आज जलोषाच वातावरण बघायला भेटत होत. कदाचित सत्ताधीशाना जनता जनार्दनाचा कल आतातरी चांगलाच समजलेला दिसतोय, असं ह्यातून समोर येतंय.

सत्तेवर असताना जनता जनार्दनाचा विचार न करता हुकूमशाही दाखवणं महागातच पडत. जनता सत्तेत बसवते, पण त्या सत्तेचा उपद्रव केला तर खालीही खेचते हे आजच्या निकालावरून स्पष्ट होताना दिसतंय. आंतरराष्ट्रीय स्थरावर देशाचं नाव वरती नेताना राष्ट्रीय स्थरावर सामन्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे शत प्रतिशत पराभव स्वीकारावाचं लागेल. राम मंदिर, पाकिस्तानला समज, काश्मीरचा कायदा यांचा विसर आणि नोटबंदीसारखे अनेक हेकेखोरपणाने नियोजनशून्य घेतलेले निर्णय ह्या निवडणुकीतून निकालात अवतरले.

मोदी-शहा जोडीने ह्या निकालानंतर एका राज्यापुरताचा विचार सोडून संपूर्ण राष्ट्राचा विचार प्रामाणिकपणाने करून जनतेच्या मनातील, भाजप अंतर्गत नेत्यांच्या सहमतीने, मित्र पक्षांबरोबर कूटनीती न करता हेकेखोरपणा सोडला तर नक्कीच शत-प्रतिशत राहतील. शेवटी भाजप जर दुसरं काँग्रेस होत असेल तर जनता त्यांना शत-प्रतिशत घरचा रस्ता दाखवेलच..

डॉ. प्रशांत शिरोडे.

भीमपर्व..


उधारली हजारो कुळे...
भीमा तुज्या जन्मामुळे..

स्वतंत्र पूर्वीच्या काळात समाजमान्य चालीरीतींत वावरणाऱ्या एक उपेकषित वर्गाला त्यांच्या जीवन पद्धतीची जाण करून देण्यासाठी आपलं आयुष्य पूर्ण झोकावणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.. त्या काळातल्या भारतीय शैक्षणिक अधोगतीत सुद्धा उच्च शिक्षण घेऊन समाज कार्य आणि राष्ट्र कार्य करणारा महापुरुष..

समाजहितासाठी काही विशिष्ट वर्गाला सवलती काही विशिष्ट वेळेसाठी नमूद करून एक संविधानिक दर्जा देणारा माणूस. पण काळाच्या ओघात राजकीय फायद्यासाठी त्या विशिष्ट वेळेला नाकारण्यात आलं जे बाबासाहेबाना कदापि मान्य नव्हतं.. उपेक्षित वर्गाच्या उत्कर्षासाठी ठरवून दिलेल्या सवलती कालमर्यादेपेक्षा जास्त काळ किंवा राजकीयहेतूने कायमस्वरूपी केल्यामुळे सामाजिक विषमता कमी होण्याऐवजी ती जास्त वाढताना दिसते.

छत्रपती शिवरायांचा आदर्श समोर ठेवून जागतिक संविधानाचा अभ्यास करून राज्यघटना लिहणाऱ्या समितीत आपली भूमिका बजावणारे बाबासाहेब... समाजातील उपेक्षित वर्गाला सवलतींचा फायदा होऊन तो समाज मुख्य प्रवाहात यावा जे बाबासाहेबांचं मुख्य उद्धिष्ट होत. पण अलीकडच्या काळात उपेक्षित वर्गापेक्षा अपेक्षित वर्ग त्याचा फायदा घेताना दिसतोय..

निळ्या आकाशासारखे अविरत अभ्यास करणारे बाबासाहेब आणि त्यांचं भीमपर्व सध्य स्थितीत जातीच्या पुस्तकात सिमीत होत असताना एक मराठी म्हणून बाबासाहेबाना ६२ व्या महापरिनिर्वाणदिनी भावपूर्ण आदरांजली.

डॉ. प्रशांत शिरोडे..

कांद्याचे अश्रू ...



कांदा चिरतांना डोळ्यात पाणी येत तसंच सध्या कांदा विकताना शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येताना दिसतंय. कांदा सामान्यांना पोट भरण्यासाठी चिरताना डोळ्यात पाणी देतो तर तोच कांदा शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचं फळ न मिळाल्यामुळे डोळ्यात पाणी देतो. सध्याची परिस्थिती तशीच आहे, कांद्याचा बाजारभाव १.५० रुपये किलो आहे. कांदा पिकवून योग्य भाव येईपर्यंत साठवला जातो, ज्याचा खर्च साधारणतः ३-४ रुपये प्रति किलो येतो. पण आजचा बाजारभाव बघितला तर कांदा १-२ रुपये किलो भावाने विकला जातोय, म्हणजेच ह्या भावात शेतकऱ्याला उत्पादन खर्चही मिळत नाही.

सध्याची दुष्काळी परिस्थिती बघता कांद्याबरोबर सर्व पिकांचं उत्पन्न कमी आहे म्हणून त्याचा बाजारभाव जास्त असेल अशी सामान्य शेतकऱ्याची भावना आहे. शेतकऱ्याची हि भावना सरकारला कळत नाही, अस मुळीच नाही, पण त्यांना नेहमीप्रमाणे राजकीय स्वार्थ्याचं पडलेलं असत. आताही तसंच झालं, चार राज्यांच्या निवडणूका चालू असल्याने मतांच्या राजकारणाकरता शेतकऱ्याला बळीचा बकरा बनवलंय.

शेतीमालाला भाव असणं म्हणजे भीक मागितल्यासारखं झालय. आम्ही दीडपट भाव देऊ म्हणणारे उत्पादन खर्चाचा निम्मा भाव देतायेत. हे तर सरकारच झालं हो, पण शहरी माणूसही हि २-४ रुपये भाव वाढला कि अशी प्रतिक्रिया देतो कि जणू आभाळच कोसळलंय. पिझ्झा, बर्गर खाण्यासाठी ५०० रुपये गेले तरी कुठलीही कुरकुर न करणारे ५ रुपये कांद्याचा भाव वाढला कि बोंबाबोंब करतात. अश्या लोकांनी शेतकऱ्याची मेहनत, परिस्थिती आणि जगण्याची पद्धत एकदा जाऊन बघायला हवी.

कांद्याचा एक अश्रू चवीच्या आनंदासाठी तर एक अश्रू अथक कष्टाच्या फळासाठी.. एक असतो खवय्यांसाठी तर एक असतो शेतकऱ्यांसाठी.. शेतीप्रधान देशात शेतकरी नावाला राजा म्हणवला जातो, पण प्रत्यक्षात ह्या राजाचे प्रजेपेक्षा वाईट हाल असतात. सातवा वेतन आयोग लावणाऱ्या सरकारने शेतकऱ्याला जगण्यासाठीच वेतन हमीभाव स्वरूपात दिल तरी तो जगण्याची आशा सोडणार नाही.

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...