अजिंक्य..

 



ऑस्ट्रेलियात ३२ वर्षानंतर एक अनोख्या विजयाचा जल्लोष भारतीय क्रिकेट संघ आज साऱ्या जगाला साजरा करतांना दिसला. ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका जिंकल्यानंतर ज्या व्यक्तीला याच श्रेय मुख्यतः जात तो म्हणजे अजिंक्य रहाणे ..

अतिशय शांत, संयमी स्वभावाचा चाणाक्ष कर्णधार म्हणजे अजिंक्य. पहिल्या कसोटीत विराट कोहलीच्या नेतृत्वात ३६ धावांवर गारद झालेल्या संघाला दुसऱ्या कसोटीत आपल्या कप्तानीत विजय मिळवून देणारा अजिंक्य. ह्या कसोटीत संघ दडपणात असतांना संघाला त्यातून बाहेर काढून संघाला दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून देण्यात अजिंक्यचा कर्णधार म्हणून सिंहाचा वाटा होता. तिसऱ्या कसोटीत शेवटच्या दिवशी उपहारानंतर कसोटीला वेगळ्या निकालावर नेवून क्रिकेट जाणकारांना आणि प्रेक्षकांना अजिंक्यने धक्काच दिला. शेवटच्या कसोटीत आपली बाजू भक्कम असल्याचं जाणून ती जिंकण्याच्या दृष्टीने संघाला पुढे नेणारा कर्णधार अजिंक्य राणे कौतुकाला नक्कीच पात्र ठरला.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघ पहिल्या कसोटीनंतर दडपणात असतांना कर्णधार पदाची धुरा अजिंक्यने हातात घेतली. त्यानंतर ह्या दौऱ्यात अनेक मुख्य खेळाडूंना दुखापत झाली तरी नवख्या खेळाडूंना बरोबर घेऊन मोठ्या ताकतीने संघाला अजिंक्यने खेळवल. आपल्या कर्णधार पदातून अनेक सुप्त गुणामधून त्याने ह्या मालिकेत मोठेपणा दाखवला. सामन्यानंतर मैदानातून कर्णधार पहिले बाहेर पडतो, पण संघातील नवख्या खेळाडूने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे हा मान त्याने त्या खेळाडूला दिला. वर्णभेदामुळे खेळाडूंना ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांकडून हिणवलं जात असतांना त्याने कारवाई होईपर्यंत सामना थांबण्याचं धाडस दाखवलं. आपल्या सहकाऱ्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंचांना विनंतीकरून त्या सामन्याचा बॉल त्या खेळाडूस देण्याची अनोखी गोष्ट त्याने केली. आपल्या संघातील खेळाडूंबरोबर ऑस्ट्रेलियाचा एक गोलंदाजांची १०० वा सामना होता म्हणून त्याला बोलवून त्याने त्याला जर्सी आठवण म्हणून भेट दिली. अगदी संघ जिंकल्यावरही त्याने आपल्या हातातील ट्रॉफी संघातील खेळाडूंकडे क्षणात सुपूर्द केली आणि शेवटी बोलतांना ऑस्ट्रेलिया टीमचे तिथल्या प्रेक्षकांचे आभारही मानले.

एका वेगळ्या दिमतीला कर्णधार म्हणून सिद्ध केलेल्या अजिंक्य रहाणेला नेहमीच भारतीय क्रिकेट मध्ये डावललं गेलं. सगळ्या फॉरमॅट मध्ये कुठल्याही स्थानावर खेळण्यासाठी लायक असलेल्या ह्या जिगरबाज खेळाडूला का संघाबाहेर  ठेवलं जात हाच अनुत्तोरित प्रश्न कायम आहे. आपल्याला मिळालेल्या संधीच त्याने नेहमी सोनंच केलं त्याचच अजून एक उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका होय.

अजिंक्यची संयमी आणि शांत वर्तणूक सचिन तेंडुलकरची आठवण करून देते. मराठी मनाची हि परंपरेची शृंखला तो मोठ्या दिमाखाने पुढे नेतोय. अजिंक्य आपल्या वर्तनातून पुन्हा पुन्हा भारतीयांची मन जिंकतोय आणि हाच त्याचा मराठी असल्याचा अभिमान मराठी मनाला आहे... भविष्यकाळात त्याला अनेक संधी मिळो ह्याच शुभेच्छा.

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...