रात्र वैऱ्याची..



अनेक संकटांचा सामना करत पुन्हा नव्याने सुरवात करणारा हिंदुस्थान.. आज हाच हिंदुस्थान एका कोरोना विषाणूच्या संकटाच्या उंबरठ्यावर येवून उभा राहिला आहे. रोज जगातल्या कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय, त्या पाठोपाठ भारताचाही वाढतोय. गेल्या १५ दिवसापूर्वी सर्व काही दिवसासारखं चाललं होत आणि आज अचानक काळरात्र आली. हि वेळ तशीच आहे, जी हिंदुस्थानच्या "वसुदेव कुटुंबकम" ह्या सकारत्मक विचाराने जगाला वाचवण्याच्या तयारीत आहे. आपण वाचू तर राष्ट्र वाचेल आणि राष्ट्र वाचल तर विश्व वाचेल.

आज शेअर मार्केट मध्ये गुतुवणुकदारांचं ५२ लाख हजारांच नुकसान झालं. उद्या हे कुठं जाईल याची शास्वती देता येत नाही. आज देश २१ दिवस बंद असेल आणि हा बंद जर यशस्वीरीत्या पाळला तर देश २१ वर्ष मागे जाण्यापासून वाचेल. आज भारतात मुंबईतल्या ५ डॉक्टरांना अहोरात्र उपचार करताना त्यांच्यातच कोरोनाचे लक्षणे दिसून आले. वेळीच दक्षता घेतली नाहीतर अनेक डॉक्टरांना ह्यातून जावं लागेल. प्रत्येक ४०००० माणसांमध्ये एक व्हेंटिलेटर आहे. जर हि महामारी पसरली तर इटली सारखी परिस्थिती निर्माण होईल. कोणता माणूस मारायचा? हा प्रश्न निर्माण होईल. मुंबई सारख्या शहरात ६० लोकांची दिवसाला कोरोना टेस्ट होते. उद्या हि परिस्थिती ओढवली तर साधी टेस्ट सुद्धा करता येणार नाही.

कोरोनाच्या संकटाला सकारत्मक घ्या. धकाधकीच्या जीवनात आपण कुटुंबाला, स्वतःला वेळ देऊ शकत नाही, तो वेळ आता भेटतोय. जीवन जगून घ्या. स्वतःला कामाशिवाय २० दिवस शांत बसता येत ह्याची परीक्षा करून घेताना स्वतःच्या विचारणा चालना द्या. आपला कुठला छंद असेल तर तो मनसोक्त जोपून घ्या. रोज टीव्ही बघायला भेटत नाही, ती हवी तेवढी बघून घ्या. घराची साफसफाई दिवाळीलाच होते ती ह्या दिवसात स्वतःहून करून घ्या. आनंदाने जगण्याची संधी आली आहे तीच सोन करून घ्या. भारत मातेचा अभिमान राष्ट्रगीतापुरता न ठेवता सरकारच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन राष्ट्रभक्ती सिद्ध करा..

केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांच्यापरीने योग्य पावलं उचलत आहे. आजपासून सारा देश लॉक डाउनच्या छायेत पुढील एकवीस दिवस राहणार आहे. प्रशासन सर्व परीने येणाऱ्या महाभयानक परिस्थितीला येण्यागोदरच थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. देश वाचविण्यासाठी डॉक्टर, पोलीस, प्रशासन स्वतःचा जीव धोक्यात टाकून आपल्याला घरीच बसण्याचं आव्हान करत आहे. ह्या सर्वाना कुटुंब आहेत पण आपल्या भारत भूमीच्या प्रेमापोटी ते देवदूत बनले आहेत. सीमेवरच्या सैन्यासारखं कोरोनाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यांच्या सुरक्षेतेसाठी, भारतमातेच्या संरक्षणासाठी आपल्याला स्वतःची काळजी घ्यावी लागेल आणि तीच देशाची काळजी घेतल्यासारखाच असेल. आपण घरात बसून देश वाचवू, आपल्या प्रशासनाचं मनोधैर्य वाढवू.

डॉ. प्रशांत शिरोडे..

युद्ध आमचे सुरु..


जगाला हलवून टाकणार विषाणूच्या महाकाय  प्रसाराने जगभरात युद्धजन्य परिस्थिती झालेली दिसत आहे. हे युद्ध कोरोना नावाच्या विषाणूच आणि मानवजातीच आहे. "माणसा कधी माणूस होशील रे" ह्या वाक्याप्रमाणे माणसाला दुसऱ्यासाठी नाही  तर स्वतःसाठी माणूस होवून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेवून सामाजिक आरोग्याच्या काळजीची घेण्याची गरज आहे.

सगळीकडे चिंतेचं वातावरण आहे, दिवसेंदिवस कोरोनाच संकट गडद होत चाललंय. चीन, अमेरिका आणि युरोपियन देशांनी ह्या युद्धात दोन पावले मागे घेतली आहेत. हा विषाणू अगदी ताकदीने जगावर राज्य करू पाहत आहे. पहिल्या टप्यात ह्या एक देशातून दुसऱ्या देशात प्रवेश करतो. दुसऱ्या टप्यात हा दुसऱ्या देशातून येवून स्थानिक लोकांमध्ये पसरतो. तिसऱ्या टप्यात तो महाभयानक रूप धारण करतो आणि चौथ्या टप्यात तो माघार घ्यायला सुरवात करतो. पाचव्या टप्यात तो हरण्याची तयारी चालू करतो. आज ज्या चीनमध्ये हा विषाणू प्रथम युद्धासारखं थैमान घालत होता त्याच चीनमध्ये पाचव्या टप्यात आहे. भारत आज दुसऱ्या टप्यावर ह्या युद्धाचा सामना करत आहे.

भारतातील ह्या युद्धाची काळजी योग्यरीत्या घेत असताना काही नागरिकांच्या चुकीच्या मानसिकतेमुळे ह्या विषाणूच्या संसर्गाला खतपाणी भेटत आहे. हा लढा जगण्याचा आणि जगवण्याचा आहे. आपण डॉक्टर, पोलीस ह्यांसारखी कुठलीही विशेष जबाबदारी स्वीकारत नसताना ह्या विषाणूच्या साखळीला तोडण्यासाठी घरातच बसून स्वतःची काळजी घेत ह्या युद्धात आपल्यासाठी आणि आपल्या भारतीयांसाठी सामील व्हा. संयम बाळगताना सामाजिक भान ठेवा. पुढील दहा दिवस ह्या युद्धाच्या खऱ्या   लढतीचे आहेत. घरात बसा, स्वच्छता राखा, हात धुवा, कोणाच्याही संपर्कात येवू नका.. बस इतकं केलं तरी हि भारतमातेची सेवा करण्यासारखं झालं.

सरकारने काळजी घेताना ज्या सूचना दिल्या त्याच काटेकोरपणे पालन करा. कारण सरकार जगाच्या अनुभवाने ह्या युद्धाला सामोरं जात आहे. उद्याच्या जनता कर्फ्यूत पूर्णपणे सामील व्हा म्हणजे कोरोना विषाणूची वाढती साखळी कुठेतरी तुटण्यास मदत होईल. पुढील दहा दिवस असाच संयम ठेवला तर हे युद्ध कमी कालावधीत जिंकणारा भारत एकमेव देश राहील.

शास्रज्ञ नवीन शोधासाठी प्रयत्न करतायेत. डॉक्टर्स आणि आरोग्यसंस्था आपली भूमिका
सैनिका प्रमाणे बजावतायेत. पोलीस नेहमीसारखं
जीवाची पर्वा न करता आपली काळजी
घेतायेत. आता आपल्याला ह्या सर्वांच्या खांद्यावरील ओझं कमी करण्यासाठी स्वतःला शिस्त लावून घ्यायची आहे.

भारतभूमीने अनेक युद्ध लढलीत आणि जिंकलीतही. हे युद्धही जिंकायचं आहे आणि ते जिंकणारच, फक्त घरात राहून ह्या युद्धाला तोंड देताना नियमांचं पालन करून सुरु असलेल्या प्रादुर्भावाला रोखू या आणि सर्वांमिळून म्हणूया "युद्ध आमचे सुरु आणि आम्ही कोरोनाला नक्की हरवू...".

डॉ. प्रशांत शिरोडे..

धाकल धनी..



लालबुंद सळ्यांनी राजांचे डोळे खोबण्यांनी जाळून टाकले.. हे वाक्य ऐकून सारा महाराष्ट्र रडला.. त्याच कारणही तसंच स्वराज्यरक्षक संभाजी मालिका शेवटच्या टप्प्यात असताना छत्रपती संभाजी महाराजांवर मरण यातनांची सुरवात गनिमांकडून झाली, त्या भागातील हे वाक्य... आणि आजच्या भागातील "राणीसाहेब, नव वर्षाची गुढी उभारता येणार नाही, औरंगजेबाने महाराजांना मृत्युदंडाची शिक्षा दिली".. सर्व काही मनाला लागून गेलं..

जगावं तर शिवसारखं आणि मरावं तर संभासारख.. छत्रपती संभाजी महाराजांची ज्या भूमीत पराक्रमाची यशोगाथा लिहली गेली त्या भूमीला हा पराक्रमच माहित नव्हता. डॉ. अमोल कोल्हे ह्या माणसाने हे शिवधनुष्य उचललं आणि जगाच्या पाठीवर ह्या इतिहासाच्या सुवर्ण क्षणांना हृदयस्थ भिडवल. मालिकेतील प्रत्येक पात्राने इतिहासाचे हे क्षण उभेउभ डोळ्यासमोर आणले. महाराष्ट्र हि शौर्याची भूमी, हि शिवरायांची भूमी, हि जिजाऊंची भूमी आणि त्याच भूमीने हे सुवर्णस्वप्न अनुभवलं..

येसूबाई, संभाजी महाराज, सोयराबाई, अनाजी पंत, बहिर्जी नाईक, हंबीरमामा आणि औरंगजेब ह्या पात्रांसह सर्वच पात्रांनी मालिकेला एक वेगळ्या उंचीवर घेऊन गेले. मालिकेच्या शेवटच्या भागापर्यंत रसिकप्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. प्रत्येक भागातील प्रेक्षपण, प्रत्येक वाक्यातील भारदस्त इतिहास, प्रत्येक पात्र उभेउभ प्रेक्षकांच्या मनात बसवण्यात हि मालिका यशस्वी झाली..

ह्या मालिकेच्या शेवटच्या भागापर्यंत संभाजी महाराजांच्या मृत्यूवर प्रसारमाध्यमांनी, लोकांनी जितकी चर्चा केली तितकी मालिकांच्या इतिहासात कुठल्याही मालिकेची झाली नाही. स्वराज्याच्या धाकल्या धन्याच्या प्रत्येक क्षणांना डॉ. अमोल कोल्हे सारख्या दमदार कलाकाराने तितक्याच दमदार शैलीत प्रेक्षकांच्या समोर उभं केलं. आज मालिकेच्या शेवटच्या भागात प्रेक्षकांच्या अश्रुनी ह्या मालिकेला अलविदा दिला...

जाता जाता स्वराज्याच्या धाकल्या धन्याचा इतिहास जगासमोर आणणाऱ्या डॉ. अमोल कोल्हेंचे मनस्वी आभार. तुमचे हे उपकार स्वराज्यभूमी नक्कीच विसरणार नाही..

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...