सावरकर...


अंदमान आणि निकोबार बेट भारताच्या नकाशात ज्या महानायकामुळे आहे ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर.. स्वातंत्र्यवीर म्हणजेच स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावून वीर मरण आनंदाने स्वीकार केलेले सेनानी..

इंग्रजांच्या पारतंत्र्याला खरा सुरुंग लावून आपल्या भारतमातेची सेवा करताना सर्वात जास्त यातना भोगलेले स्वातंत्र्यसैनिक.. इंग्रजांना सर्वात जास्त धास्ती असलेला भारतमातेचा पुत्र.. आजही अंदमानच्या कारागृहात डोकावलं तर सावरकरांच्या काळ्यापाण्याची शिक्षा किती असह्य असेल त्याचा अनुभव येतो. प्रखर देशप्रेमाबरोबर मराठी साहित्य, हिंदुत्व अश्या अनेक विषयांवर अभ्येद्य योगदान. मातृभूमीच्या प्रेमापायी समुद्रात उडी मारून प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहत मातृभूमीच्या दर्शनाला पोहचलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व..

नाशिकमधल्या भगूर ह्या छोट्याश्या गावात इंग्रजांच्या स्वप्नांना चाकाचूर करून टाकणारा एक महापुरुष. स्वातंत्र्याची प्रेरणा महाराष्ट्राने राष्ट्राला दिली आणि स्वातंत्र्य कस मिळवायचं ह्याची संकल्पना सावरकरांनी दिली. मित्रमेळा हि संघटना उभारून तरुणांना स्वातंत्र्य लढ्यात सामील करून भारतमातेच्या स्वातंत्र स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवणारे स्वातंत्र्यवीर.. छत्रपती शिवरायांना दैवत मानणाऱ्या सावरकरांनी महाराजांची आरती
लिहली..

भारतरत्नाचे खरे दावेदार राजकीय द्वेषापायी भारतरत्न पुरस्काराला सन्मानित करू शकले नाही. मराठी मातृभूमीच्या सन्मानाचा मानबिंदू  आणि भारतभूमीच्या अखंड स्वप्नाचा चैतन्यबिंदू स्वातंत्र्यवीर सावरकरांना जन्मदिवशी भावपूर्ण  आदरांजली..

डॉ. प्रशांत शिरोडे.

माझा महाराष्ट्र ...



हि मायभूमी,हि जन्मभूमी, हि कर्मभूमी हि आमुची..
महावंदनीय अति प्राणप्रिय हि मायमराठी आमची..

शिवरायांच्या पावन स्पर्शाने सौभागयित झालेल्या महाराष्ट्र ह्या भूमीत अनेक अजरामर व्यक्ती आणि गोष्टी घडल्या. हिंदुस्थानच्या पाठीवर महाराष्ट्र हे नावातच महा म्हणजे मोठं असलेलं राष्ट्र आहे.

देशाला परकीयांच संकट आलं, मुगलांचं संकट आलं, इंग्रजांचं संकट आलं. जेव्हा देशावर संकट आली तेव्हा सर्वात पहिले उभा राहिला तो माझा महाराष्ट्र.. जेव्हा जेव्हा हिमालयावर संकट आली तेव्हा तेव्हा हा सह्याद्री मोकळ्या मनाने आणि निधड्या छातीने धावून गेला. पराक्रमाची आणि यशोगाथेची, शौर्याची आणि विक्रमांची, ज्ञानाची आणि संस्काराची हि महान महाराष्ट्र भूमी. हीच आमची मायभूमी जिणे मराठी भाषेचा महान  वारसा दिला, हीच आमची जन्मभूमी जिणे जन्मताच शिवरायांचा इतिहास दिला, हीच आमची कर्मभूमी जिणे स्वाभीमानाचा रस्ता दाखवला.. महाराष्ट्रभूमी हि वंदनीय, प्राणप्रिय आणि प्रेरणादायी आहे..

शिवरायांनी मुघलांच्या आक्रमणातून हिंदुस्थानाला
मुक्त केलं, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी देशाला स्त्री शिक्षण दिल, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा महान स्वातंत्रप्रेमी दिला, बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून राज्यघटना दिली. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, जयंत नारळीकर, बाबा आमटे ह्या सारखी अनेक रत्न दिलीत. ह्या राज्याचा जणू डीएनए आहेच कि काहीतरी अन्यनसाधारण व्यक्तिमत्व आजपर्यंत दिलीत.

माझा महाराष्ट्रात आजही प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे ते संतांच्या संस्कार, शिवरायांचे प्रेरणास्थान आणि परमेश्वराची कृपा. माझा महाराष्ट्र नेहमीच सुजलाम सुफलाम राहो हीच सदीच्छा...

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा...

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...