'मत'दान..





लोकशाहीच्या १७ व्या लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाचा आजचा दिवस. मुंबईसह महाराष्ट्रातील  अनेक ठिकाणी होणाऱ्या निर्णायक लढतीचा आजचा दिवस. सत्तेचं निर्णायक मत उत्तरप्रदेशानंतर देणार राज्य म्हणजे महाराष्ट्र. लोकसभेच्या निर्णयाला आणि भारतीय व्यवस्थापानेला बळकट करणार राज्य म्हणजे महाराष्ट्र.

शेवटच्या टप्यात मतदानाला जाताना लोकशाही बळकट आणि टिकून राहण्यासाठी ह्यावेळेचं मतदान. विकासाच्या खऱ्या स्वप्नांसाठी आणि त्यांना प्रत्यक्षात बघण्यासाठी ह्यावेळेचं मतदान. जातीच्या राजकारणाला छेदून राष्ट्रीय ऐक्यासाठी मतदान. लोकशाहीतील लोकहितासाठी लोककल्याणासाठी ह्यावेळेचं मतदान. राजीय नाही तर राष्ट्रीय विकासासाठी मतदान.

सत्तेच्या चाव्या सांभाळताना जनतेला गृहीत न धरणाऱ्या सत्ताधीशांना त्यांच्या चुकांची जाण करून देणारा हा महोत्सव. आंतरराष्ट्रीय स्थराबरोबर राष्ट्रीय स्थर तितकाच महत्वाचा असताना देशाला बळकट करण्यासाठी लोकशाहीचा हा महोत्सव. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत एकसंघ राष्ट्रासाठी आणि समांतर विकासासाठी हा महोत्सव. दाखवलेली स्वप्न आणि त्याची केलीली पूर्तता ह्याच मूल्यमापन करणारा महोत्सव..

महाराष्ट्राने नेहमीच निर्णायक पाऊलांची वाट दाखवली आहे. अन्यायाला वाचा, विकासाला साथ, सर्वोत्तम योगदान अश्या अनेक माध्यमातून देशाला बळकट केलंय. चला देशाला एका योग्य क्षितिजावर घेऊन जाण्यासाठी मतदान करू या.. महाराष्ट्र भूमीची परंपरा टिकवूया.

डॉ. प्रशांत शिरोडे.

'राज'कारण...



लोकसभेच्या तिसऱ्या टप्याच्या मतदान करायला जाताना भारतीय राजकारणाच्या पाऊलखुणांना जरा डोकावून बघत असताना, राजकीय क्षितीजाच्या पलीकडे देश कसा आहे हे बघणं तितकंच महत्वाचं आहे. काँग्रेसची ५० वर्ष, भाजपाची १० वर्ष हा मुख्य केंद्रीय सत्येचा कालखंड.

२०१९ लोकसभा मतदान म्हणजे देशाच्या एका निर्णायक टप्प्यावरच मतदान. काँग्रेसने ५० वर्षाची सत्ता भोगताना देशाचा विकास करत असताना आपलं राजकीय अस्थित्व लोकांना गृहीत धरून चालूच ठेवलं. विकासाचा दर बघता भ्रष्टाचाराचा दरही तितकाच वाढल्यामुळे, विकास पूर्णपणे होण्यासाठी सत्तापरिवर्तन झालं. एक कुटुंबाभोवती सत्तेचं केंद्रीकरण असल्यामुळे राजकीय दृष्ट्या दिल्लीतून निर्णय होणं राज्यिय राजकारणासाठी तितकस ठीक नव्हतं. पारतंत्र्यानंतर देश उभारण्याची जबाबदारी पेलत असताना देशाच्या सुरक्षितेला पाहिजेल तेवढ लक्ष देता आलेलं दिसत नाही. देशद्रोह, ३७० ह्या गोष्टींवरच भाष्य हे संघीय राजकारणाच्या दृष्टीने घातक आहे. जातीय राजकारण अप्रत्यक्षपणे करण्याचं काम ह्या काळात नक्कीच झाल, पण देश एकसंघ ठेवण्यात तितकच यशस्वी राजकारण काँग्रेसने राजकीय पटलावर केलं.

भ्रष्टाचाराला कंटाळून देशाच्या खुंटलेल्या विकासाला चालना देण्यासाठी २०१४ साली विकासाच्या स्वप्नांसाठी सत्तापरिवर्तन झालं ते भाजपच्या माध्यमातून. स्वप्नाच्या पूर्ततेसाठी कासावीस झालेल्या देशाला स्वप्नांची मेजवानीच दाखवण्यात आली आणि बोलता बोलता ५ वर्ष झाली पण स्वप्न स्वप्नच राहिली. विकासाच्या जोरावर सत्तेच्या खुर्चीला चिकटलेल्या भाजपनेही जनतेला गृहीतच धरलं. ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करताना आपण आणलेल्या एकही योजनेचं स्पष्टीकरण न देणार सरकार भावनिक आव्हान करून देशाला पुन्हा त्याच वाटेवर नेताना दिसतंय. गेली ३० वर्ष धर्माच्या राजकारणावर राममंदिर हे आश्वासन पुन्हा एकदा आपल्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध करताना देशाला त्याच आशेवर पुन्हा नेताना दिसत आहे. विकासाची पायवाट विसरून जातीच्या राजकारणातून देशाची दिशाभूल करण्याचा अनोखा प्रयत्न करणं तितकंच लज्जास्पद आहे. लोकशाहीच्या मूलभूत स्तंभांच विकेंद्रीकरण करताना देशाला पुन्हा एकदा गृहीत धरल्याचं दिसतंय..

राजकारणाचा एक नवा अध्याय समोर आणताना देशाची गरज ओळखून गेल्या लोकसभेचे स्वप्नाचं खरं चित्र राजकीय निष्टेतून महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या माध्यमातून बघायला भेटलं. राजकीय नेतृत्व देशाला गृहीत कस धरत ते प्रकर्षाने राजकीय पटलावर यशस्वीपणे उमटवल.जनतेला दिलेली आश्वासन, स्वप्नातील विकास हा सार्वजनिक माध्यमातून पुढे कसा येतो ह्याच उत्तम 'राज'कारण करताना सत्ताधाऱ्यांची झोप मात्र नक्कीच उडवली.

राजकीय पट्टालावरचे डावपेच सामान्यांनी ओळखून, २०१९ च्या लोकसभेला आपलं मत देशाच्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी, खऱ्या विकासासाठी आणि सर्व राज्यांच्या विकासासाठी टाकावं..

डॉ. प्रशांत शिरोडे.

राजपर्व..


लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्प्याच्या मतदानाचा दिवस उजाडताना देशासह महाराष्ट्र प्रचाराने आणि अनेक सभांनी नवनवीन शैलीत रोमांचक होवून गेला. एक नवीन राजकारण महाराष्ट्र बघताना तरुण शिक्षित मतदारांना चालूघडामोडी आणि देशाची आगामी होणारी वाटचाल खऱ्या आत्मीयतेने पटवून देण्याचा एक प्रयत्न करण्यात येतोय. जे कोणाला जमलं नाही, जे कोणाला जमत नाही, जे कोणाला जमणारही नाही, असं एक नवीन राजकारणाचं पर्व जनतेसमोर आणणारा विचारी आणि अभ्यासू नेता म्हणजे "राज ठाकरे" आणि त्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण सभांच्या माध्यमातून एक राजकारणातील नवीन पर्व सुरु केलं ते म्हणजे "राजपर्व".

कदाचित माझ्या ह्या स्तंभाला राज ठाकरे समर्थक म्हणून ठरवलं जाईल पण जे मांडतोय ते अराजकीय विचाराने मांडतोय. २०१४ च्या निवडणुकात ६० वर्षाच्या काँग्रेसच्या सत्तेला कंटाळून एक नवीन सत्ताकेंद्र देशाने उभं केलं आणि त्यांनी दाखवलेल्या स्वप्नांना सत्तेच्या माध्यमातून बळ दिल. स्वप्न स्वप्नचं राहिली, नोटबंदी, जीएसटी, स्वच्छ भारत, स्टार्ट अप इंडिया, मेड इन इंडिया, स्मार्ट सिटी, आधार अश्या अनेक स्वप्नाचा खेळ मांडल्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या मतदानापर्यंत सत्ताधारी पक्षाकडून एकही शब्द आपल्या प्रचारातून न निघता निर्लजपणे देशाच्या जवानांच्या जोरावर देशाला गृहीत धरून मत मागितलं जाताना देशाला अंधारात लोटलं जातंय. मी विकास केला ह्या गोष्टीला जनतेसमोर आणायला हिंमत लागते आणि त्याच प्रेसेंटेशन म्हणजेच सादरीकरण देशात पहिल्यांदा गेल्या विधानसभा निवडणुकात मांडणारा पहिला नेता म्हणजे राज ठाकरे.. आजपर्यंतच्या इतिहासात विकासावर इतकं ठामपणे मत मांडणारा नेता भारतीय राजकारणाला लाभला नाही.

देशाचे प्रंतप्रधान, हेकेखोर शाही विकासाच्या जोरावर मत मागताना दिसत नाहीत. देशाच्या सर्वोच्च स्थानी बसल्यावर, जनतेला दाखवलेल्या स्वप्नापैकी एकही स्वप्न पूर्ण न झाल्याने जवानांच्या प्रतिमेला पुढे ठेवून देशाची भूल करतायेत, हेच राज ठाकरे भारतीय राजकारणाला नव्या वळणावर नेताना ह्याच नेत्याच्या आधीच्या आणि आताच्या व्हिडिओतून जनतेसमोर सादर करत आहेत. ह्या नवीन राजपर्वातून भारतीय राजकारणात जनतेला खोट बोलून गृहीत धरण्याचा प्रयत्न पुढील काळात होणार नाही हेच ह्यातून साध्य होईल. "ये तो लावरे व्हिडीओ" असं ऐकल्यावर सत्ताधाऱ्यात धडकी भरली जातेय म्हणून खडसे सोमय्याच्या झालेल्या स्थितीत शिक्षणाचा विनोद केलेलं मंत्री उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत. मराठी असून स्वाभिमान नसणारे खऱ्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी केविलवाणे स्वतःची समजूत काढण्यासाठी, एक उमेदवार नाही दिला पण सभा घेत आहेत अश्या नैराश्याच्या माध्यमातून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतायेत.

आपल्या सभेची उत्कृष्ट मांडणी, रक्तात असलेलं संभाषण कौशल्य, सविस्तर अभ्यास, पहिल्या खुर्ची पासून तर शेवटच्या माणसापर्यंत शब्दन शब्द पोहचवण्याची पद्धत, एकही उमेदवार उभा न करता जनतेत जावून विरोधकांपेक्षा मोठ अस्थित्व निर्माण करून देशाला नवीन राजकीय पर्व प्रस्थापित करताना एक उत्कृष्ट प्रयत्न म्हणजे राजपर्व.... देशाला ह्या विचारांच सोनं मिळेल नाही मिळेल, पण शिवरायांच्या महाराष्ट्रभूमीला आगामी विधानसभेत स्थान भेटो हीच शुभेच्छा ...

डॉ. प्रशांत शिरोडे.

नांदी नवराजकारणाची ...



लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्प्याच्या तोफा थंडावत असताना २०१९ निवडणूक एका वेगळ्या टप्प्यावर येवून ठेपली आहे. प्रचाराच्या विविध माध्यमातून, शैलीतून आपली बाजू जनमाणसांना पटवून देण्याचं काम नेहमीसारखं केलं जातंय.. कुणी भक्तीत दंग तर कुणी समजावण्यात दंग..

देशाने ६० वर्षाचा काळ काँग्रेस बरोबर अनुभवल्यानंतर अटलजींनंतर भाजपचा प्रतंप्रधान विकासाच्या आणि देशहिताच्या मुद्यांवर निवडून दिला. बोलता बोलता पाच वर्ष संपलेत पण बोलल्या गेलेल्या शब्दांची जणू बाजूच पलटली. भाजपकडून प्रचारात विकास काम आणि काँग्रेसविरहित सरकारची भूमिका मांडणं अपेक्षित असताना ३० वर्षांपूर्वीच्या मुद्यांना आणि गांधी घराण्याच्या टीकेची साद घ्यावी लागते हे बदलेल्या राजकारणाला जणू पुन्हा त्याच जागेवर आणून ठेवल्याचं दिसतंय. दुसरीकडे काँग्रेसकडे असलेल्या दीर्घ अनुभवाचा पुन्हा एकदा काश्मीर सारख्या मुख्य मुद्यात असलेला विचार जणू सामान्यांना विकासाच्या मुख्य वाटेपासून दूर नेताना दिसतोय. एकाने फेकावं आणि दुसऱ्याने सोडावं जणू लोकशाहीचा तमाशाच मांडलाय.

गेल्या आठवड्यात गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी मुद्देसूद भाषण, त्याची खरी मांडणी आणि दोन वेगळ्या परिस्थितीची चित्रफितीद्वारे दाखवलेली संकल्पना जणू नवराजकारणाची नांदीच होती. सामन्यांची होणारी फसवणूक आधीपण आणि आजपण तशीच आहे हे सत्यस्थितीवर पटवून देण्यात त्यांनी योग्य पद्धतीने जनतेला भाषणातून सांगितलं. हे सत्य कदाचित भरपूर कार्यकर्त्यांच्या पचनी पडणार नाही हे मात्र निर्विवाद सत्य आहे..

नव्या राजकारणाच्या नांदीवर लोकशाही कशी बळकट होईल, विकास खरंच कसा होईल, देश एकसंघ कसा राहील ह्या गोष्टींना ध्यानात घेणं महत्वाचं आहे.

फेकणाऱ्याने शब्द फेकत जावे,
सांगणाऱ्याने शब्द सांगत जावे,
सामान्यांनी शब्दामध्ये रोजच मरत जावे,
लोकशाहीचे हाल शब्दातूनच होत जावे..

नवराजकारणाची नांदी हि विकासासाठी, सत्यासाठी, देशहितासाठी आणि लोकशाहीसाठी महत्वाची आहे. फेकणारे, सांगणारे त्यांचं काम करतील, नमो आणि रागा ह्या मुर्खांच्या बाजारात न पडता विकास आणि नैतिकतेच्या जोरावर स्थानिक व्यक्ती पाहूनच मतदान करावं. आणि हे नसेल तर नोटा आहेच.. चला नवराजकारणाची नांदी ओळखूया आणि लोकशाहीला बळकट करूया...

डॉ. प्रशांत शिरोडे..

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...