स्वर भारतभूमीचा...



संगीताचं माणसाच्या आयुष्यात एक अभूतपूर्व महत्व आहे. संगीताला अर्थपूर्ण गाण्याबरोबर जर मधुर आवाजाची साथ मिळाली तर ते गाणं काळजाला भावून जात. तसंच रत्नांच असत, अनेक रत्नं असतात पण कोहिनूर सारखा रत्नं एकमेव द्वितीय असत. संगीतातल्या अनेक गाण्यांना अश्याच एकमेव द्वितीय रत्नाचा सहवास लाभला आणि ह्याच अभूतपूर्व स्वरांच्या जोरावर भारतभूमीला एक "भारत रत्नं" लाभलं ते म्हणजे गानकोकिळा "लता मंगेशकर".

लता दीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ साली "दीनानाथ मंगेशकर" ह्या संगीत सम्राटाच्या घरात झाला. भाऊ हृदयनाथ, बहिणी आशा, उषा आणि मीना ह्या घरातल्याच कलाकारांचं सहवास आयुष्यभरासाठी लाभला. वयाच्या पाचव्या वर्षी बालकलाकार म्हणून कला क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर वयाच्या नवव्या वर्षी गाण्याच्या क्षेत्रात प्रवेश केला. गेली सात दशके संगीत क्षेत्रातले अनेक यशाचे शिखर सर करताना मराठी, हिंदीसह भारतातल्या सर्व भाषेत तीस हजाराच्या वरती गाणी गाऊन विश्वस्थरावर अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या ह्या कलेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सुद्धा घेतली आहे.

संगीत क्षेत्रात कार्य करत असताना फिल्म फेअर, दादासाहेब फाळके, पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्रभुषणसह "भारतरत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आपल्या कारकीर्दीत १७ विविध पुरस्कारांनी २५ वेळा सन्मानित करण्याचा मान लतादीदींनी मिळाला. आतापर्यंत स्वरसम्राग्नी वर १५ पुस्तक लिहली गेली. आजच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांची बहीण मीना लिखित अजून एक पुस्तक प्रकाशित होत आहे.

महाराष्ट्राचं भूषण असलेल्या भारताच्या स्वररत्नाला नव्वदीतल्या वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा. महाराष्ट्राला तुमच्या यशोगाथेचा सार्थ अभिमान आहे. भारताची हि स्वर यशोगाथा आयुष्यभर अमर राहो ह्याच सदीच्छा.

डॉ. प्रशांत शिरोडे.

वरदान औषधाचं..


रोजच्या जीवनशैलीत बदल होताना औषध काळाची गरज केव्हा झाली हे समजलं सुद्धा नाही. आजारांची शृंखला दिवसेंदिवस वाढतच आहे आणि त्यावर संशोधन होऊन नवीन औषधाचं निर्माण होतच आहे. औषध निर्माण होत असताना त्यावर खूप मोठं संशोधन होत असतं आणि त्यानंतरच ते कुठल्याही आजारावर वापरलं जात. औषध बनवण्याचं शास्र म्हणजेच "औषधनिर्माणशास्त्र" म्हणजेच आपल्या सर्वाना ज्ञात असलेलं "फार्मसी" आणि ह्या क्षेत्रात शिक्षण घेतलेले म्हणजेच "फार्मासिस्ट". आज जागतिक फार्मासिस्ट दिवस.

भारतभूमीला औषधांचं वरदान अगदी पूर्वीपासून आयुर्वेदातूनच लाभलं आहे. आयुर्वेदिक, होमीओपॅथिक आणि ऍलोपॅथी सारख्या विविध प्रकारच्या औषध निर्माण प्रक्रिया आजच्या युगात ज्ञात आहेत. रासायनिक म्हणजेच ऍलोपॅथी प्रक्रियेतून १८९० साली "इपिनेफ्रिन" हे रक्तदाबावरील औषध पहिल्यांदा निर्माण करण्यात आलं. भारतात सण १९०१ साली बंगाल केमिकल्स अँड फार्मासुटिकल वर्क्स हि कंपनी सर्वप्रथम चालू झाली. त्यापाठोपाठ १९०३ मध्ये अलेम्बिक, १९५० मध्ये हिंदुस्थान अँटिबायोटिक कंपनी सुरु झाली.

जागतिक अर्थव्यवस्थेचं कंबरडं मुडलेलं असताना भारतीय अर्थव्यवस्था फार्मसी क्षेत्राच्या जोरावर यशस्वीरीत्या उभी होती आणि आज पण उभी आहे. भारत देश स्वतःची औषधांची गरज भागवत असताना ८०% जागतिक पातळीवर औषध निर्यात करून जगाची गरज पूर्ण करणार जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. हि सर्व प्रगती भारतात असलेल्या फार्मासिच्या ज्ञानातून आणि कौशल्यातून झाली आहे. भारत १९३१ साली पदवी शिक्षण (बी. फार्मसी), १९४० साली पदव्यूत्तर शिक्षण (एम. फार्मसी), १९४३ साली पदविका शिक्षण (डी. फार्मसी) आणि अलीकडच्या काळात म्हणजे २००८ पासून सुरु झालेला फार्म. डी. अशा सर्व अभ्यासक्रमातून तयार झालेल्या "फार्मासिस्ट" मुळे आज जगाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. आज त्याच फार्मासिस्टच्या गौरवाचा दिवस.

औषधाचं लाभलेलं वरदान सेवेच्या माध्यमातून जनमाणसापर्यंत पोहचवण्याचं काम करणारा फार्मासिस्ट. उद्योगातून व्यवसायाकडे आणि व्यवसायातून जनसेवेकडे कार्यरत असणाऱ्या सर्व फार्मासिस्टला भारतमातेची सेवा करण्याचं कार्य उत्तरोत्तर घडो ह्याच जागतिक फार्मसिस्ट दिवसाच्या शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

आतुरता आगमनाची..



प्रत्येक सणाचं एक वेगळं महत्व असत.. सण म्हंटल तर त्यात उत्साह, आनंद आणि भाव आलाच. स्वातंत्रपूर्व काळात देश इंग्रजांच्या कूटनीतीतून जातीधर्माच्या भेदात अडकला होता. लोकांना एकत्रित आणून स्वातंत्र्याच्या लढ्याला बळ देणं हि काळाची गरज होती आणि हि गरज लोकमान्य टिळकांनी ओळखली. त्यांनी १८९३ साली "गणेशोत्सव" आणि १८९५ साली "शिवजयंती" हे सण साजरा करण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणून लोकांना राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण दिली.

गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता काही वेगळीच असते. सगळीकडे घरी देव पाहुणा म्हणून वास्तवास येण्याची चाहूल लागलेली असते. वातावरण बाप्पाच्या आगमनासाठी प्रफुल्लित हर्षमय आणि उत्साहित होत. सगळीकडे स्वागताची जणू धावपळ चालू असते. बाप्पाच्या आवडीची आसनव्यवस्था आणि खाद्यपदार्थांची व्यवस्था केलेली असते. सगळं सगळं जणू वेगळच असत.

गणेशोत्सव सर्वाना एकत्रित आणण्यासाठी आणि एकत्र येऊन भक्तिभावाने देवाची प्रार्थना करण्याच्या मुख्य उद्देशाने साजरा केला जातो. पण अलीकडच्या काळात ह्या सार्वजनिक उत्साहाला कुठं राजकीय तर कुठं व्यावसायिक गोष्टींचं आवरण लागलं आहे ते जणू सार्वजनिक उत्साहाच्या मुख्य उद्देशापासून दूर घेऊन जातोय. परमेश्वर ह्या संकल्पनांना दूर करून भावश्रद्धेनं हा सण मोठ्या प्रमाणात होऊ देवो हीच सदिच्छा.

राष्ट्रीय एकात्मतेच्या उद्देशाने सुरु झालेल्या गणेशोउत्सवातून माझ्या महाराष्ट्राचं, माझ्या हिंदुस्थानाच आणि विश्वाचं कल्याण होवो आणि त्यातून "हे विश्वची माझे घर" हि संकल्पना प्रत्यक्षात येवो ह्याच मनापासून शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

सण पोळ्याचा..



आपले सर्व सण हे आपल्या आनंदासाठी असतात  आणि काही सण हे धार्मिक कारणामुळे साजरे केले जातात. पोळा हा एक वेगळा सण ज्याचं महत्व पण वेगळच आहे.. शहरी भागात हा सण क्वचितच साजरा केला जातो आणि ग्रामीण भागातला हा अतिशय महत्वाचा सण.

शेतकरी वर्षभर आपलं काबाडकष्ट करताना त्याला मोलाची साथ बैल हा प्राणी देतो. शेतातली नांगरणी, पेरणीसारखी अनेक काम ह्या प्राण्याच्या मदतीने केले जातात. शेतकऱ्यांसाठी वर्षभर कष्ट करणाऱ्या ह्याच बैलांसाठी पोळा हा सण साजरा केला जातो. वर्षभर केलेल्या मदतीचं ऋण व्यक्त करण्यासाठी शेतकरी राजा हा सण मोठ्या हौशेने साजरा करतो.

बैलांना सकाळी छान अंघोळ घातली जाते, त्यानंतर त्याला व्यवस्थित चारा आणि पाणी दिल जात. त्यानंतर बैलांना छानसे नवीन दोरीचे साज म्हणजेच मोरकी, शेल, नाथ आणि माथोडीने सजवलं जात. बैलांच्या शिंगाना कलर लावला जातो. त्यांनतर त्याच्या गळ्यात आणि पायात घुंगुरुच्या वस्तू लावल्या जातात. त्यांच्या अंगावर कलरचा साज किंवा झालर चढवली जाते. बैल जोडी पूर्णपणे सजल्यानंतर तिला हनुमानाच्या मंदिराला प्रदक्षिणा मारण्यासाठी नेलं जात नंतर घरी त्याची विधिवत पूजा करून त्यांना पुरणपोळी चा नैवेद्द दिला जातो आणि धान्य खाऊ घातलं जात.

एका प्राण्याच्या मदतीबद्दल त्याच्या कष्टांची कृतज्ञता व्यक्त करण्याचं मोठ मन शेतकरी राजा  खास सण साजरा करतो हि एक वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. ज्यांना हा सण कधी बघितला नसेल त्यांनी नक्कीच कधी ना कधी बघावं.

डॉ. प्रशांत शिरोडे.

गोविंदा आला रे आला..


गोपाळकाला, दहीहंडी जवळ आली का "गोविंदा आला रे आला" हे गाणं सगळीकडे घुमघुमूं लागत. सगळीकडे अगदी सकाळपासून दहीहंडीच्या अंतिम सरावाची लगबग आणि नवीन कीर्तिमान उभारण्याची चाहूल लागलेली असते. जसा जसा दिवस मावळतीकडे जातो तसा तसा उत्साह गगनाला भिडत जातो. रात्री श्रीकृष्ण जन्माचा आनंद आणि दहीहंडीच्या दिवशी नाचून गाऊन दहीहंडी फोडण्याचा उत्सव साजरा केला जातो..

श्रीकृष्ण जन्माचा आनंद व्हायलाच हवा कारण जर भगवान कृष्ण जन्माला आले नसते तर "भगवत गीता" नावाचं अमृत ह्या जगाला भेटलं नसत.
यशोदेच्या रूपातून आईच प्रतीक भेटलं नसत.
सुदामाच्या रूपातून मैत्रीचं प्रतीक भेटलं नसत. राधेच्या रूपातून प्रेमाचं प्रतीक भेटलं नसत आणि रुख्मिणीच्या रूपातून संसाराचं प्रतीक भेटलं नसत.

दहीहंडी म्हणजे मराठमोळ्या अस्सल मराठी माणसाचं प्रतीक. महाराष्ट्राच्या अनेक भागातून साजरा होणारा हा सण मुख्यतः मुंबई आणि उपनगरातून भव्य प्रमाणातून साजरा केला जातो. साधारणतः एक महिन्यापासून रोज संद्याकाळी कामावरून आल्यावर तरुण वृद्धांपासून सर्व मंडळी सरावात सहभागी होतात. दहीहंडी हा सण सांघिक खेळाचं, मराठी संस्कृतीचं आणि ऐकते च प्रतीक आहे आणि हा सण मोठ्या आनंदाने साजरा व्हावा हीच सदीच्छा.

अनेक विश्लेषणानंतर न्यायालयीन चौकटीतून बाहेर येऊन दहीहंडी हा सण साजरा होतोय. अलीकडच्या काळात ह्या सणाला व्यावसायिक आणि राजकीय पद्धतीची किनार लागली आहे, कुठे थरांची तर कुठे पैश्यांची स्पर्धा लागली आहे. ह्या स्पर्धेत अनेकांना शारीरिक दुखापतींना समोर जावं लागत आणि त्यातून कौटुंबिक स्वास्थ बिघडत. स्पर्धा करावी पण घरी असलेल्या आपल्या हितचिंतकांनी काळजी करून ती करावी.

असो, दहीहंडी हा मराठमोळा सण उत्सहात आणि आनंदात साजरा होवो. ह्या सणांतून ऐकते चा संदेश सर्व जातीधर्मानपर्यंत जावो. सर्व गोविंदांच आरोग्य सुरक्षित आणि आनंदी राहो ह्याच शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...