अटल अंत.



मौत कि उम्र क्या दो पल भी नही, जिंदगी सिलसिला, आज कल की नही,
मैं जी भर जिया, मैं मन से मरू, लौटकर आऊंगा, कूच से क्यो डरु...

ह्या ओळी ज्यांच्या तोंडून ऐकल्या जायच्या तो आवाज आता पुन्हा ऐकू येणार नाही. "अटल बिहारी वाजपेयी" भारताला आजतागायत लाभलेले सर्वश्रेष्ठ प्रंतप्रधान. लोकसभेत असो किंवा कुठल्याही सभेत असो अटलजींनी भाषणाची सुरवात केली की, ते बोलतच राहावे अस वाटायचं. त्यांचा भाषणातील हावभाव, सखोल अभ्यास, अचूक मुद्दा आणि बेधडक वक्तृत्व हि त्यांची वैशिष्ट्ये होती. हिंदी भाषा ऐकायची तर ती अटलजींच्या तोंडूनच. एक उत्कृष्ट पत्रकार, भावपूर्ण कवी आणि निस्वार्थ राजकारणी..

देशाचे तीन वेळा प्रतंप्रधान राहिलेले अटलजींनी १३ दिवसांचं त्यांनतर १३ महिन्यांचं आणि नंतर ५ वर्षाचं मित्रपक्षांना बरोबर घेऊन पाहिलं काँग्रेस विरहित सरकार यशस्वीरीत्या चालवून दाखवलं. आपल्या प्रंतप्रधान पदाच्या पहिल्या भाषणात पूर्व प्रतंप्रधान इंदिरा गांधी याना "लोह पुरुष" संबोधून त्यांच्या कार्याला जणू मानवंदनाच दिली. कुठल्याही प्रांतात भाषण करताना तिथल्या राज्यभाषेत भाषांची सुरवात करून लोकांची मन जिकंत असत. महाराष्ट्राचं त्यांना भलं कौतुक होत, ते नेहमी म्हणायचे महाराष्ट्रात एकमेकांना भेटलं का "राम राम " म्हणतात आणि त्यात जात धर्म काही पाहिलं जात नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि वि. दा. सावरकर ह्या विभूतींबद्दल त्यांना विशेष प्रेम होत. स्वर्गीय बाळासाहेबांच्या सूचनेने दिल्लीत लोकसभेत ह्या विभूतींचे भव्य शिल्प आणि तैलचित्र उभारण्यात आलं.

वाजपेयी जी पत्रकार असताना त्यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींबरोबर काश्मीर दौऱ्यावर असताना जे काही बघितलं ते बघून त्यांनी राजकारणात येण्याचं  ठरवलं. स्वातंत्र्यापासून काँग्रेसला एक सच्चा विरोधक भेटला. खूप प्रयत्नानंतर जनता दलातून अवघे दोन खासदार निवडून आले असताना काँग्रेसकडून त्यांना हास्यास्पद वागणूक देण्यात आली तेव्हा लोकसभेत उत्तर देताना अटलजी म्हणाले आम्ही एक दिवस बहुमताने तुमच्या बाकांवर बसू आणि तुम्ही तेव्हा ह्या बाकांवर असाल. ह्यातून त्यांचा उदंड आत्मविश्वास आणि उत्तम सकारात्मक नेतृत्व दिसत होत. आजच भाजप हे अटलजींच्या कर्तृत्वाचं फळ आहे.

अटलजी प्रतंप्रधान असताना पोखरण येथे अणुचाचणी करून देशाच्या प्रगतीत मानाचा तुरा लावला होता. कारगिल सारख्या विश्वासघातकी युद्धात सैन्याला तात्काळ पूर्ण अधिकार देऊन युद्धासाठी मजबूत पाठबळ दिल. अटलजी "भारतरत्न" ह्या पुरस्कारासाठी तुम्ही योग्य होतात, म्हणून तुम्ही दुसरे भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम सारख्या महान विचारवंताला हिंदुस्थानाचे राष्ट्रपती म्हणून तुम्ही पुढाकार घेऊन सन्मानाने विराजमान केलत.

अटलजी आज तुम्ही आमच्यात नाही पण बाळासाहेबांसारखे अद्वितीय राजकारणी भारतभूमीला सोडून गेले हि हिंदुस्थानची खूप मोठी हानी झाली जी कधीच भरून निघणार नाही. तुमच्याच शब्दात सांगायचं तर "मौत कि उम्र क्या दो पल भी नही, जिंदगी सिलसिला, आज कल की नही". तुमच्या देहाचा अंत झाला पण तुमच्या व्यक्तिमत्वाचा अंत अटल आहे...

भावपूर्ण श्रद्धान्जली.

डॉ. प्रशांत शिरोडे.

पत्र भारतमातेला...

प्रिय भारत माता,

आज तुझ्याशी खूप बोलावसं वाटतंय. सभोतालच वातावरण बघून मला तुझ्याशी बोलून मन मोकळं करावस वाटतंय. तू थोडं माझ्या मनातील भावनांना समजून घे. नेहमी तुज्या लेकरांना पदरात मायेनी कुरवाळून घेते तशी मला हि कुरवाळून घे.

"जन गण मन अधिनायक जय हे" नुसती राष्ट्रगीताची धून कानावर आली तरी छाती अभिमानाने भरून येते. "रवींद्रनाथ टागोरांनी" तुज्या वैशिष्ट्यांच वर्णन अगदी अचूक शब्दात केलय. अगदी हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत सगळ्या प्रांतांची, विविध वैशिष्ट्यांची रचना ह्या अभिमान गीतात आहे. भाषावर प्रांतरचना, प्रांतवार वेशभूषा, खाद्यपदार्थात विभिन्नता, वातावरणातील रचनात्मकता, अश्या अनेक विविधतेतून तुजी एकतेची शिकवण सर्व गोष्टींना एकसंघ ठेवते.
 
स्वातंत्र्याच्या गौरवदिनी ७२ वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला तर खूप असह्य झाल्यासारखं होत. नुसतं इंग्रजांनीच नाही तर अनेक परकीय शक्तींनी तुला फार वर्षांपासून घेरलं होत. जगाच्या पाठीवर तू एकमेव आहेस जिथे मातृभूमीला आई समान मानलं जात आणि अभिमानानं म्हंटल जात "भारत माता कि जय". आई बद्दल असलेलं प्रेम, भावना आणि आत्मीयता हि दुसऱ्या कुठल्याच नात्यात नसते. जस आईच आणि तिच्या बाळाचं नातं हे अवर्णनीय असत, तस तुज आणि सर्व भारतीयांचं नातं आहे.

परिकीयांचं आक्रमण, पारतंत्र्याची दाहकता सोसलेली असताना स्वातंत्र्यानंतर तुजी शांततेची आणि सलोख्याची अविरत इच्छा पाहिजेल तशी पूर्ण होताना दिसत नाहीये. तुज्या लेकरांकडून कळत नकळत काही असमर्थनीय गोष्टी घडताना दिसतायेत त्यात प्रामुख्याने स्त्रीयांवर होणारे अत्याचार, धार्मिक तेढ, जातीय असमतोल, प्रांतीय वाद, राजकीय स्वार्थ आणि ह्यामुळे तुज्या ऐक्याच्या प्रतिमेला तडा जाताना दिसतोय. कुठं तरी तुजी शेकडो वर्षांची संस्कृती दिवसेंदिवस संस्कारांच्या अभावामुळे लोप पावताना दिसत आहे. लोकसंख्या, अस्वच्छता, असभ्यता तुज्यातल्या गौरवला काळिमा फासत आहे.

प्रगतीच्या पथावर विकसनशील राष्ट्राकडून विकसित राष्ट्राकडे जाण्यासाठी तुज्या लेकरांना सामंजस्याची बुद्दी दे. देश, देव आणि धर्मासाठी बळ दे. नैसर्गिक आपत्तीतून सर्वाना सावरण्याचा सामर्थ्य दे. सत्कार्य करण्याची आणि तुजी सेवा करण्याची बौद्धिक प्रगल्बधता दे.

तुज्या अस्मितेचा तिरंगा "पिंगाली व्यंकय्या" यांनी खूप मनापासून बनवला पण आज त्याचा निळा, माझा भगवा आणि तुजा हिरवा ह्यातच आम्ही व्यस्त असताना प्रश्न पडतो कि तिरंगा कोणाचा सीमेवर फडकणारा तिरंगा हा तिथल्या वाऱ्यामुळे नाहीतर सैनिकांच्या श्वासामुळे फडकतोय. जर सैनिकांचे श्वास ह्या तिरंग्याला मोठ्या अभिमानाने उंच ठेवतात मग हा तिरंगा त्यांचाच का?

भारत माते तुज्या सेवेचं आणि तुजी इच्छा पूर्ण करण्याचं मातीतून आलेलं संस्कारांचं कर्म हातून घडून तुज्या यशोगाथेला हातभार लावू दे हीच मनोभावे इच्छा..

तुझाच..
एक भारतीय..

डॉ. प्रशांत शिरोडे.

मैत्री..


जगाच्या पाठीवरच रक्ताचं नसून रक्तापेक्षा जास्त जवळच नातं म्हणजे मैत्री.. मैत्रीसाठी विचारांची सांगड जुळणं हा एक सर्वसाधारण सोपा नियम. मैत्रीत जे व्यक्त करू शकतो ते दुसऱ्या नात्यात व्यक्त करायला तितकं शक्य नसत.

मैत्री व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा तरुणाईचा अलीकडच्या काळातला सण म्हणजे "मैत्री दिवस" म्हणजेच "फ्रेंडशिप डे". आता प्रश्न पडतो कि हा दिवस साजरा करावा लागतो? तसं मग मदर्स दे, फादर्स डे असे नवीन नवीन सण गेल्या १०-१५ वर्षात जगाच्या पाठीवर साजरे होऊ लागले त्यातलाच एक फ्रेंडशिप डे. पाश्चत्य देशात अश्या सणाची गरज पडू लागली कारण त्यांना संस्कृतीचा वारसा नव्हता आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ते असे सण साजरा करू लागले आणि आपण हि त्याला स्वीकारू लागलो. आपल्याकडे संस्कृतीच्या वारसामुळे अनेक सण आहेत पण आपण पाश्चत्य सणांना क्षणिक आनंदासाठी साजरा करू लागलो आणि आपल्या मूलभूतं चालीरीतींपासून तत्त्वता दूर होऊ लागलो हे तितकच कटू सत्य आहे.

फ्रेंडशिप डे १९१९ च्या सुमारास पहिल्यांदा साजरा करण्यात आला कालांतराने २०११ साली अमेरिकेच्या संसदेने ३० जुलै हा "जागतिक फ्रेंडशिप दिवस" म्हणून साजरा करण्याचं जाहीर करण्यात आलं. भारतात हा सण ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. तरुणाईचा हा सण रविवार असला तरी महाविद्यालयांचे आवार मैत्री व्यक्त करण्यासाठी भरगच्च भरलेले असतात. आपल्या कडे तस वयक्तिक नातं व्यवस्थित रित्या सांभाळलं जात आणि मैत्रीचं तर खूप छान पद्धतीने निभावलं जात. तरी मग आपल्या देशात हे खूप जास्त प्रमाणात का साजर केलं जात?

आपल्या देशात मैत्रीची अनेक प्रमाण आहेत ज्यात श्रीकृष्ण सुदामा, शिवाजी महाराज आणि मावळे, संभाजी राजे आणि कवी कलश, भगतसिंग राजगुरू सुखदेव. गरिबीची जाणीव न होऊ देता मैत्रीसाठी सुदामाचे पोहे आनंदाने खाणारा देव श्रीकृष्ण, पोटच्या पोराचं लग्न असताना स्वराज्यासाठी कोंडाणा जिकंण्याचं शिवरायांचं स्वप्न पूर्ण करून स्वर्गवासी होणारे तानाजी, शरीराराचा तुकडा तुकडा झाला पण तरी शेवटपर्यंत कवी कलशांची संभाजी महाराजांच्या मैत्रीची दिलेली साथ, स्वातंत्र्यासाठी फासाचा दोर गळ्यात पहिले जाण्यासाठी भांडणारी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेवची मैत्री. हि सर्व नाती शेवटच्या श्वासापर्यंत मैत्रीसाठी जगत होती आणि अशी एकाहून एक उदाहरण असताना आम्ही मैत्रीचा दिवस साजरा करतो..?

असो ह्या मैत्रीच्या दिवसातून जर नाती वाढत असतील, नाती टिकत असतील, नाती जुळत असतील तर नक्कीच हा सण साजरा व्हावा..
मैत्री दिनाच्या शुभेच्छा...

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...