ने मजसी ने मातृभूमीला...


वीर सावरकरांच्या ह्या काव्याची जाण मातृभूमीपासून दूर असल्यावर नक्की होते. आपल्या भूमीची, आपल्या माणसांची जाण परदेशात गेल्यावरच होते.

थायलंड आशिया खंडात येणारा देश. बँकाँग येथील स्वर्णभूमी आंतराराष्ट्रीय विमानतळावर पोह्चल्यावरच "स्वर्णभूमी" ह्या नावातच आपल्या ओळखीचा शब्द असल्याची जाण झाली. ह्या देशात कुणीही कुणाला भेटलं तर त्याला "सवसदिका"  म्हणजेच वाकून हाथ जोडून नमस्ते करतात. ते बघून मन अजूनच विचारांच्या विश्वात अडकलं कि ह्यांची नमस्कार करण्याची आणि आपली पद्धत सुद्धा एकच. रस्त्याने जाताना मंदिरा  सारखं काही तरी दिसू लागलं आणि बँकाँग मधील "वाटफॊ" ह्या मंदिरात जायचा योग आला.  गेल्यावर तर माझ्या विचारांना अवाक झाल्यासारखं झालं. मंदिर होत ते गौतम बुद्धाचं आणि हा देश बुद्धांच्या विचारांवर चालणारा देश. मंदिरात गेल्यावर आपल्या मंदिरांसारखा मंत्रघोष होत होता आणि मग माझ्या मनातील प्रश्नाचं उत्तर भेटलं. ज्या पावन भूमीत गौतम बुद्ध जन्मले त्या भूमीचे गुण ह्या भूमीत असतीलच... थोडं आपलं काहीतरी असल्यासारखं वाटलं..

बँकॉक मधला पहिला दिवस हा भारतीय जेवणाच्या शोधात होता आणि तो प्रश्न लवकर सुटला. हॉटेलच्या जवळच भारतीय उपहारगृह खूप होती आणि जेवण भारतासारखच, मग काय आनंद गगनात मावेनासा झाला. हॉटेल मध्ये हिंदीतच विचारलं गेलं तुम्हाला काय खायचं? खूप छान वाटलं. बँकॉक मध्ये इंद्रा मार्केट मध्ये गेल्यावर तर ते हिंदीतच बोलत होते, जणू मुंबईतल्या फॅशन स्ट्रीटवरच फिरतोय का अस  क्षणभर वाटलं. मन रमायला सुरवात होत होती. इंद्रा मार्केटजवळच "बायोक टॉवर" नावाची जगातली ४२ क्रमांकाची उंच इमारत बघितली. दुसऱ्या दिवशी जहाजावर जेवणाचा आनंद घेण्यासाठी गेलो. खास भारतीयांसाठी ते क्रूझ होत आणि जेवणासोबत भारतीय गाण्यावर नाचण्याचा आणि बँकॉक शहराचा आनंद घेता येत होता. गाणी म्हंटली तर अगदी "झालं झिंग झिंग झिंगाट" सुद्धा वाजलं. मग तर आनंद कुठं पोहचला याच भानच नाही राहील. त्यानंतर पुढच्या दिवशी पटाया शहरात गेलो आणि बघतो तर काय हॉटेल मधेच नाश्त्यासाठी भारतीय मेनू आणि बाहेर खूप सारे भारतीय जेवणाची उपहारगृह होती.

सगळा हा आनंद लुटत असताना जाण्याच्या एक दिवस अगोदर मातृभूमीची आस लागली. मन म्हणू लागलं बस झालं आता आपल्या देशात जावं. शेवटचा दिवस काढायचा म्हणून काढला. परतीच्या प्रवासाची चाहूल लागली आणि राहवलं गेलं नाही म्हणून स्वर्णभूमी विमानतळावरच हि लेखणी लिहून टाकली. खरंच मनापासून सावरकरांच्या काव्याची जाण झाली आणि जीव जाण्यासाठी तळमळला..

डॉ. प्रशांत शिरोडे..

लालपरी..



महाराष्ट्रात फिरायला तशी मज्जाच खूप येते. कधी उन्हातून, कधी सावलीतून, कधी नदीतून, कधी डोंगरातून, कधी जंगलातून तर कधी छान रस्त्यातून.. महाराष्ट्रात फिरताना महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या लाल रंगाच्या गाडीतून प्रवास करण्याचा नेहमीच योग येत असतो. हि लाल रंगाची गाडी शहरापासून ते खेड्यापर्यंत, चांद्या पासून ते बांद्या पर्यंत, मुंबईपासून ते नागपूर पर्यंत, नाशिकपासून ते सावंतवाडीपर्यंत निस्वार्थ धावत असते. महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांच्या प्रमुख शहरात सुद्धा ती रोज धावत असते.

राज्याच्या विकासात अतिशय महत्वाचं योगदान ह्या लाल रंगाच्या एस टी बसच म्हणजेच लालपरीच आहे. दिवस रात्र न पाहता लोकसेवेचे अखंड व्रत जणू ह्या गाडीनं घेतलंय. हि एस टी बस लाल रंगापासून हिरवा, निळा ह्या रंगात पण अलीकडच्या काळात धावली. परिवर्तन, एशियाड, शिवनेरी, अश्वमेध आणि आता शिवशाही अश्या अनेक रूपात ती काळानुसार बदलते सुद्धा आहे. ४५ प्रवासी क्षमता असताना कधी एकदोन प्रवासी तर कधी ६५ ते ७० प्रवासी घेऊन जाते. प्रवासी असो वा नसो तरी ती आपल्या वेळात धावतेय. अनेक चालक आणि वाहक यांचं घर तीच चालवतेय. ती अनेकांची जीवनदायिनी आहे.

लालपरी आमची सेवा करते पण आम्ही तिच्या बद्दल तितके संवेदनशील नसतो. तिचे शीट्स कधी फाडतो, तिच्यावर कधी पेनाने लिहतो, कधी तिच्यात तंबाखू खाऊन थुकतो. हे कमी पडलं तर कधी हिंसाचारात तिला तोडतो, फोडतो, जाळतो. कारण काहीही असो पण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आम्ही तिलाच इजा पोहचवतो. नेहमी हे घडत असताना सुद्धा ती तिची सेवा चालूच ठेवते पण आम्ही कायमस्वरूपी सवेंदनशील होत नाही. विचार तर करायलाच हवा लालपरी सार्वजनिक सेवा करताना तीच नुकसान करणे म्हणजे हे आपलेच नुकसान होते. संवेदनशील होऊन लालपरीला मुक्तपणे तिची सेवा करू देणं आपलं कर्तव्यच समजायला हवं.

लालपरी अनेक वर्षांपासून अविरत धावल्यामुळे तिची आसण खिळखिळी होतात, खिडक्या तुटतात, धावण्याचा वेग कमी होतो. हे सगळं होत असताना ती आपलं काम करत असते आणि आपण तिला लाल डब्बा म्हणून साहजिकच बोलतो. होय तीच हे रूप प्रवासासाठी योग्य जितकं नाही तितकं आपलं तिला लालडब्बा उचारण पण योग्य नाही.

काहीही असो हि लालपरी महाराष्ट्राची सेवा कित्येक वर्षांपासून करतेय. आज तीच रूप काळानुसार बदलता बदलता शिवशाही सेवेपर्यंत आलं. जणू शिवरायांच्या स्वराज्यात काळानुसार बदल झालेत तशेच बदल करून शिवशाही आत्मसात करून लालपरीन जणू प्रवासाचंच रूपच बद्दल. काहीही असो पण लालपरीचा प्रवास करण्याची मज्जाच न्यारी. लालपरी अशीच वर्षोनुवर्ष चालत राहो आणि प्रवाश्याना प्रवासाचा आनंद देत राहो..

डॉ. प्रशांत शिरोडे..

माझा महाराष्ट्र....

माझा महाराष्ट्र....
म्हंटल तरी मनात स्वाभिमान आनंदाने भरून येतो. महाराष्ट्र म्हंटलं तर स्वाभिमान आलाच. संतांच्या ज्ञानगाथेपासून ते शिवरायांच्या यशोगाथेपर्यंत, स्वातंत्र्यसैनिकांच्या लढ्यापासून ते भारतीय सैन्यदलापर्यंत, साहित्याच्या वारसापासून ते कलेच्या उत्कर्षापर्यंत, संस्कृतीपासून ते सण उत्साहापर्यंत, विज्ञानापासून ते औद्योगिक क्षेत्रापर्यंत, निसर्गापासून ते धार्मिक स्थळापर्यंत, सह्याद्रीपासून ते हिमालयापर्यंत.. प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक मनात.. फक्त आणि फक्त माझा महाराष्ट्र..

भारतभूच्या गर्वाच्या शृखंलेत अभिमानच पुष्प नेहमीच वाहणारा महाराष्ट्र. नावातच महा म्हणजे मोठेपणाच राज्य असलेलं राष्ट्र. निसर्गाने सुद्धा भरभरून प्रेम केलेलं राज्य, कोकणची किनारपट्टी आणि सहयाद्रीच्या पर्वतरांगा जणू महाराष्ट्राला निसर्गाने सौंदर्याचा अलंकार चढवलाय. शेतीतल्या विविधतेतून सर्व प्रकारची उत्पन्न घेताना कांदा, द्राक्ष, केळी ह्या पिंकांमध्ये अग्रेसर असणार राज्य. औद्योगिक क्षेत्रात देशाचं नेतृत्व करणार राज्य. धार्मिक जपवणुकीत चार ज्योतिर्लिंग, साडे तीन शक्तीपीठ, अष्टविनायक सारखी अनेक धार्मिक स्थळ लाभलेली भूमी. संस्कृतीचा वारसा जपताना सण उत्साहातून परंपरेची जपवणूक करणारी भूमी. संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूमीने संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव दिलेत.

सर्व राज्यांना भूगोल आहे मात्र महाराष्ट्रभूमीला भूगोलाबरोबर स्वाभिमानाचा शिवरायांचा इतिहास आहे. ह्याच भूमीने स्वराज्य स्थापनेसाठी जिजाऊ दिल्या, जनतेच्या कल्याणासाठी राजा शिवराय दिलेत आणि स्वाभिमानाचा इतिहास घडवण्यासाठी शंभूराजा दिला.

स्वातंत्र्यसैनिकांनी खरी चळवळ ह्याच भूमींनी केली त्यात लोकमान्य टिळक, महात्मा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे वीरपुरुष दिलेत. भारतभूमीच्या संरक्षणकरता मराठा बटालियन आणि महार रेजिमेंट हि दोन सैन्यदलाची सेवा करणारी शाखा ह्याच भूमीने दिलीत. म्हणूनच म्हंटल जात जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज पडते तेव्हा तेव्हा सहयाद्री खंबीरपणे पाठीशी उभा राहतो.

साहित्यक्षेत्रात कुसुमाग्रजांसारखे अनेक दिगज बहाल करताना भाषेचं म्हणजेच मराठी साहित्य संमेलन प्रत्येक वर्षी साजरी करणारी एकमेव भूमी. कलाक्षेत्रात लता मंगेशकरांसारख्या अनेक महान कलाकारांना कलेचा वारसा देणारी भूमी. भारतीय चित्रपट श्रुष्टीचे निर्माते दादासाहेब फाळके सारखे महान कर्तृत्वान लोक देणारी भूमी. क्रीडा क्षेत्रात सचिन तेंडुलकर सारखा सर्वोत्तम खेळाडू देणारी भूमी. विज्ञानात विशेष योगदान देताना जयंत नारळीकरांसारखे अनेक विद्याविभूषित देणारी हि भूमी. उद्योग क्षेत्रात रतन टाटा सारखे उत्तम व्यावसायिक देणारी भूमी.

पहिल्या महिला शिक्षिका सावित्रिबाई फुले आणि महिलांना शिक्षण, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील देणारी भूमी.

हिंदुस्थानाच्या राजकारणाचा मुख्य गाभारा सांभाळणाऱ्या महाराष्ट्रभूमीने यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांसारख्या अनेक राजकीय धुरंदराना दिल.

मुंबईसह महाराष्ट्र मिळविण्यासाठी ज्या १०५ हुतात्म्यांनी प्राण गमावले त्यांचं योगदान हे अवर्णनीय आहे कारण त्यांच्या बलिदानामुळे आपली मुंबई दिमाखानं महाराष्ट्रात आहे. बेळगाव कारवार सह अखंड महाराष्ट्र व्हावा हीच अपेक्षा. विदर्भ आमचाच आहे आणि तो आमच्यातच राहो ह्या सदीच्छा.

महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...