राजा माणूस...



छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीला पडलेलं अदभूत आणि अविस्मरणीय जिवंत स्वप्न. संपूर्ण भारत वर्षात शिवरायांचा इतिहास शौर्याची, कर्तृत्वाची आणि नेतृत्वाची शौर्यगाथा शिकवून गेला. आजही त्याच इतिहासाच्या सुवर्णपानांना डोळ्याखालून घालतांना अंगावर रोमांच उभा राहतो..

रयतेच्या मनातील स्वराज्याची उभारणी करून रयतेच्या मनात एक वेगळा आत्मविश्वास शिवाजी महाराजांनी निर्माण केला. बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींना बरोबर घेऊन रयतेला आपलं आपलंस वाटणार स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज.. महाराज रयतेला अगदी सहजपणे भेटून रयतेच्या मनातील गोष्टींना समजून घेत असत आणि त्यामुळे रयत खुश होत असत. असाच अविस्मरणीय अनुभव खासदार छत्रपती संभाजी महाराजांना भेटून आला.

खासदार छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज. छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांच्या घराण्यातील छत्रपती घराण्याला शोभणारा राजा माणूस. एक उत्तम शरीरयष्टी असून चेहऱ्यावर एक वेगळं तेज असणारा शोभिवंत राजा माणूस. सामन्यातील सामान्य माणसाशी अगदी सहजपणे बोलणारा राजा माणूस. छत्रपतींच्या घरात जन्माला येवून छत्रपतींच्या वागणुकीला आत्मसात करून रयत हित जोपासणारा राजा माणूस.

स्वतःला राजा म्हणावं किंवा स्वतःला खासदार म्हणून मानपान द्यावा किंवा छत्रपतींचा वारसदार असल्यानं विशेष वागणूक मिळावी अशा  कुठल्याही अपेक्षा न ठेवणारे संभाजी राजे. उच्चविभुषित असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणून येत. त्यांच उत्तम मराठी किंवा इंग्रजी भाषेतील संभाषण मनाला भावून जात. समोरच्याच म्हणणं अगदी शांतपणे ऐकून त्याच्या मनाचं समाधान करण्याचा त्यांचा प्रयत्न काही वेगळाच असतो.

एका ऐतिहासिक पुस्तकाच्या संदर्भात त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. त्यांना भेटल्यानंतर छत्रपतींचा वंशज इतका प्रभावी असेल तर छत्रपती शिवाजी महाराज कसे असतील? याचा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. स्वतःला राजा न म्हणून घेता स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आणि छत्रपती घराण्याचा वारस असल्यामुळे समाजाचं आपण देणं लागतो अशी मनाशी भावना ठेवणाऱ्या छत्रपती वारसदार छत्रपती संभाजी राजांना मानाचा मुजरा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

रामराज्य..




संपूर्ण भारत वर्षांत एक चैतन्याच वातावरण दिसून आलं. गेल्या पाच शतकांपासून ज्या गोष्टीची आस साऱ्या जगाला लागली होती ती गोष्ट प्रत्यक्षात घडली. राममंदिराच्या भूमिपूजनाचा अदभूत क्षण सर्वानी अनुभवला. अखंड हिंदुस्थानाच श्रद्धास्थान प्रभू श्रीरामांच्या जन्मांस्थानावरच काही अपप्रवृतींनी विघातक कृत्य करत हिंदुस्थानच्या इतिहासाला काळा डाग लावला होता. स्वतःच्या जन्मठीकाणासाठीच प्रभू रामाला ५०० वर्षाचा वनवास भोगावा लागला.

असो रामराज्य म्हणजे ज्या राज्यात सगळीकडे आनंदाच, चैतन्याच, मांगल्याचं वातावरण होत. प्रभू श्रीरामाच्या सानिध्यात सारा भारतवर्ष रामायणाचे पाठ रचत होता आणि एक भारतीय जीवनपद्धती घडवत होता. ह्या सर्व इतिहासाची सुरवात जिथून झाली ती म्हणजे शरयू तीरावरील अयोध्या नगरी. प्रभू श्रीराम त्याच नगरीत जन्माला आले. त्यांच्या आठवणीत त्यांच्या जन्मस्थळी मंदिर उभारण्यात आलं पण १५ व्या शतकात बाबरची काळी नजर त्यावर पडली आणि त्याने इतिहासाला तडा पोहोचवला. सुखासमाधानाने राहणाऱ्या भारतवासीयांमध्ये धर्माची तेढ त्यातून निर्माण करण्यात आली आणि ती आजतागायत चालत आली. 

स्वातंत्र्यानंतरच्या काळात ह्या भावनिक श्रद्धेकडे विशेष लक्ष दिलं गेलं. पुरातत्व खात्याने के. के. मोहम्मद यांच्या देखरेखीखाली उत्खनन करून तिथे मंदिर असल्याचं स्पष्ट केलं. ह्या सर्व गोष्टींना वि. पराशरण ह्या वकिलाने न्यायदेवतेसमोर पटवून देण्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य खर्च केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, शिवसेना आणि भाजप सारख्या अनेक धार्मिक आणि राजकीय गटांनी त्याच समर्थन केलं. लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयींसारख्या विभूतींनी ह्यात विशेष लक्ष दिल. 

अनेक भारतीयांनी संयम दाखवत ह्या मंदिर निर्माणाला पाठबळ दिल. खासकरून मुस्लिम बांधवानी ह्यात विशेष सहयोग दिला. अनेक दशकापासून हिंदुस्थानच्या प्रगतीसाठी काही गोष्टी अडसर ठरत होत्या त्यातील एक मोठी गोष्ट आज मार्गी लागली. देशात सलोखा राहिला तर देश प्रगतीपथाकडे नक्कीच जाईल. वर्षोनुवर्षे चालेल्या अश्या अनेक मुद्द्यांवर लवकरात लवकर तोडगा निघो आणि हिंदुस्थानच्या भूमीला सलोख्याचे एकतेचे सोनेरी दिवस येवो हि प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना.

रामाच्या जन्मस्थानाचा वनवास संपवून रामलल्ला पुन्हा दिमाखात विराजमान होतील. ह्या प्रवासात  सरकार म्हणून विशेष लक्ष देत प्रंतप्रधान नरेंद्र मोदींनी ह्या मंदिर निर्माणाला मार्गस्थ लावून एक नवीन आदर्श निर्माण केला. आता लवकरात लवकर राममंदिर प्रत्यक्षात साकार होवो आणि रामराज्याचे दिवस पुन्हा येवो ह्याच सदीच्छा...

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...