शत-प्रतिशत



एक्सिट पोल म्हंटल कि किती विश्वास ठेवावा आणि किती नाही तेच समजतं नसत. आताच पाच राज्यांच्या निवडणूका झाल्या आणि त्यात एक्सिट पोल गेल्या चारवर्षांपेक्षा थोडे वेगळेच आले. सत्ताधारी पक्षाने नेहमीप्रमाणे विजयरथाची चाक तयारच ठेवली होती आणि दुसऱ्या पक्षांनी आपली मनाची धास्ती मनात जागीच राहू दिली होती. पाच राज्यांच्या निवडणुकीचा एक्सिट पोल प्रत्यक्षात कितपत खरा ठरतो ह्याची प्रतीक्षा आज संपली आणि निकाल जवळजवळ एक्सिट पोलच्या अनुमानानुसार लागला आणि सत्ताधारी पक्षाची विजयरथाची चाक जागेवरच उभी राहिली.

सत्ता एक अशी गोष्ट आहे जिचा उपयोग केला तर सन्मान होतो आणि दुरुपयोग केला तर अपमान होतो. ६० वर्ष सत्ता भोगणारी काँग्रेस सत्तेच्या नशेतून जनतेने उतरवली आणि त्याच सत्तेची नशा भाजपालासुद्धा लवकर चढली आणि जनतेने एकाच वेळेस त्यांची हि नशा ह्या निवडणुकीत उतरवली. २०१४ नंतरच्या कुठल्याही निकालानंतर भाजप कार्यालयासमोर मंडप, फटाके आणि जलोषाबरोबर प्रतंप्रधानाचं भाषण व्हायचं, आज मात्र सगळं शांत होत आणि जिथे शुकशुकाट असतो तिथं आज जलोषाच वातावरण बघायला भेटत होत. कदाचित सत्ताधीशाना जनता जनार्दनाचा कल आतातरी चांगलाच समजलेला दिसतोय, असं ह्यातून समोर येतंय.

सत्तेवर असताना जनता जनार्दनाचा विचार न करता हुकूमशाही दाखवणं महागातच पडत. जनता सत्तेत बसवते, पण त्या सत्तेचा उपद्रव केला तर खालीही खेचते हे आजच्या निकालावरून स्पष्ट होताना दिसतंय. आंतरराष्ट्रीय स्थरावर देशाचं नाव वरती नेताना राष्ट्रीय स्थरावर सामन्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे शत प्रतिशत पराभव स्वीकारावाचं लागेल. राम मंदिर, पाकिस्तानला समज, काश्मीरचा कायदा यांचा विसर आणि नोटबंदीसारखे अनेक हेकेखोरपणाने नियोजनशून्य घेतलेले निर्णय ह्या निवडणुकीतून निकालात अवतरले.

मोदी-शहा जोडीने ह्या निकालानंतर एका राज्यापुरताचा विचार सोडून संपूर्ण राष्ट्राचा विचार प्रामाणिकपणाने करून जनतेच्या मनातील, भाजप अंतर्गत नेत्यांच्या सहमतीने, मित्र पक्षांबरोबर कूटनीती न करता हेकेखोरपणा सोडला तर नक्कीच शत-प्रतिशत राहतील. शेवटी भाजप जर दुसरं काँग्रेस होत असेल तर जनता त्यांना शत-प्रतिशत घरचा रस्ता दाखवेलच..

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...