तंत्रज्ञानाच्या मानगुटीवर..



कोरोनाच्या महासंकटात माणूस खूप वेगळ्या दुनियेचे अनुभव घेतोय. घरात थांबून माणूस जगाची सफर करतोय. दुसऱ्याच्या जगण्याची चिंता करण्याअगोदर स्वतःच्या जीवाची काळजी घेतोय. त्यामुळेच माणसाने स्वतःला घरात कोंडून घेतलंय. रोजचं काम म्हटलं तर ऑफिसला जाण्यापासून तर घरी परतण्यापर्यंत सगळं घरात बसूनच चाललंय. "वर्क फ्रॉम होम" म्हणजेच घरी राहूनच काम करणं शक्य होतंय ते तंत्रज्ञानामुळे..

अरे हा तंत्रज्ञानामुळे खूप काही चालतंय. आज टीव्हीवर बातमी ऐकली आणि मन हळहळल. बातमी होती ती एका मृत्यूची. कोरोनाच्या महासंकटात पतीच्या निधनानंतर पत्नीला प्रवासास शक्य नसल्यामुळे पतीचं अंतिम दर्शन मोबाईलवरच घेतलं. ज्याच्याबरोबर उभं आयुष्य घालवलं त्याच जिवलगाबरोबर अंतिम क्षणाला प्रत्यक्षात मुकावं लागलं, पण मनाला कुठेतरी समाधान म्हणून मोबाईलच्या विडिओ कॉलद्वारे म्हणजेच तंत्रज्ञाने ती इच्छा भरून काढली.

माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आय टी क्षेत्राचा उल्लेख कुठेही होतांना दिसत नाहीये. थांबलेल्या शहरांना, गावांना चालविण्यासाठी आय टी क्षेत्र मोलाची भूमिका बजावत आहे. बँक, मोबाइल, टीव्ही, मीडिया, कंपनी सारखे अनेक विभाग यांच्याच जोरावर चालू आहेत. घरात बसून बोर होण्यापेक्षा इंटरनेटवरची सर्फिंग ह्या कठीण काळात दिवस घालवताना दिसतेय. काही क्षेत्र माणसा अभावी थांबलेत पण बरेचशे क्षेत्र आय टी मुळे चालू आहेत.

ह्या संकटाच्या काळात हॉस्पिटलमधील सॉफ्टवेअर असो वा सरकारने बनवलेले आरोग्यसेतू अँप असो सर्व काही ह्या आय टी मुळे  झालं. सर्वांचे आभार मानताना ह्या लॉक डाऊन मध्ये ह्या आय टी क्षेत्राचे पण आभार मानायला हवेत. कारण त्यांचा कर्मचारी वर्ग राबतोय म्हणून तंत्रज्ञानाच्या मानगुटीवर बसून भरपूर प्रमाणात काम होतांना दिसतंय, नाही तर सर्वच डुबल असत.

सर्व आय टी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना एक सलाम..

डॉ. प्रशांत शिरोडे.

३ टिप्पण्या:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...