रामराज्य..




संपूर्ण भारत वर्षांत एक चैतन्याच वातावरण दिसून आलं. गेल्या पाच शतकांपासून ज्या गोष्टीची आस साऱ्या जगाला लागली होती ती गोष्ट प्रत्यक्षात घडली. राममंदिराच्या भूमिपूजनाचा अदभूत क्षण सर्वानी अनुभवला. अखंड हिंदुस्थानाच श्रद्धास्थान प्रभू श्रीरामांच्या जन्मांस्थानावरच काही अपप्रवृतींनी विघातक कृत्य करत हिंदुस्थानच्या इतिहासाला काळा डाग लावला होता. स्वतःच्या जन्मठीकाणासाठीच प्रभू रामाला ५०० वर्षाचा वनवास भोगावा लागला.

असो रामराज्य म्हणजे ज्या राज्यात सगळीकडे आनंदाच, चैतन्याच, मांगल्याचं वातावरण होत. प्रभू श्रीरामाच्या सानिध्यात सारा भारतवर्ष रामायणाचे पाठ रचत होता आणि एक भारतीय जीवनपद्धती घडवत होता. ह्या सर्व इतिहासाची सुरवात जिथून झाली ती म्हणजे शरयू तीरावरील अयोध्या नगरी. प्रभू श्रीराम त्याच नगरीत जन्माला आले. त्यांच्या आठवणीत त्यांच्या जन्मस्थळी मंदिर उभारण्यात आलं पण १५ व्या शतकात बाबरची काळी नजर त्यावर पडली आणि त्याने इतिहासाला तडा पोहोचवला. सुखासमाधानाने राहणाऱ्या भारतवासीयांमध्ये धर्माची तेढ त्यातून निर्माण करण्यात आली आणि ती आजतागायत चालत आली. 

स्वातंत्र्यानंतरच्या काळात ह्या भावनिक श्रद्धेकडे विशेष लक्ष दिलं गेलं. पुरातत्व खात्याने के. के. मोहम्मद यांच्या देखरेखीखाली उत्खनन करून तिथे मंदिर असल्याचं स्पष्ट केलं. ह्या सर्व गोष्टींना वि. पराशरण ह्या वकिलाने न्यायदेवतेसमोर पटवून देण्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य खर्च केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, शिवसेना आणि भाजप सारख्या अनेक धार्मिक आणि राजकीय गटांनी त्याच समर्थन केलं. लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयींसारख्या विभूतींनी ह्यात विशेष लक्ष दिल. 

अनेक भारतीयांनी संयम दाखवत ह्या मंदिर निर्माणाला पाठबळ दिल. खासकरून मुस्लिम बांधवानी ह्यात विशेष सहयोग दिला. अनेक दशकापासून हिंदुस्थानच्या प्रगतीसाठी काही गोष्टी अडसर ठरत होत्या त्यातील एक मोठी गोष्ट आज मार्गी लागली. देशात सलोखा राहिला तर देश प्रगतीपथाकडे नक्कीच जाईल. वर्षोनुवर्षे चालेल्या अश्या अनेक मुद्द्यांवर लवकरात लवकर तोडगा निघो आणि हिंदुस्थानच्या भूमीला सलोख्याचे एकतेचे सोनेरी दिवस येवो हि प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना.

रामाच्या जन्मस्थानाचा वनवास संपवून रामलल्ला पुन्हा दिमाखात विराजमान होतील. ह्या प्रवासात  सरकार म्हणून विशेष लक्ष देत प्रंतप्रधान नरेंद्र मोदींनी ह्या मंदिर निर्माणाला मार्गस्थ लावून एक नवीन आदर्श निर्माण केला. आता लवकरात लवकर राममंदिर प्रत्यक्षात साकार होवो आणि रामराज्याचे दिवस पुन्हा येवो ह्याच सदीच्छा...

डॉ. प्रशांत शिरोडे.

1 टिप्पणी:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...