गोविंदा आला रे आला..


गोपाळकाला, दहीहंडी जवळ आली का "गोविंदा आला रे आला" हे गाणं सगळीकडे घुमघुमूं लागत. सगळीकडे अगदी सकाळपासून दहीहंडीच्या अंतिम सरावाची लगबग आणि नवीन कीर्तिमान उभारण्याची चाहूल लागलेली असते. जसा जसा दिवस मावळतीकडे जातो तसा तसा उत्साह गगनाला भिडत जातो. रात्री श्रीकृष्ण जन्माचा आनंद आणि दहीहंडीच्या दिवशी नाचून गाऊन दहीहंडी फोडण्याचा उत्सव साजरा केला जातो..

श्रीकृष्ण जन्माचा आनंद व्हायलाच हवा कारण जर भगवान कृष्ण जन्माला आले नसते तर "भगवत गीता" नावाचं अमृत ह्या जगाला भेटलं नसत.
यशोदेच्या रूपातून आईच प्रतीक भेटलं नसत.
सुदामाच्या रूपातून मैत्रीचं प्रतीक भेटलं नसत. राधेच्या रूपातून प्रेमाचं प्रतीक भेटलं नसत आणि रुख्मिणीच्या रूपातून संसाराचं प्रतीक भेटलं नसत.

दहीहंडी म्हणजे मराठमोळ्या अस्सल मराठी माणसाचं प्रतीक. महाराष्ट्राच्या अनेक भागातून साजरा होणारा हा सण मुख्यतः मुंबई आणि उपनगरातून भव्य प्रमाणातून साजरा केला जातो. साधारणतः एक महिन्यापासून रोज संद्याकाळी कामावरून आल्यावर तरुण वृद्धांपासून सर्व मंडळी सरावात सहभागी होतात. दहीहंडी हा सण सांघिक खेळाचं, मराठी संस्कृतीचं आणि ऐकते च प्रतीक आहे आणि हा सण मोठ्या आनंदाने साजरा व्हावा हीच सदीच्छा.

अनेक विश्लेषणानंतर न्यायालयीन चौकटीतून बाहेर येऊन दहीहंडी हा सण साजरा होतोय. अलीकडच्या काळात ह्या सणाला व्यावसायिक आणि राजकीय पद्धतीची किनार लागली आहे, कुठे थरांची तर कुठे पैश्यांची स्पर्धा लागली आहे. ह्या स्पर्धेत अनेकांना शारीरिक दुखापतींना समोर जावं लागत आणि त्यातून कौटुंबिक स्वास्थ बिघडत. स्पर्धा करावी पण घरी असलेल्या आपल्या हितचिंतकांनी काळजी करून ती करावी.

असो, दहीहंडी हा मराठमोळा सण उत्सहात आणि आनंदात साजरा होवो. ह्या सणांतून ऐकते चा संदेश सर्व जातीधर्मानपर्यंत जावो. सर्व गोविंदांच आरोग्य सुरक्षित आणि आनंदी राहो ह्याच शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...