अटल अंत.



मौत कि उम्र क्या दो पल भी नही, जिंदगी सिलसिला, आज कल की नही,
मैं जी भर जिया, मैं मन से मरू, लौटकर आऊंगा, कूच से क्यो डरु...

ह्या ओळी ज्यांच्या तोंडून ऐकल्या जायच्या तो आवाज आता पुन्हा ऐकू येणार नाही. "अटल बिहारी वाजपेयी" भारताला आजतागायत लाभलेले सर्वश्रेष्ठ प्रंतप्रधान. लोकसभेत असो किंवा कुठल्याही सभेत असो अटलजींनी भाषणाची सुरवात केली की, ते बोलतच राहावे अस वाटायचं. त्यांचा भाषणातील हावभाव, सखोल अभ्यास, अचूक मुद्दा आणि बेधडक वक्तृत्व हि त्यांची वैशिष्ट्ये होती. हिंदी भाषा ऐकायची तर ती अटलजींच्या तोंडूनच. एक उत्कृष्ट पत्रकार, भावपूर्ण कवी आणि निस्वार्थ राजकारणी..

देशाचे तीन वेळा प्रतंप्रधान राहिलेले अटलजींनी १३ दिवसांचं त्यांनतर १३ महिन्यांचं आणि नंतर ५ वर्षाचं मित्रपक्षांना बरोबर घेऊन पाहिलं काँग्रेस विरहित सरकार यशस्वीरीत्या चालवून दाखवलं. आपल्या प्रंतप्रधान पदाच्या पहिल्या भाषणात पूर्व प्रतंप्रधान इंदिरा गांधी याना "लोह पुरुष" संबोधून त्यांच्या कार्याला जणू मानवंदनाच दिली. कुठल्याही प्रांतात भाषण करताना तिथल्या राज्यभाषेत भाषांची सुरवात करून लोकांची मन जिकंत असत. महाराष्ट्राचं त्यांना भलं कौतुक होत, ते नेहमी म्हणायचे महाराष्ट्रात एकमेकांना भेटलं का "राम राम " म्हणतात आणि त्यात जात धर्म काही पाहिलं जात नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि वि. दा. सावरकर ह्या विभूतींबद्दल त्यांना विशेष प्रेम होत. स्वर्गीय बाळासाहेबांच्या सूचनेने दिल्लीत लोकसभेत ह्या विभूतींचे भव्य शिल्प आणि तैलचित्र उभारण्यात आलं.

वाजपेयी जी पत्रकार असताना त्यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींबरोबर काश्मीर दौऱ्यावर असताना जे काही बघितलं ते बघून त्यांनी राजकारणात येण्याचं  ठरवलं. स्वातंत्र्यापासून काँग्रेसला एक सच्चा विरोधक भेटला. खूप प्रयत्नानंतर जनता दलातून अवघे दोन खासदार निवडून आले असताना काँग्रेसकडून त्यांना हास्यास्पद वागणूक देण्यात आली तेव्हा लोकसभेत उत्तर देताना अटलजी म्हणाले आम्ही एक दिवस बहुमताने तुमच्या बाकांवर बसू आणि तुम्ही तेव्हा ह्या बाकांवर असाल. ह्यातून त्यांचा उदंड आत्मविश्वास आणि उत्तम सकारात्मक नेतृत्व दिसत होत. आजच भाजप हे अटलजींच्या कर्तृत्वाचं फळ आहे.

अटलजी प्रतंप्रधान असताना पोखरण येथे अणुचाचणी करून देशाच्या प्रगतीत मानाचा तुरा लावला होता. कारगिल सारख्या विश्वासघातकी युद्धात सैन्याला तात्काळ पूर्ण अधिकार देऊन युद्धासाठी मजबूत पाठबळ दिल. अटलजी "भारतरत्न" ह्या पुरस्कारासाठी तुम्ही योग्य होतात, म्हणून तुम्ही दुसरे भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम सारख्या महान विचारवंताला हिंदुस्थानाचे राष्ट्रपती म्हणून तुम्ही पुढाकार घेऊन सन्मानाने विराजमान केलत.

अटलजी आज तुम्ही आमच्यात नाही पण बाळासाहेबांसारखे अद्वितीय राजकारणी भारतभूमीला सोडून गेले हि हिंदुस्थानची खूप मोठी हानी झाली जी कधीच भरून निघणार नाही. तुमच्याच शब्दात सांगायचं तर "मौत कि उम्र क्या दो पल भी नही, जिंदगी सिलसिला, आज कल की नही". तुमच्या देहाचा अंत झाला पण तुमच्या व्यक्तिमत्वाचा अंत अटल आहे...

भावपूर्ण श्रद्धान्जली.

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...