आतुरता आगमनाची..



प्रत्येक सणाचं एक वेगळं महत्व असत.. सण म्हंटल तर त्यात उत्साह, आनंद आणि भाव आलाच. स्वातंत्रपूर्व काळात देश इंग्रजांच्या कूटनीतीतून जातीधर्माच्या भेदात अडकला होता. लोकांना एकत्रित आणून स्वातंत्र्याच्या लढ्याला बळ देणं हि काळाची गरज होती आणि हि गरज लोकमान्य टिळकांनी ओळखली. त्यांनी १८९३ साली "गणेशोत्सव" आणि १८९५ साली "शिवजयंती" हे सण साजरा करण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणून लोकांना राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण दिली.

गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता काही वेगळीच असते. सगळीकडे घरी देव पाहुणा म्हणून वास्तवास येण्याची चाहूल लागलेली असते. वातावरण बाप्पाच्या आगमनासाठी प्रफुल्लित हर्षमय आणि उत्साहित होत. सगळीकडे स्वागताची जणू धावपळ चालू असते. बाप्पाच्या आवडीची आसनव्यवस्था आणि खाद्यपदार्थांची व्यवस्था केलेली असते. सगळं सगळं जणू वेगळच असत.

गणेशोत्सव सर्वाना एकत्रित आणण्यासाठी आणि एकत्र येऊन भक्तिभावाने देवाची प्रार्थना करण्याच्या मुख्य उद्देशाने साजरा केला जातो. पण अलीकडच्या काळात ह्या सार्वजनिक उत्साहाला कुठं राजकीय तर कुठं व्यावसायिक गोष्टींचं आवरण लागलं आहे ते जणू सार्वजनिक उत्साहाच्या मुख्य उद्देशापासून दूर घेऊन जातोय. परमेश्वर ह्या संकल्पनांना दूर करून भावश्रद्धेनं हा सण मोठ्या प्रमाणात होऊ देवो हीच सदिच्छा.

राष्ट्रीय एकात्मतेच्या उद्देशाने सुरु झालेल्या गणेशोउत्सवातून माझ्या महाराष्ट्राचं, माझ्या हिंदुस्थानाच आणि विश्वाचं कल्याण होवो आणि त्यातून "हे विश्वची माझे घर" हि संकल्पना प्रत्यक्षात येवो ह्याच मनापासून शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...