वरदान औषधाचं..


रोजच्या जीवनशैलीत बदल होताना औषध काळाची गरज केव्हा झाली हे समजलं सुद्धा नाही. आजारांची शृंखला दिवसेंदिवस वाढतच आहे आणि त्यावर संशोधन होऊन नवीन औषधाचं निर्माण होतच आहे. औषध निर्माण होत असताना त्यावर खूप मोठं संशोधन होत असतं आणि त्यानंतरच ते कुठल्याही आजारावर वापरलं जात. औषध बनवण्याचं शास्र म्हणजेच "औषधनिर्माणशास्त्र" म्हणजेच आपल्या सर्वाना ज्ञात असलेलं "फार्मसी" आणि ह्या क्षेत्रात शिक्षण घेतलेले म्हणजेच "फार्मासिस्ट". आज जागतिक फार्मासिस्ट दिवस.

भारतभूमीला औषधांचं वरदान अगदी पूर्वीपासून आयुर्वेदातूनच लाभलं आहे. आयुर्वेदिक, होमीओपॅथिक आणि ऍलोपॅथी सारख्या विविध प्रकारच्या औषध निर्माण प्रक्रिया आजच्या युगात ज्ञात आहेत. रासायनिक म्हणजेच ऍलोपॅथी प्रक्रियेतून १८९० साली "इपिनेफ्रिन" हे रक्तदाबावरील औषध पहिल्यांदा निर्माण करण्यात आलं. भारतात सण १९०१ साली बंगाल केमिकल्स अँड फार्मासुटिकल वर्क्स हि कंपनी सर्वप्रथम चालू झाली. त्यापाठोपाठ १९०३ मध्ये अलेम्बिक, १९५० मध्ये हिंदुस्थान अँटिबायोटिक कंपनी सुरु झाली.

जागतिक अर्थव्यवस्थेचं कंबरडं मुडलेलं असताना भारतीय अर्थव्यवस्था फार्मसी क्षेत्राच्या जोरावर यशस्वीरीत्या उभी होती आणि आज पण उभी आहे. भारत देश स्वतःची औषधांची गरज भागवत असताना ८०% जागतिक पातळीवर औषध निर्यात करून जगाची गरज पूर्ण करणार जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. हि सर्व प्रगती भारतात असलेल्या फार्मासिच्या ज्ञानातून आणि कौशल्यातून झाली आहे. भारत १९३१ साली पदवी शिक्षण (बी. फार्मसी), १९४० साली पदव्यूत्तर शिक्षण (एम. फार्मसी), १९४३ साली पदविका शिक्षण (डी. फार्मसी) आणि अलीकडच्या काळात म्हणजे २००८ पासून सुरु झालेला फार्म. डी. अशा सर्व अभ्यासक्रमातून तयार झालेल्या "फार्मासिस्ट" मुळे आज जगाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. आज त्याच फार्मासिस्टच्या गौरवाचा दिवस.

औषधाचं लाभलेलं वरदान सेवेच्या माध्यमातून जनमाणसापर्यंत पोहचवण्याचं काम करणारा फार्मासिस्ट. उद्योगातून व्यवसायाकडे आणि व्यवसायातून जनसेवेकडे कार्यरत असणाऱ्या सर्व फार्मासिस्टला भारतमातेची सेवा करण्याचं कार्य उत्तरोत्तर घडो ह्याच जागतिक फार्मसिस्ट दिवसाच्या शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...