कांद्याचे अश्रू ...



कांदा चिरतांना डोळ्यात पाणी येत तसंच सध्या कांदा विकताना शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येताना दिसतंय. कांदा सामान्यांना पोट भरण्यासाठी चिरताना डोळ्यात पाणी देतो तर तोच कांदा शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचं फळ न मिळाल्यामुळे डोळ्यात पाणी देतो. सध्याची परिस्थिती तशीच आहे, कांद्याचा बाजारभाव १.५० रुपये किलो आहे. कांदा पिकवून योग्य भाव येईपर्यंत साठवला जातो, ज्याचा खर्च साधारणतः ३-४ रुपये प्रति किलो येतो. पण आजचा बाजारभाव बघितला तर कांदा १-२ रुपये किलो भावाने विकला जातोय, म्हणजेच ह्या भावात शेतकऱ्याला उत्पादन खर्चही मिळत नाही.

सध्याची दुष्काळी परिस्थिती बघता कांद्याबरोबर सर्व पिकांचं उत्पन्न कमी आहे म्हणून त्याचा बाजारभाव जास्त असेल अशी सामान्य शेतकऱ्याची भावना आहे. शेतकऱ्याची हि भावना सरकारला कळत नाही, अस मुळीच नाही, पण त्यांना नेहमीप्रमाणे राजकीय स्वार्थ्याचं पडलेलं असत. आताही तसंच झालं, चार राज्यांच्या निवडणूका चालू असल्याने मतांच्या राजकारणाकरता शेतकऱ्याला बळीचा बकरा बनवलंय.

शेतीमालाला भाव असणं म्हणजे भीक मागितल्यासारखं झालय. आम्ही दीडपट भाव देऊ म्हणणारे उत्पादन खर्चाचा निम्मा भाव देतायेत. हे तर सरकारच झालं हो, पण शहरी माणूसही हि २-४ रुपये भाव वाढला कि अशी प्रतिक्रिया देतो कि जणू आभाळच कोसळलंय. पिझ्झा, बर्गर खाण्यासाठी ५०० रुपये गेले तरी कुठलीही कुरकुर न करणारे ५ रुपये कांद्याचा भाव वाढला कि बोंबाबोंब करतात. अश्या लोकांनी शेतकऱ्याची मेहनत, परिस्थिती आणि जगण्याची पद्धत एकदा जाऊन बघायला हवी.

कांद्याचा एक अश्रू चवीच्या आनंदासाठी तर एक अश्रू अथक कष्टाच्या फळासाठी.. एक असतो खवय्यांसाठी तर एक असतो शेतकऱ्यांसाठी.. शेतीप्रधान देशात शेतकरी नावाला राजा म्हणवला जातो, पण प्रत्यक्षात ह्या राजाचे प्रजेपेक्षा वाईट हाल असतात. सातवा वेतन आयोग लावणाऱ्या सरकारने शेतकऱ्याला जगण्यासाठीच वेतन हमीभाव स्वरूपात दिल तरी तो जगण्याची आशा सोडणार नाही.

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...