मराठी रंगभूमी... कडक..



कडक.. शब्द थोडा वेगळा वाटला ना.. हो वेगळाच आहे त्याच असं कि ह्या आठवड्यात दोन मराठी चित्रपटांनी हिंदी चित्रपटांना तिकीट खिडकीवर चांगलंच खाली खेचल, त्याच एका चित्रपटातील हा मुख्यशब्द. ज्या चित्रपटगृहांना नेहमी मराठीच वावडं असत त्या चित्रपटगृहांनी "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" आणि "नाळ" ह्या दोन मराठी चित्रपटांना जास्त शो देऊन हिंदीतले बादशाह अमिताभ बच्चन आणि अमीर खान यांची भूमिका असलेला "ठग्ज ऑफ हिंदुस्थान" ह्या चित्रपटाचे शो कमी केलेत. आकडे सांगायचे झाले तर ठग्ज ऑफ हिंदुस्थान १३३३ च्या शो वरून १५० शो केलेत आणि नाळ चे ३०० वरण ४०० शो केले त्याबरोबर आणि डॉ.काशिनाथ घाणेकरचे १७७ वरण ३१० शो केलेत.

मराठी रंगभूमीचे सध्याचे चित्रपट काही वेगळेच आहेत. श्वास चित्रपटापासून ते मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, सैराट, नटसम्राट सारख्या एकाहून एक अभूतपूर्व चित्रपटांची हि यशस्वी शृंखला "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" आणि "नाळ" ह्या जबरदस्त चित्रपटांपर्यंत येऊन पोहचली. ह्या दोन्ही चित्रपटांनी जणू मराठी रसिकवर्गाला पुन्हा तिकीट खिडकीवर खेचून हिंदी चित्रपटांना नुसत मागे टाकलं नाही तर अमराठी प्रेक्षकांनाही आपल्या कलेच्या मोहात ओढलं. खरं तर मराठी चित्रपट हे मुद्देसूद आणि एक योग्य कथानकाला जोडून असतात पण हिंदीच्या वर्चस्वापुढे कुठे तरी कमी पडतात. असो पण आता दिवस बदलतायेत.

"आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" ह्या चित्रपटात मराठी नव्हे तर साऱ्या चित्रपट श्रुष्टीवर अदभूत लाभेलला एक कलाकार ज्याने ह्या भूमीवर कलेचा वेगळा अविष्कार पहिल्यांदा दाखवला. मराठी रंगभूमीला पहिली टाळी, पहिली शिट्टी मिळवून देणारा आणि मुख्य कलाकाराच नाव शेवटी सांगण्याची प्रथा देणारा कलाकार म्हणजे डॉ. काशिनाथ घाणेकर. ह्या महान कलाकाराच्या भूमिकेला तितकीच कडक दाद देणारा सुबोध भावे मनाला खूप भावून जातो.

"नाळ" ह्या चित्रपटातून रसिकप्रेक्षकांना भावुक करणारी एक वेगळी निर्मिती समोर आणली आहे. ८ वर्षाच्या श्रीनिवास पोखळे च्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं कमीच. एका लहान मुलाने प्रेक्षकांच्या नजरा शेवटपर्यंत टिकवून, चित्रपटातील भूमिकेला पूर्ण न्याय देताना उत्तम कथानकातून रसिकप्रेक्षकांच्या डोळ्यातील अश्रुना वाट मोकळी करून देतो.

मराठी रंगभूमीची यशस्वी शृंखलेची हि "नाळ" अशीच टिकून राहो आणि रसिकप्रेक्षकांना एकसे बढकर एक चित्रपट भेटीला येवो ह्याच "कडक" सद्धीच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...