ठाणेकरांनो ... फेरीवाला..


एल्फीस्टन स्टेशनच्या चेंगराचेंगरीनंतर अमानुष लोकांचे हकनाक बळी गेले. ह्या घटनेमागे अनेक कारण होती, आणि त्यातलं एक कारण म्हणजे फेरीवाला.. ह्याच्या विरोधात राज ठाकरे यांनी मोर्चा काढला आणि फेरीवाला मुक्त रेल्वे स्टेशन परिसरासाठी मनसे रस्त्यावर उतरली. रेल्वे अधिकारी, पोलीस आणि संघटना यांची मिलीभगत ह्या फेरीवाल्याना पाठीशी घालत होती. राज ठाकरेंच्या आव्हानाला साथ देताना ठाणे रेल्वे स्टेशन फेरीवालामुक्त करण्यासाठी जो माणूस अग्रेसर होता तो म्हणजे "अविनाश जाधव"..

मध्यरेल्वेवरच सर्वात जास्त वर्दळीच स्टेशन म्हणजे ठाणे स्टेशन. सुमारे ४००-४५० फेरीवाल्यांच्या साखळीने ठाणे स्टेशनला घेरलं होत. सामान्य प्रवाश्याला लोकल इतकाच स्टेशन परीसरात जीव मुठीत घेऊन चालावं लागत होत. फेरीवाल्यांची दडपशाही वाढली होती, कदाचित त्यांच्यावर प्रशासनाचा हप्त्यांच्या मायेने आशीर्वाद होता. प्रवाशांचे होणारे हाल कोणाला दिसत नव्हते. मुंबई ठाणेसह सर्व उपनगरात हि दयनीय अवस्था होती.

ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी अविनाश जाधव आपल्या कार्यकर्त्यांसोबत ठाणे स्टेशन परिसरात जाऊन फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरुद्ध उतरला. बघता बघता स्टेशन फेरीवालामुक्त होण्यास सुरवात झाली आणि ती २-३ महिने व्यवस्थित राहिली आणि नंतर पुन्हा तीच परिस्थिती दिसू लागल्यानंतर पुन्हा आंदोलन केल्यामुळे आजपर्यंत स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त आहे. भाऊबिजेसारख्या सणाच्या दिवशी जनसामान्यांच्या सोयीसाठी आंदोलन करून दिवाळीसारख्या सणाच्या दिवसात चार दिवस तुरंगात काढणारा व्यक्ती म्हणजे "अविनाश जाधव".

अविनाश जाधवांना विचारलं तर त्यांचं मत असत "सामान्य माणूस घरातून निघताना जीव मुठीत घेऊन निघतो आणि स्टेशन परिसरात फेरीवाल्यांच्या गराड्यात अडकतो. सामान्य माणसाला मोकळा श्वास घेता यावा. चेंगराचेंगरी सारखा प्रकार होऊ नये. स्टेशन स्वच्छ व सुंदर व्हावं हि त्यामागची भूमिका आहे. कोणाच्या पोटावर पाय ठेवणं आमची संस्कृती नाही, पण जनतेचं रक्षण करण हि आमची प्राथमिकता आहे".

मग ठाणेकर विचार काय करतायेत? आपलं मत मोकळ्या श्वासासाठी, आपलं मत फेरीवालामुक्त स्टेशन परिसरासाठी..

आपलं मत अविनाश जाधवांनाच...

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...