ठाणेकरांनो... पुरग्रस्तांच्या मदतीसाठी..



ऑगस्ट महिन्यात सांगली कोल्हापूर ह्या पश्चिम महाराष्ट्राच्या भागात पावसाने थैमान घातलं आणि अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढलं. झोपलेलं सरकार, नियोजनशून्य कारभार, श्रेयाच राजकारण ह्याशिवाय काहीही दिसलं नाही. देश स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना हा पूरग्रस्त भाग स्वतःच्या जीवाला ह्या संकटातून स्वातंत्र्य करत होता. अचानक आलेल्या ह्या नैसर्गिक आपत्तीत होत्याच नव्हतं झालं. निसर्गाचा विकोप बघवत नव्हता. माणसं जीव मुठीत घेऊन जगण्यासाठीची खटाटोप करीत होते. सगळं सगळं काही भयानक होत.

महाराष्ट्राच्या अनेक भागातून मदतीचा ओघ सुरु होता. कोणी खाण्याच्या वस्तू, कोणी औषध तर कोणी कपडे पाठवत होत. सगळीकडे पाणीच पाणी असताना मदत पोहोचवणं तसं अवघड काम होत. शौर्याची भूमी जणू संकटाची भूमी झाली आणि तिला अवघ्या महाराष्ट्राची आस लागली. दिवसा मागून दिवस जात होते पण पाऊस काही थांबत नव्हता.. अनेक मदती पोहचल्या पण प्रत्यक्षात जावून मदत करणारे अगदी थोडे होते आणि त्यात अग्रभागी एक नाव होत ते म्हणजे "अविनाश जाधव".

०९-१० ऑगस्टला ठाण्यात मदतीची हाक देवून हा ध्येयवेडा माणूस, मराठी माणसाच्या मदतीसाठी स्वतः हि मदत घेवून सांगलीत पोहचला. मदत करणाऱ्यांपैकी जास्त लोक शहरी भागात पोहचले पण अविनाश जाधव आपल्या टीमसह खेड्या गावात पोहचले. सांगली तालुक्यातही अमनापूर आणि ब्रह्मनाळ गावांना प्रत्यक्ष मदत केली. ब्रह्मनाळ गावात बोट उलटून १७ लोकांचा मृत्यू झाला तिथे भेट देवून त्यांचं सांत्वन केलं. अश्या परिस्थितीत रात्रंदिवस पाच दिवसापासून काम करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांचं मनोबल वाढवलं. त्यानंतर इचलकरंजी आणि मिरजमधील गावांमध्ये मदत करून. कोल्हापुर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील टाकोडा गावात जाऊन लोकांची मदत करताना मनस्थिती समजून घेतली. नुसती मनस्थिती नाहीतर तिथल्या घरांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली आणि त्यासाठी अजूनही काम करताना हा माणूस धडपडताना दिसतोय.

ठाणेकरांनो, ठाण्याच्या बाहेर जाऊन मदत करणारा हा माणूस ठाण्यातील संकटात नेहमीच कामी येतो. ह्या विषयावर अविनाश जाधवांना प्रत्यक्ष विचारलं तर ते म्हणता "माझा मराठी माणूस संकटात मला बघवला जात नाही, माझा मराठी माणूस त्याच्या भूमीत हक्काने सुखी रहावा, मग ते नैसर्गिक संकट असो वा मनुष्यनिर्मित संकट असो. कोणीही नसेल तरी मी नक्कीच असेल..". संकटात सुखदुःखात मदतीला धावून येणाऱ्या अविनाश जाधवांना सरकारात पोहचवण्याची जबाबदारी तुमचीआमची..

मग विचार काय करता? आपलं मत संकटात धावून येणाऱ्या ध्येयवेड्या माणसासाठी... आपलं मत मराठी माणसाच्या संरक्षणकर्त्यासाठी..

डॉ. प्रशांत शिरोडे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...