सत्ता ...


सकाळी झोपेतून उठल्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पाहून अनेकांची थोडी राहिलेली झोपच उडाली. झोप उडण्याच कारण म्हणजे रात्रीपर्यंत सत्तेची गणित जुळत असताना आज वेगळाच काहीतरी घडताना महाराष्ट्राला दिसतंय.

युती आणि आघाडी निवडणूकीपुरता होत, राजकीय पक्षांची खरी भूक हि सत्ता होती. सर्व एकाच गोष्टीसाठी धडपडत होते ती म्हणजे सत्ता. मग पक्षनिष्ठा, शब्दनिष्ठा हे सर्व काळाच्या ओघात संपण्यात जमा झालं. सत्ता एकच निष्ठा बाकी दुसरं काहीही नाही, हेच आताच्या राजकारणाचं फलित आहे. महाराष्ट्राचं राजकारण नेहमी महाराष्ट्रात राहील पण आताच्या राजकारणाला दिल्लीची काळी नजर लागली असं दिसून  येत. स्वाभिमान, अभिमान जणू मानपणाच्या गर्दीत हरवून गेलेत..

प्रत्येक पक्ष सत्तेचा भुकेला असताना सतेची गणित हि सत्यासाठी नाही तर स्वार्थासाठी आहेत हे म्हणणं तितकच योग्य ठरू शकत. महाराष्ट्राने ह्या एक महिन्यात अनेक समीकरणे बघितली, राष्ट्रपती लागवट पण बघितली आणि राहिलेलं अवेळी मुख्यमंत्रीपदाची शपथ हि बघितली. विशेष म्हणजे इतक्या सकाळी सरकारी काम आणि त्यात राज्यपालांकडे जाऊन शपथविधीही होणं आणि राष्ट्रपती राजवट पण मागे घेणं, हे सर्व काहीतरी अघटित झाल्यासारखं होत. कदाचित राज्यपालही ह्या घडामोडींचे प्यादे असतील, पण ते नसावेत म्हणजे लोकशाहीला काहीतरी अनुसरून झाल्यासारखं असेल.

अजून महाराष्ट्राला काय बघायला भेटत ते बघावच लागेल. कदाचित महाराष्ट्राला याची आतुरता न राहता महाराष्ट्राला ह्या राजकारणाची चीड येऊ शकते. राजकारणाचं काय होत ते होतच राहील पण ह्यातून खरंच शिकण्यासारखं आहे, ते म्हणजे सत्तेसाठी होणार राजकारण आपापसातले संबंध न बिघडवता ह्या गोष्टींना हलकंफुलकं घेणंच महत्वाचं आहे...

आता प्रतीक्षा महाराष्ट्राच्या नव्या राजकारणाची..

डॉ. प्रशांत शिरोडे..

४ टिप्पण्या:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...