पक्षनेता विरोधातला...



कोरोनाच्या संकटात अनेक गोष्टी सर्वांना बघायला भेटल्या. महाराष्ट्राच्या राजकारणाने पण खूप काही घडामोडी बघितल्या. सत्तेत नसणारे काही पक्ष सत्ताधारी सरकारला राजकारण बाजूला सारून मदत करतांना दिसले. कुठे लोकांची मदत तर कुठे प्रशासनाची मदत सगळं काही वेगळं दिसतांना विरोधी पक्षनेता मात्र राजकारणात गुंतल्याच वेळोवेळी दिसून आलं.

आज विरोधी पक्षनेत्यांची सोसिअल मीडियावर पोस्ट बघितली. मुंबईतील सायन येथील रुग्णालयात एका कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृतदेह दुसऱ्या रुग्णाच्या बाजूला असल्याचा विडिओ सगळीकड़े प्रसारित झाला. ह्याबद्दल सरकारला सूचना करण्याची हि पोस्ट होती. आज दिवसभराचा कार्यकाळ बघितला तर सर्व राजकीय पक्षातील नेत्यांची कोरोनाच्या संकटासंदर्भात बैठक झाली आणि त्यात ह्या विषयावर संक्षिप्त चर्चाही झाली. आरोग्यमंत्र्यांनी त्यावर सत्यताही माध्यमांसमोर सांगितली. एका परिपक्व नेत्यांनी हा सगळा घटनाक्रम बघता किंवा परिस्थितीच गांभीर्य बघता अशी पोस्ट करणं शोभनीय नव्हतं. कदाचित त्यांच सोसिअल माध्यमांवर ट्रोलिंग होण्याचं हेच कारण असू शकत.

कोरोनाच्या संकटात विरोधी पक्षाची भूमिका हि विरोधाची न ठेवता प्रतिमुख्यमंत्री म्हणून असणं सामान्य जनतेच्या हिताचं होत. अगदी छोटयाछोट्या गोष्टींसाठी राज्यपालांना ह्या संकटाच्या काळात अनेक वेळा भेटणं हे तितकस योग्य नव्हतं. ह्या घडामोडीत राज्यपाल हे पद निपक्षीय असत, ह्याच संविधानिक तत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतांना दिसलं. जेव्हा जनतेवर संकट येत तेव्हा पक्षीय भेद नसावा हि माफक अपेक्षा कोणाचीही असते. शेवटी ह्यात राजकारण हे श्रेयाच गणित असत, असं म्हंटल तर वावग ठरणार नाही.

कोरोनाच्या संकटात राज्याला पैश्यांची गरज असतांना अनेक लोकांनी मुख्यमंत्री निधीत पैसे जमा केलेत. पण राजकीय बुद्धिमत्तेमुळे विरोधी पक्षाने आपले पैसे पंतप्रधान निधीत देऊन आपण ह्या संकटात राज्याचा विचार कितपत करतोय हे दाखवून दिल. ह्या राजकारणाला सोसिअल मीडियावर खोचकपणे संबोधण्यात आलं "पैसे दिल्लीला आणि सल्ला राज्याला". कदाचित सद्यपरिस्थिती हेच सत्य समोर दाखवतेय..

राज्यातील विरोधी पक्षनेता हा मुख्यमंत्री ह्या पदाइतका समान असतो. ह्या संकटात ती परिपक्वता एका जाणकार नेत्याने दाखवणं महत्वाचं होत. पुरोगामी महाराष्ट्राला अशा राजकारणाचा इतिहास नसतांना हे घडत असल्याचं बघून पराक्रमी महाराष्ट्राचं हे दुर्दैव समजावं का? हाच प्रश्न सामान्यांच्या मनात येतो...

सद्य परिस्थिती बघता परमेश्वर सर्वांना सदबुद्धी देवो आणि माझ्या महाराष्ट्राला ह्या संकटातून लवकर मुक्त करो हीच प्रार्थना.

डॉ. प्रशांत शिरोडे.

३ टिप्पण्या:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...