राजकीय वारसा



"राजकारण" दिवसातून एकदा तरी कानावर पडणारा शब्द. राजकारण म्हंटल तर ती सर्वसामान्यांची गोष्ट नाही असंच म्हंटल जात. राजकीय वारसा असला तर राजकारणात येणं सोपं असत. राजकारणात स्वतःच्या कर्तृत्वावर येणं तितकं सोपं नसत आणि ते प्रत्येकाला जमत पण नसत. राजकारणात संधीच सोन करण जेवढ महत्वाचं असत तेवढ वेळ बघून निर्णय घेणं पण महत्वाचं असत. राजकारणात लोकभावना समजून जेवढ महत्वाचं असत तेवढच वैक्तिक स्वार्थ बघणं हि स्वाभाविकच असत. राजकारण हुकूमशाही, लष्करशाही आणि लोकशाही ह्या मुख्य प्रवाहातून जगभरात दिसून येत पण सर्वात जास्त प्रमाणात लोकशाहीतून होताना दिसते. लोकशाही म्हणजे काय तर, लोकांनी लोकांसाठी उभी केलेली राजव्यवस्था. पण हि राजव्यवस्था लोकांसाठी निवडणुकीपुरता जास्त प्रमाणात दिसताना, लोकहितासाठी कमी प्रमाणात दिसते. प्रसारमाध्यम, न्यायव्यवस्था आणि साहित्य हे लोकशाहीचे मुख्य आधारस्तंभ. आधारस्तंभांनी आपली भूमिका निर्भीड आणि निस्वार्थ पणे मांडली तर लोकशाही भक्कमपणे टिकून राहते.

राजकारण म्हंटल तर सत्ता आलीच, आणि सत्ता म्हंटली कि केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण आलंच. सत्तेच्या केंद्रीकरणात एकहाती आणि आघाडी हि दोन पद्धती आल्याचं. एकहाती सत्ता मिळवून राजकीय प्रवास करण हे जितकं सोपं असत तितकं आघाडी करून सत्ता चालवणं अवघड असत. सत्ता असली तर राजकारण व्यवस्थितपणे करता येत. सध्याच राजकारण हे पूर्णपणे सत्ताभिमुख झालंय आणि सत्तेच्या उपयोग करण्याऐवजी दुरुपयोग जास्त प्रमाणात होताना दिसतोय. कदाचित केंद्रीकरणातून सत्तेचं विकेंद्रीकरण होतंय.

राजकारणात यशस्वी होण्यासाठी अनेक पैलू असावे लागतात. काही जन्मताच येतात काही आत्मसात करावे लागतात. लोकसहभाग, लोककार्य, वक्तृत्व, नेतृत्व, प्रभुत्व अश्या अनेक पैलूंना आचरणात आणावं लागत.

राजकारण म्हंटल तर ते व्यक्तीप्रत बदलत, अश्याच काही राजकीय नेत्यांचा व्यक्तिविशेष  "राजकीय वारसा" ह्या श्रुंखलेची सुरवात...

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...