भय इथलं संपत नाही...



रोज घरातून बाहेर पडल्यावर घरी परत पोहचण्याची शाश्वती राहीली नाही. रोजच्या धकाधकीच्या जीवनात जीव मुठीत घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी सर्वसामान्याचा चाललेला आटापिटा आता नवीन काही राहिला नाही. वेळेचं सांगितलं नाही तर बरंच.. माणूस जणू घड्याळ्याच्या काट्याला दोन्ही हाथ पकडून गोलगोल फिरून दिवसाचे २४ तास पूर्ण करतोय कि काय? हाच प्रश्न पडतो... हे सर्व करत असताना भय असत ते रोजच्या जगण्याचं.. भय असत ते पोटाच्या खळगीच .. भय असत ते धावत्या वेळेचं..

मुंबईत आल्यावर सुरवातीला ह्या स्वप्ननगरीच भय वाटत. नवीन आल्यावर जगण्याची वेगळीच बाजू मुंबईत बघायला भेटते. सुरवातीला आल्यावर कामाच्या जागेच्या शोधात असतो आणि योग्य ठिकाणी पोहचू का कुणाला पत्ता विचारल्यावर तो बरोबर सांगेल का? जाताना लोकलने गेलो तर गाडीत चढायला भेटेल का? आणि चढलो तर उतरायला भेटेल का? जरी हे सर्व बरोबर झालं तरी वेळेत पोहचेल का? रस्त्यात कुठं अडकणार तर नाही ना? अश्या खूप प्रश्नाच्या भयात अडकतो आणि जीवनाच्या ऐका टप्याचा प्रवास चालू करतो..

लोकल तशी मुंबईला लागलेलं वरदानच.. पायी चालण्यापासून तर वरती आकाशातील दिसणाऱ्या विमानापर्यंत सगळीच प्रवासाची साधन असणार अदभूत शहर. रोजच लोकलने प्रवास करण म्हणजे अर्धा जीव धोक्यात घातल्यासारखाच समजायचं.. जीवाचं रान करून कामावर पोहचणं म्हणजे कुठल्या अटीतटीच्या स्पर्धेत पदक मिळाल्यासारखाच समजायचं.. पण दाद त्या मुंबईकराला तो ह्या कठीण क्षणांना पण सुखमय बनवतो आणि रोजचा दिवस आनंदाने घालवतो. सकाळी घरून निघताना मनात संध्याकाळी घरी पोहचण्याच असलेलं भय संध्याकाळी घरी पोहचलल्यावर येणाऱ्या रात्रीसाठी विसरून जातो.. मुंबईकरांना संध्याकाळी घरी पोहोचण्याचं भय निर्माण झालाय ते लोकलच्या प्रवासाने, येणाऱ्या लोंढ्यांमुळे, वाढत्या जीवनाच्या वेगाने आणि गुंडगिरीच्या विळख्याने.. मुंबईत लोकलचा प्रवास दिवसेंदिवस कठीण होत चालाय. कितीहि लोकल वाढवल्या तरी त्या गर्दीने ओसांडुनच वाहत आहेत. कितीही पर्याय शोधले तरी लोकल तिच्या क्षमतेपेक्षा जास्तच गर्दीला सामावून वेळेच्या बंधनात आपला प्रवास पूर्ण करत आहे. त्या लोकोपायलट च्या डोक्यावर ह्या गर्दीच वेळेत सुखरूप पोहचवण्याचं भय काही संपतच नाही.. हि गर्दी रोजच येतेय आणि शहराला त्याच्या मुख्य ओळखीपासून दूर नेताना दिसतेय.. रोजची येणारी लोंढे थांबली नाही तर रोजच्या प्रवासातील भय कधी संपणारच नाही. रोज येणारे हे लोंढे ह्या भूमीशी आत्मीयता नसल्यामुळे तिच्याशी जुळवून न घेता तिच्यावर आपली सत्ता प्रस्तावित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि स्थानिकांना ह्या गोष्टीच भय वाढतच आहे..

मुंबईची संस्कृती नवीन रूप धारण करतेय पण तिच्या मूळ संस्कृतीला टिकून राहण्याचं भय वाटतंय. मराठमोळ्या माणसाला जगण्याची रोजची शाश्वती दिवसेंदिवस कमी झाल्यासारखी वाटतेय. मायानगरीला जणू संकटाच वेसण लागलंय आणि तीच भय कुणाला का समजत नाही? संस्कृतीच्या वारसदारांना आणि राजकारण्यांना ह्या मुंबापुरीची भयाची अवस्था का दिसत नाही? परप्रांतातून पोटाच्या खळगी साठी आल्यानं इथल्या स्थानिकांची पोटाची खळगी भरलेलीच वाटते आणि ते भेटेल तिथे आपल अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करता आणि मराठमोळ्या स्थानिकाला त्रासदायक ठरता. हे पोटाच्या खळगीच भय कधी संपेल?... पोटाच्या खळगी साठी भरपूरसा मुंबईकर वडापाव ह्या खाद्यपदार्थावर दिवस काढतो आणि पोटाला तात्पुरता भयमुक्त करतो..

मुंबईकर आणि वेळ जणू एकाच नाण्यांच्या दोन बाजू.. धावणारा मुंबईकर आणि घड्याळाची वेळ जणू वेगाची स्पर्धाच करता पण दोन्हींच्या मनात ह्या स्पर्धेतून हरण्याचं भय मात्र बाळगता.. पण ह्या भयापासून मुंबईकर स्वतःला विसरतो आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो आणि गेलेला दिवसानंतर उद्याच्या भयमुक्त दिवसाची प्रार्थना करतो.. वेळ केव्हा कुणावर कशी चालून येईल हे मुंबईत सांगता येत नाही.. मुंबईकर कधी अतिरेक्यांच्या बॉम्बस्फोटाच्या भयात तर कधी पावसाच्या अतिवृष्टीच्या भयात रोजची वेळ तशी काढून नेतो आणि संकटांच्या ह्या शृंखलेला मागे टाकून आपल्या जिवंत असलेल्या आनंदात नव्या दिवसात पुन्हा नेहमीसारखा तयार राहतो.. पण ह्या अनिश्चित संकटांचा भय मात्र मनात ठेवतो..

दैनंदिन भयाच्या वातावरणात मुंबईवर वाढणारा ताण कमी होवो.. इंग्रजप्रेरित बॉम्बेचं असलेलं भय मराठमोळ्या मुंबईन मुक्त केलं आणि आता बम्बईच्या भयात अडकण्याच संकट डोळ्या समोर दिसू लागलंय... आणि म्हणावं लागतं काहीही झालं तरी भय इथलं संपत नाही...

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...