पाऊस ..



छान वाटत ना पाऊस पडला तर... उन्हाळा संपत आला कि पावसाची आस लागते. पहिला पाऊस तर मातीशी नातं जुळवताना अदभूत सुगंध देऊन जातो आणि वातावरण प्रफुल्लीत करून जातो. पाऊस कधी बरसतो तर कधी गरजतो. पाऊस हवाहवासा वाटतो पण तो खूप पडला तर नकोनकोसा वाटतो.

लहानपणीचा पाऊस अगदी निरागस. "येरे येरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा" अशी निरागस भावना छोट्या पावसात सुद्धा खूप मोठा आनंद देऊन जाते. पाऊस सुरवातीला निरागस असतो आणि तो बरसला तर रागात असतो. वय वाढत तस पाऊसही बदलतो. तारुण्यात तो प्रेमळ होतो आणि प्रेमळ भवनातून तो बरसत असतो. उतार वयात तो थोडा जास्त बरसतो आणि जुन्या आठवणीत बुडवून जातो.

पाऊस हा कोणालाही आवडतो मग तो कमी प्रमाणात असो वा जास्त प्रमाणात. पाऊस सगळीकडे हवाहवासा वाटतो आणि तो सगळीकडे पडावा हि स्वाभाविक भावना असते पण तसं होतच नाही. शेतकरी राजा जास्त आस लावून बसलेला असतो पण पाऊसही त्याची परीक्षा बघतो. जिथे त्याचा थोडा सहवास हवा असतो तिथे तो भरभरून पडतो. कधी खूप सुख देऊन जातो तर कधी संकटाच गणित मांडून जातो. पाऊस मान्सूनमधला गरजेचा आणि सुखावणारा असतो आणि तोच अवकाळी पडला तर दुखावणारा असतो. पाऊस आनंद आणि संकट दोन्ही गोष्टी देतो.

परिस्थिती तशी सांगून येत नाही पण तिच्यातून कस सावरायचं हे खूप महत्वाचं असत. बरसणारा पाऊस लवकर सावर आणि सावरणारा पाऊस लवकर बरस. तू बरसत असताना कुसुमाग्रजांची कविता नक्कीच आठवते... "ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी"..

जिथे खूप पडतोय तिथं थोडी विश्रांती घे आणि जिथे काहीच पडला नाही तिथली गरज भागव. तू परमेश्वराचा अवतार आहेच तशीच तू तुझी कृपादृष्टी ठेव..

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...