सोहळा पंढरीचा...


उन्हाळा संपला कि पावसाळ्याची चाहूल लागते. चातक पक्ष्याप्रमाणे शेतकरी राजा पावसाची वाट पाहत असतो. पाऊस पडला कि जमीन तयार करून शेतकरी राजा पेरणी करतो आणि पेरणीनंतर त्याला चाहूल लागते ती पंढरीच्या राजाला भेटायची.. आषाढी एकादशीला विठुरायाचे दर्शन घेण्याची.

महाराष्ट्राचं कुलदैवत "विठ्ठलरुक्मिनी" म्हणजेच सर्वांची "माऊली". माऊली म्हणजे आई आणि विठूमाऊली हि ह्या जगाची माऊली आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे माऊलीच्या दर्शनाला दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी पौर्णिमेला पायी वारी करत जाणारी भक्त मंडळी. महाराष्ट्रात नव्हे, हिंदुस्थानात नव्हे तर जगात परमेश्वराच्या दर्शनासाठी एकाचवेळी लाखोच्यां प्रमाणात पायी अनेक अंतर वारी करणारा एकमेव सोहळा म्हणजे "पंढरीची वारी".

संत ज्ञानेश्वरांनी सुरु केलेला हा सोहळा पुढे संत नामदेव, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत जनाबाई, संत तुकाराम महाराज.. अश्या अनेक संतांनी अनुभवला. अनेक संकटांच्या छायेत शिवरायांसारख्या महाविभूतींच्या भक्तीमुळे हा सोहळा आजतागायत भक्तिभावाने पार पडत आहे. सर्व जाती धर्माचे लोक ह्या सोहळ्याचा आनंद लुटतात. टाळमृदूंगाच्या मधुर धुणीत, नाचण्याचा धुंदीत, अभंगांच्या भक्तिसागरात मन भारावून माऊलीच्या दर्शनासाठी आतुरलेले असतात. मायमाऊली आपल्या डोक्यावर तुळसी घेऊन रुक्मिणी दर्शनाला पायी वारी करतात.

हा अदभूत सोहळा एकदा तरी अनुभवणं आणि माऊलीच दर्शन घेणं म्हणजे जीवनाचं सार्थक होणं. वैष्णवांच्या सोहळ्याचं आनंद वर्णन करावं तर म्हणावसं वाटत..
"भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली...
तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली...
जरी बाप साऱ्या जगाचा परी तू
आम्हा लेकरांची विठू माऊली..."

आषाढी एकदशीच्या हार्दिक शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...