पत्र भारतमातेला...

प्रिय भारत माता,

आज तुझ्याशी खूप बोलावसं वाटतंय. सभोतालच वातावरण बघून मला तुझ्याशी बोलून मन मोकळं करावस वाटतंय. तू थोडं माझ्या मनातील भावनांना समजून घे. नेहमी तुज्या लेकरांना पदरात मायेनी कुरवाळून घेते तशी मला हि कुरवाळून घे.

"जन गण मन अधिनायक जय हे" नुसती राष्ट्रगीताची धून कानावर आली तरी छाती अभिमानाने भरून येते. "रवींद्रनाथ टागोरांनी" तुज्या वैशिष्ट्यांच वर्णन अगदी अचूक शब्दात केलय. अगदी हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत सगळ्या प्रांतांची, विविध वैशिष्ट्यांची रचना ह्या अभिमान गीतात आहे. भाषावर प्रांतरचना, प्रांतवार वेशभूषा, खाद्यपदार्थात विभिन्नता, वातावरणातील रचनात्मकता, अश्या अनेक विविधतेतून तुजी एकतेची शिकवण सर्व गोष्टींना एकसंघ ठेवते.
 
स्वातंत्र्याच्या गौरवदिनी ७२ वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला तर खूप असह्य झाल्यासारखं होत. नुसतं इंग्रजांनीच नाही तर अनेक परकीय शक्तींनी तुला फार वर्षांपासून घेरलं होत. जगाच्या पाठीवर तू एकमेव आहेस जिथे मातृभूमीला आई समान मानलं जात आणि अभिमानानं म्हंटल जात "भारत माता कि जय". आई बद्दल असलेलं प्रेम, भावना आणि आत्मीयता हि दुसऱ्या कुठल्याच नात्यात नसते. जस आईच आणि तिच्या बाळाचं नातं हे अवर्णनीय असत, तस तुज आणि सर्व भारतीयांचं नातं आहे.

परिकीयांचं आक्रमण, पारतंत्र्याची दाहकता सोसलेली असताना स्वातंत्र्यानंतर तुजी शांततेची आणि सलोख्याची अविरत इच्छा पाहिजेल तशी पूर्ण होताना दिसत नाहीये. तुज्या लेकरांकडून कळत नकळत काही असमर्थनीय गोष्टी घडताना दिसतायेत त्यात प्रामुख्याने स्त्रीयांवर होणारे अत्याचार, धार्मिक तेढ, जातीय असमतोल, प्रांतीय वाद, राजकीय स्वार्थ आणि ह्यामुळे तुज्या ऐक्याच्या प्रतिमेला तडा जाताना दिसतोय. कुठं तरी तुजी शेकडो वर्षांची संस्कृती दिवसेंदिवस संस्कारांच्या अभावामुळे लोप पावताना दिसत आहे. लोकसंख्या, अस्वच्छता, असभ्यता तुज्यातल्या गौरवला काळिमा फासत आहे.

प्रगतीच्या पथावर विकसनशील राष्ट्राकडून विकसित राष्ट्राकडे जाण्यासाठी तुज्या लेकरांना सामंजस्याची बुद्दी दे. देश, देव आणि धर्मासाठी बळ दे. नैसर्गिक आपत्तीतून सर्वाना सावरण्याचा सामर्थ्य दे. सत्कार्य करण्याची आणि तुजी सेवा करण्याची बौद्धिक प्रगल्बधता दे.

तुज्या अस्मितेचा तिरंगा "पिंगाली व्यंकय्या" यांनी खूप मनापासून बनवला पण आज त्याचा निळा, माझा भगवा आणि तुजा हिरवा ह्यातच आम्ही व्यस्त असताना प्रश्न पडतो कि तिरंगा कोणाचा सीमेवर फडकणारा तिरंगा हा तिथल्या वाऱ्यामुळे नाहीतर सैनिकांच्या श्वासामुळे फडकतोय. जर सैनिकांचे श्वास ह्या तिरंग्याला मोठ्या अभिमानाने उंच ठेवतात मग हा तिरंगा त्यांचाच का?

भारत माते तुज्या सेवेचं आणि तुजी इच्छा पूर्ण करण्याचं मातीतून आलेलं संस्कारांचं कर्म हातून घडून तुज्या यशोगाथेला हातभार लावू दे हीच मनोभावे इच्छा..

तुझाच..
एक भारतीय..

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...