स्वर भारतभूमीचा...



संगीताचं माणसाच्या आयुष्यात एक अभूतपूर्व महत्व आहे. संगीताला अर्थपूर्ण गाण्याबरोबर जर मधुर आवाजाची साथ मिळाली तर ते गाणं काळजाला भावून जात. तसंच रत्नांच असत, अनेक रत्नं असतात पण कोहिनूर सारखा रत्नं एकमेव द्वितीय असत. संगीतातल्या अनेक गाण्यांना अश्याच एकमेव द्वितीय रत्नाचा सहवास लाभला आणि ह्याच अभूतपूर्व स्वरांच्या जोरावर भारतभूमीला एक "भारत रत्नं" लाभलं ते म्हणजे गानकोकिळा "लता मंगेशकर".

लता दीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ साली "दीनानाथ मंगेशकर" ह्या संगीत सम्राटाच्या घरात झाला. भाऊ हृदयनाथ, बहिणी आशा, उषा आणि मीना ह्या घरातल्याच कलाकारांचं सहवास आयुष्यभरासाठी लाभला. वयाच्या पाचव्या वर्षी बालकलाकार म्हणून कला क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर वयाच्या नवव्या वर्षी गाण्याच्या क्षेत्रात प्रवेश केला. गेली सात दशके संगीत क्षेत्रातले अनेक यशाचे शिखर सर करताना मराठी, हिंदीसह भारतातल्या सर्व भाषेत तीस हजाराच्या वरती गाणी गाऊन विश्वस्थरावर अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या ह्या कलेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सुद्धा घेतली आहे.

संगीत क्षेत्रात कार्य करत असताना फिल्म फेअर, दादासाहेब फाळके, पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्रभुषणसह "भारतरत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आपल्या कारकीर्दीत १७ विविध पुरस्कारांनी २५ वेळा सन्मानित करण्याचा मान लतादीदींनी मिळाला. आतापर्यंत स्वरसम्राग्नी वर १५ पुस्तक लिहली गेली. आजच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांची बहीण मीना लिखित अजून एक पुस्तक प्रकाशित होत आहे.

महाराष्ट्राचं भूषण असलेल्या भारताच्या स्वररत्नाला नव्वदीतल्या वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा. महाराष्ट्राला तुमच्या यशोगाथेचा सार्थ अभिमान आहे. भारताची हि स्वर यशोगाथा आयुष्यभर अमर राहो ह्याच सदीच्छा.

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...