काळीज बापाचं..



घरात मुलगी जन्माला आली का सगळ्यात जास्त आनंद बापाला होतो आणि तो बाप त्या आनंदात साऱ्या गावाला बर्फी वाटत "लक्ष्मी" जन्माला आल्याचं सांगत फिरतो. जन्माला आल्यापासून तिच्या लग्नापर्यंतच स्वप्न बाप मुलीच्या जन्माच्या दिवसापासून बघतो. मुलीला नेहमीच राजकन्येसारखं ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. मुलीवर तसं बापाचं आईपेक्षा थोडं जास्तच प्रेम असत. लहानाचं मोठं केल्यानंतर पोटाचा तुकडा दुसऱ्याच्या स्वाधीन करताना त्याच काळीज तुटू लागत, म्हणून प्रत्येक बापाचा प्रयत्न असतो कि आपली मुलगी चांगल्या वातावरणात, चांगल्या कुटुंबात, चांगल्या मुलासोबत संसारात रमावी.

एकदा एका बस स्थानकावर रात्रीच्या वेळेस एक प्रेमीयुगल चिंतेत बसलेलं होत, त्यांच्या चेहऱ्यावर काळजीच सावट दिसत होत. त्यांच्या शेजारी एक सदपुरुष गावाला जाण्यासाठी शेवटच्या गाडीची वाट पाहत आपल्या विचारात गुंतून बसलेला होता. त्या सद्पुरुषाचं अचानक त्या प्रेमीयुगलांकडे लक्ष जात आणि त्याला न राहता त्यांच्याशी बोलावसं वाटलं. तो आपसूकच त्यांच्याशी संवाद साधायला सुरवात करतो "पोरांनो घरातून निघून आलात का रे? आला असाल तर आईबापाला सांगितलं नसेल ना? अरे माझी पण तुमच्यासारखी एकुलती एक मुलगी होती! माझ्या पोरीचं लग्न करण्यासाठी माझ्याकडे पैसा नव्हता, पण माझ्या लेकराचं चांगलं व्हावं म्हणून नोकरीवाला मुलगा बघितला, नोकरीवाला म्हंटला म्हणजे त्यांच्या अपेक्षा मोठ्या, त्याप्रमाणे त्याने मोठं तोंडही फाडल. सगळं ठीक होत म्हणून मी माझ्याकडच् सगळं गहाण ठेवलं, जीव सुद्धा गहाण ठेवला आणि पोरीचं लग्न ठरवलं. सगळी तयारी झाली, कपडेलत्ते झाले, पाहुणेरावळे आले. उद्या लग्न आणि माझी मुलगी आज घरातून निघून गेली, माझं काळीजच चिरलं गेलं रे बाळांनो.. तिला जायचं होत तर मला सांगितलं असत, मी काहीतरी बघितलं असत रे.. काय चुकलं होत रे माझं..?" आणि तो बाप न राहता ढसाढसा रडू लागला.. ते प्रेमीयुगल विचारात गोंधळून एकमेकांकडे पाहू लागले. तो बाप तसाच रडत रडत आपली गाडी आल्यामुळे तिथून उठून निघून गेला..

आई निर्विवाद सत्य आहे पण बाप तितकाच सत्याचा महामेरू आहे. मुलींनी विचार करावा तितकाच मुलानेही करावा, पण मुलीने थोडा जास्त करावा कारण मुलींसाठी बापानं काळजाचं पाणी थोडं जास्तच केलेलं असत. जन्माला आलेल्या मुलीचं लग्न थाटामाटात व्हावं म्हणू तिच्या लहानपणापासून ते लग्नापर्यंत तो आपल्या जीवाचं रान करून मुलीचं स्वप्न पूर्ण करतो. प्रश्न पडतो मग प्रेमाचं काय? प्रेम हा प्रत्येकाचा वैयक्तिक विचारसरणीवर अवलंबून असणारा विषय आहे. पण मुलीने आयुष्याचा मोठा निर्णय घेण्याअगोदर बापाच्या काळजाचा विचार करायला हवा. गोष्ट करायला सोपी असते पण तिचे परिणाम बापालाच माहित असतात. मुलीच्या हातून अस काही घडल्यानंतर सुद्धा त्याची वाचा कुठे न करता उरलेलं आयुष्य त्या गोष्टीभोवती कुडत काढतो तो बापचं असतो.

माझी छकुली नेहमीच राजकन्येसारखी राहो आणि तिला भेटणारा राजकुमार तिला माझ्यापेक्षाही जास्त प्रेम देवो हीच इच्छा बापाच्या मनात असते आणि त्याच काळीज त्यासाठीच तळमळत असत.. शेवटी रक्ताचं नातं आणि मनाने जोडलेलं नातं ह्यात थोडातरी फरक तर असतोच ना! विचार तर व्हायलाच हवा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...