माझ्या स्वप्नातील भारत..



स्वप्न म्हंटल कि झोपेतून उठल्यावर एक छानस कुठल्यातरी दुनियेची सफर करून आल्यासारखं वाटत ना? कधी परीचा सहवास तर कधी चांदोमामाचा सहवास, कधी राजकन्या तर कधी जलपरी.. स्वप्न बाकी काहीतरी वेगळंच असत. प्रत्यक्षात घडत नसलं तरी ते काही क्षणासाठी खूप आनंद देऊन जात. पण माझं स्वप्न काही वेगळंच आहे. मी ते स्वप्न मनातून बघते आणि त्याची वाट उघड्या डोळ्यांनी बघते.. तुम्हाला पण प्रश्न पडला असेल ना नक्की कस असेल हे स्वप्न?

माझ्या मनातील स्वप्नाला कसं व्यक्त करू तेच समजत नाही. थोडं मन गोंधळून जात. "भारत माता कि जय" म्हणताना जो आत्मविश्वास भरून येतो ना तो आत्मविश्वास ह्या भारतमातेबद्दल मी बघितलेल्या स्वप्नाबद्दल येतच नाही?  हो, हे भारत भूमीच्या कल्याणासाठी मी बघितलेलं स्वप्न आहे.. भारत एकमेव देश आहे जिथल्या भूमीला माता म्हंटल जात आणि त्याच भूमीत स्त्रीला कुठेतरी कळत नकळत दिली जाणारी दुय्यम वागणूक माझ्या मनाला स्वप्नाच्या दुनियेकडे घेऊन जाते..

स्त्रीसाठी सुरक्षित, सुशीक्षीत भारत पाहण्यासाठी मला स्वप्न बघावं लागत हेच आमचं दुर्दैव. रस्त्यावर चालणाऱ्या आईबहिणीची छेड असो वा त्यांच्यावर सहजपणे होणारे बलात्कार असो.. हे निंदनीय कृत्य संपवण्याच माझं स्वप्न आहे.

आपल्याला आई हवी असते, आपल्याला बहीण हवी असते, आपल्याला बायको हवी असते मग आपल्याला मुलगीच का नको असते? प्रश्न स्वाभाविक आहे. स्त्रीभ्रूण हत्येला पुरुषप्रधान संस्कृती नाही तर अखंड समाजव्यवस्थाच जबाबदार आहे, मग त्यात स्त्री वर्गाचा सुद्धा तितकाच वाटा आहे. माझ्या वंशाचा दिवा हा मुलगी व्हावी हि प्रथम स्त्रियांची इच्छा व्हावी हे माझ्या स्वप्नातील भारताचं बघितलेलं स्वप्न आहे.

आताच झालेल्या दहीहंडीच्या उत्सवाच्या वेळेस एका लोकप्रतिनिधीने मुलीला लग्नासाठी पळवून नेण्याचं धाडसी वक्तव्य केलं. माझा प्रश्न आहे कि पळवून घेऊन जाणाऱ्या मुलीच्या आईवडिलांचा जन्मापासून तर आजपर्यंतच्या स्वप्नाचा विचार बोलण्याआधी केला होता का? अशी बेताल वक्तव्य आणि असह्य चर्चाना विराम माझ्या भारतात लागावा हे माझं स्वप्न आहे.

जिजाऊंचे संस्कार, राणी लक्ष्मीबाईंचे शौर्य आणि सावित्रीबाईंचे शिक्षण समस्त समाज बांधवांच्या मनात रुजाव आणि भारतभूमीसाठी स्त्री पुरुषानं एक दिलान काम करावं हे माझं स्वप्न आहे.

सभोवताली अनेक गोष्टी घडताना परस्रीला आई म्हणणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आणि भारत देश कुठे हरवलाय? हे विचार टिकून राहावे आणि स्त्रीचा सन्मान सगळ्या स्थरातून व्हावा हे माझं स्वप्न आहे.

कधी शांततेत विचार करा? नऊ महिने स्वतःच्या पोटात अगदी अलगदपणे आपल्याला वाढवणाऱ्या आईच्या वेदना काय असतील? एका जीवापासून दुसऱ्या जीवाला जन्म देताना तिचा नवा जन्म होतो, ह्या जन्माच्या स्त्री पर्वाचा विचार का होत नाही? लहानाचं मोठं करताना स्वतःची इच्छा बाजूला ठेवून आपल्यासाठी झटणारी मायमाऊली कधी स्वतःच्या इच्छेसाठी जगेल? प्रश्न स्वाभाविक आहेत पण उत्तर पण तितकेच विचारपूर्वक आहेत. हे प्रश्न समजून घेणारा समाज हा माझ्या स्वप्नातील भारत आहे..

चला तर मग स्री शक्तीला बळ देऊन माझ्याच नव्हें तर आपल्या सगळयांच्या स्वप्नातील भारताकडे आतापासूनच वाटचाल करूया आणी भारत मातेला अभिमान वाटेल असा भारत देश घडवूया..

जय हिंद.. जय महाराष्ट्र..

तुमचीच,
एक महाराष्ट्र कन्या..

डॉ. प्रशांत शिरोडे..

1 टिप्पणी:

  1. He doesn't have his own agenda. He just make comments on other parties. Though he made all those points publically he is not 100% right on all points. He should change his political vision.

    उत्तर द्याहटवा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...