सरसेनापती मराठीमनाचा ..


महाराष्ट्राच्या मातृभूमीने अनेक संतांना, वीरपुरषांना, स्वातंत्र्यसैनिकांना, शूरवीरांना, सैनिकांना आणि शास्त्रज्ञाना जन्म दिला. ह्या पावन भूमीची शौर्याची यशोगाथा अगणित आणि अविभूतीत आहे. हिमालयाला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा हा सह्याद्री हिमालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. ह्या मराठमोळ्या भूमीने जन्म दिला संत तुकारामांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, स्वातंत्र्यवीर सावरकरांना, ज्योतिबा फुलेंना आणि ह्याच शृंखलेत जन्म दिला बाळासाहेब ठाकरेंना ...

शूरवीरांच्या भूमीला नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाला नव्हे नव्हे तर पूर्ण जगाला राजकारणाची वेगळी ओळख करणारा एक वेगळा राजकारणी. अस्सल ठसठशीत मराठमोळा अभिमान असणारा मराठी माणूस, शिवरायांच्या यशोगाथेला अभिमानाने गौरवास्पद करणारा शिवसैनिक, शिवसेना नावाची मराठीमोळी संघटना उभा करणारा क्रांतिकारी, मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी लढणारा महाराष्ट्र सैनिक, व्यंगचित्रांच्या रेषांतून परिस्थितीची जाण करून देणारा व्यंगचित्रकार, हिंदुस्थानातील हिंदूंसह सर्व धर्माना धर्माभिमान शिकवणारा धर्मप्रेमी, सामान्यांना आपलं वाटणारा असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणज़े बाळासाहेब..

राजकारणात सत्ता नसताना सुद्धा समांतरित सत्ता लोकांच्या हिमतीवर चालवणारे, तोंडातून एकदा निघालेला शब्द कधीच परत न घेणारे, कुणाचीही मदत करण्यासाठी नेहमी आपली सत्ता वापरणारे, शिवरायांना डोक्यापासून तर हृदयापर्यंत आत्मसात करणारे, परदेशी लोकांनी ह्या भूमीत येण्याअगोदर शिवरायांचं नाव घ्यावं म्हणून मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव देणारे, देशातील पहिली ट्रेन ज्या स्थानकावर धावली त्या स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव रूपाला आणणारे, मुंबईत राहून पाकिस्तान सारख्या विरोधकांना धडकी भरवणारे, अश्या अनेक अनेक राजकारणाचे पैलू असताना सतेच एकही पद न घेता देशहितासाठी असंख्य गोष्टी करणारे अदभूत शिवसेनाप्रमुख...

बाळासाहेब नावाचं वादळ हे शेवटच्या श्वासापर्यंत मराठमोळ्या, हिंदुस्थानी आणि शिवसैनिकांच्या मनात बसलेलं आहे. अखेरच्या श्वासात सुद्धा जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत सारा देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता. जगाचा निरोप घेताना सुद्धा बाळासाहेबांनी पराक्रमाची गाथा चालू ठेवली. हिंदुस्थानातील सर्वात मोठी अंतयात्रा हि लोकमानसात प्रेम असल्यामुळे दिसून आली आणि त्या दिवशी खर्याअर्थानें कधी न थांबणारी मुंबई नावाची धावती दुनिया सुद्धा थांबली होती.

बाळासाहेब तुम्ही महाराष्ट्र नावाच्या शिवरायांच्या विश्वात जन्माला आलात हा आम्हा मराठीमाणसाचा गौरवच म्हणावा लागेल. बाळासाहेब तुम्ही गेलात हे आज पण खरं वाटत नाही कारण तुमच्याबद्दलचा आदर आणि तुमचा दरारा आज पण तेवढाच आहे आणि भविष्यात तो तसाच राहील.. आपण खरंच अदभूत आणि अद्वितीय होता आणि राहाल..

राजकारणापलीकडचा महामाणूस, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली..

जय हिंद, जय महाराष्ट्र ..

(राजकीय वारसा -२)

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...