साहित्य अन संमेलन...



मराठी भाषा... जगाच्या पाठीवरची एकमेव भाषा, ज्या भाषेचं गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य संमेलन आयोजित केलं जात. ह्या वर्षी ९२ व  मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे जेष्ठ साहित्यिक "अरुणा ढेरे" ह्यांच्या अध्येक्षतेखाली पार पडणार आहे. १८७८ मध्ये पहिले मराठी साहित्य संमेलन "न्यायमूर्ती रानडे" ह्यांच्या अध्येक्षतेखाली पुण्यात झालं. मराठी भाषेची हि साहित्य संमेलन गोवा, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि पंजाब सारख्या इतर राज्यातील मराठी संस्कृतीशी निगडित असलेल्या शहरात झालीत.

साहित्य म्हणजे भाषेचं वैभवच ज्यात लेखक, कवी, संगीत, संस्कृती आणि कला ह्यांचा समावेश असतो. ह्या सर्व गोष्टींचा सन्मान जिथे होतो त्याला साहित्य संमेलन म्हणावं लागेल. साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणाला एक वेगळच महत्व असत ज्यातून साहित्याचं, सामन्याच्या मनातलं आणि चालू घडामोडींवर भाष्य केलं जात. अध्यक्षीय भाषणाची दखल सरकारी दरबारातही घ्यावी लागते.

ह्या वर्षीच मराठी साहित्य संमेलन नेहमीसारख वादाच्या भोवऱ्यात सापडलं. जणू साहित्य संमेलन हे कुठल्यातरी वादाशिवीय चालूच होत नाही, हे जणू समीकरणच झालंय. राजकीय वादात तर कुठलीही गोष्ट सापडते आणि ह्या वेळेचं संमेलनही त्याचाच एक भाग झालं. एका इंग्रजी साहित्यिकाला प्रमुख पाहुणे बोलवून, राजकीय द्वेषापोटी त्याची उपस्थिती न राहण्यासाठी नाट्य घडवून आणण्यात आलं. ह्या घटनेनंतर सर्व साहित्यिकांना, लेखकांना जणू बळच आलं. एरवी शेतकऱ्यांची आत्महत्या, सरकारची कामाची पद्धत ह्या विषयात आपली लेखणी बाजूला ठेवणारे जणू कादंबरी लिहतात कि काय? अशी परिस्थती झाली.

असो, आजच चालू होणार अधिवेशन हे ९२ वर्षात पाचव्या अध्यक्षीय महिलेच्या म्हणजेच अरुणा ढेरे च्या मार्गदर्शनाखाली पार पडतंय. हि मराठी साहित्य आविष्काराची यशोगाथा अशीच चालू राहो ह्याच शुभेच्छा.

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...