स्वराज्य रणरागिणी....


स्वराज्य ह्या आपुलकीच्या स्वप्नाला प्रत्यक्षात भूपटलावर साकारणाऱ्या स्वराज्य निर्मात्या राजमाता जिजाऊ..

सह्याद्रीच्या छातडावर सगळीकडे अत्याचाराचा काहूर माजला होता. गणिमीन माणुसकीच कावड लावून घेतलं होत. आयाबहिणी जगण्याचे दिवस मोजत होत्या. गुलामगिरी राजाश्रय घेत होती. स्वाभिमान हैवानांच्या बाजारात हरवला होता. धर्म, संस्कृती आणि संस्कार पोरकी झाली होती. अन्याय, अधर्म आणि अपमान जणू उगवत्या दिवसाचा दिनक्रम झाला होता.. साधुसंतानचा पराक्रमाचा इतिहास जणू वाहत्या पाण्याबरोबर वाहून गेला होता. आपुलकी, स्नेहभाव आणि शिष्टाचार जणू वाऱ्याबरोबर हवेत दिशाहीन झाला होता.. सगळं सगळं काही अघटित घडत होत.

सह्याद्रीला मोकळ्या श्वासाची, माणुसकीला माणूसपणाची, आयाबहिणींना जगण्याची, गुलामगिरीच्या अस्ताची, स्वाभीमाच्या अभिमानाची, धर्म, संस्कृती आणि संस्कार रक्षणाची, आपुलकी, स्नेहभाव आणि शिष्टाचार जपण्याची, साधुसंत शूर पराक्रमाची यशोगाथा उजळण्याची... ह्या सगळ्या सगळ्यांना आस लागली होती स्वातंत्र्याची.. ह्याच स्वातंत्र्याची आस जिजाऊंच्या मनाला कासावीस करत होती.. जिजाऊंना हे सगळं बघवलं जात नव्हतं .. दिवसामागून दिवस जात असताना जिजाऊंच्या मनात एक अस्तित्व उभं राहील आणि ते म्हणजे स्वराज्य... आणि ह्या स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी जिजाऊंनी घडवलं एक छत्रपती शिवाजी महाराज नावाचं रामराज्य...

हे स्वराज्य जन्माला घालण्यासाठी जिजाऊंनी काय केलं हे सर्वात महत्वाचं... ह्या स्वराज्यासाठी स्वराज्यप्रमुख जन्माला घातले. नुसते जन्माला नाही घातले तर त्यांना संस्कारांची विचारगाथा मनात रुजवली. अगदी बाळ पोटात असताना रामायण आणि गीतेतून धर्म आणि माणुसकी संरक्षण संस्कार, बाळ जन्माला आल्यावर साधुसंतांच्या संस्कृतीचे संस्कार, बाळ रेंगाळू लागल्यावर इतिहासाच्या पराक्रमाचे संस्कार, बाळ चालू लागल्यावर मैत्रीतल्या प्रेमभावनेचे संस्कार, बाळा पळू लागल्यावर सह्याद्रीच्या यशोगाथेचे संस्कार, बाळ समजू लागल्यावर रणांगणातील शस्राचे संस्कार, बाळ वयात आल्यावर सर्वभूत राजकारणाचे संस्कार, आणि बाळ पराक्रमी झाल्यावर राज्याभिषेकाचे संस्कार.. हे सगळे सगळे संस्कार जिजाऊंनी दिले आणि स्वराज्य प्रत्यक्षात जन्माला आले..

शिवाजी राजांना संस्कारानी घडवणाऱ्या, संभाजी महाराजांना शास्त्रपंडित पराक्रमी घडवणाऱ्या, जनतेला न्यायाच आणि स्वाभिमानाच स्वराज्य देणाऱ्या, साधुसंताना आणि संस्कृतीला उभारी देणाऱ्या, सह्याद्रीला स्वाभिमानाचा ताठ कणा देणाऱ्या राजमाता जिजाऊंना जन्मदिनी मानाचा मुजरा..

जय जिजाऊ.. जय शिवराय..

जय हिंद.. जय महाराष्ट्र..

डॉ. प्रशांत शिरोडे..

२ टिप्पण्या:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...