..आणि महाराज.



४०० वर्षानंतरही मनात तीच आत्मीयता, तोच स्वाभिमान, तीच राष्ट्रनिष्ठा, तेच स्वराज्य प्रेम.. हे वैभव इतिहासात लाभलं ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना.. महाराजांचं व्यक्तिमत्व त्या काळात किती कर्तृत्वान, प्रभावी आणि दैदिप्यमान असेल जे आजच्या काळात सुद्धा भावून जात.

आज महाराजांवर लिहावंसं वाटलं कारण पण तसंच. काल महाराजांची वेशभूषा करण्याचं भाग्य अजून एकदा नशिबात आलं. महाराजांची वेशभूषा करणं म्हणजे एक जबाबदारी, एक आत्मसन्मान, एक वेगळंच कुतुहूल. स्वराज्यप्रेम आणि स्वराज्यनिष्ठा त्या काळात अनुभवायला भेटली असेल किंवा नसेल पण त्या गोष्टींचा अनुभव ह्या भूमिकेतून अनुभवायला भेटलं. महाराजांचा वेश चढवताना सुद्धा तो पाय पडून चढवला जातो. प्रत्येक गोष्टीत वेशभूषाकार आपलं कलेचं सर्वस्व लावून देतो. मावळ्यांच्या भूमिकेत असणारे आपल्या राजाच्या श्रद्धेपायी स्वतःला त्या भूमिकेतून दाद देताना दिसतात. आणि राहील रसिक मायबापाच, ते तर आपली मराठमोळी अस्मिता आणि त्यात महाराज म्हणजे डोक्यावरच घेतात. तो रसिकांच्या चेहऱ्यावरचा भाव जणू राजदरबाराचा निष्टेचा सहवास दिसत होता. आणि नेहमीप्रमाणे महाराजांच्या भूमिकेला प्रत्क्षात उतरवणं म्हणजे जणू सौभाग्यापेक्षा काही कमी नाही. हे सौभाग्य लाभलं आणि रंगमंचाकडे जाताना स्वतः महाराजच वेशभूषेत सामावून गेलेत आणि पुढे काय झालं ती श्रींची इच्छा होती.

महाराज साकारताना जबाबदारी निभावून नेल्यानंतर जो आनंद असतो तो शब्दात व्यक्त करता येत नाही. त्या वेशभूषेची किमया काही निराळीच आहे. महाराजांवरची गाणी, सर्वांची वेशभूषा आणि रसिकांचा प्रतिसाद मराठी अस्मितेच्या मानबिंदूला जणू प्रत्यक्षात साकारत होती. सगळं सगळं अभूतपूर्व होत...

महाराजांची वेशभूषा नेहमी करायला भेटो, महाराजांच्या संस्कारांचा वारसा नेहमी प्रज्वलित राहो हीच मनोभावे इच्छा. हिंदुस्थानातील जनतेला खरं आणि पहिलं प्रजासत्ताक देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना प्रजासत्ताक दिनी मानाचा मुजरा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...