कृषिकन्या ..




बापाचं काळीज मुलीला समजत हे म्हंटल जात ते काही खोटं नाही. आपला बाप काबाडकष्ट करतो आणि त्या कष्टाला पाहिजेल तसं फळ भेटत नाही, हे नेहमीच झालय हे बघवलं जात नाही. शेतकऱ्याची ५० वर्षांपूर्वी जी स्थिती होती ती आजही तशीच आहे. शेतकऱ्याच्या पोटच्या मुलीला जे कळत ते सत्ताधार्यांना आजपर्यंत का कळलं नाही? का कळूनही त्याला दुर्लक्षित  करण्यात येत? शेतकरी आत्महत्या करतो, शेतकरी आंदोलन करतो, शेतकरी संपावर जातो, पण त्याच्या कुठल्याही मागणीला ठोस पर्याय शोधला का जात नाही?

कृषिकन्या लिहण्याच कारण म्हणजे नगर जिल्ह्यातील पुणतांबा गावातील शुभांगी जाधव, निकिता जाधव आणि पूनम जाधव ह्या शेतकऱ्यांच्या मुलींनी बापाच्या काळजासाठी आणि सरकारने दीड वर्षांपूर्वी शेतकरी संपावर गेलेल्या आंदोलनाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अन्नत्याग केलाय. आज प्रसारमाध्यमात चालू आहे त्यातल्या एका कन्येची तब्येत खूप खालावली आहे, पण तिने दवाखान्यात जाण्यास मनाई केली आहे. इतकं भयानक असतानाही सरकारला अजून जाग येताना दिसत नाही. दुर्दैवच म्हणावं लागेल कि कृषिप्रधान देशात कृषीकन्येला अन्नत्याग करावा लागतोय.

गेल्यावर्षी एका कृषीकन्येने सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना म्हंटल होत "सरकार मायबाप आमचा बाप आमच्या लग्नासाठी तरी जिवंत राहू द्या". लहानपणापासून लेकीच्या लग्नाचं स्वप्न रंगवणाऱ्या शेतकरी बापाला लेकीच्या लग्नासाठी पैसा नसल्यामुळे आत्महत्या करावी लागते हे कृषिप्रधान देशाचं दुर्भाग्य म्हणावं तितकं कमीच. पोटच्या पोरांचं शिक्षण करणं शेतकरी राजाला पैश्यामुळे जमत नाही, पोरांच्या इच्छा, स्वप्न पूर्ण करता येत नाही. सगळं काही जणू जाणूनबुजून शेतकऱ्याच्या उरावर ढकललं जातंय अस समजायला काही हरकत नाही.

जाग येऊ दे मायबाप सरकार, तुमच्या मुली जश्या लाडाकोडात वाढवून त्यांच्या मनातील विश्व दाखवण्याचं स्वप्नं असत तसंच शेतकऱ्याचं  सुद्धा असत. थोडं माणुसकीच्या आरशातून बघा म्हणजे शेतकऱ्यातला माणूस सत्तेपलीकडे तुम्हालाही दिसेल आणि त्या कृषीकन्येची तळमळही कळेल.

डॉ. प्रशांत शिरोडे.

११ टिप्पण्या:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...