शहीद...



काल देशभर प्रेमाची लाट असताना भारतभूमीवर प्रेम करणाऱ्या तिच्या लाडक्या पुत्रांवर आतंकवादाने हल्ला केला. जम्मूकाश्मीरमधील पुलवामाच्या अवंतिपुरा येथील सीआरपीफ च्या जवानांवर अमानुष हल्ला झाला आणि ह्या दुष्कृत्यात भारतमातेच्या ४४ पुत्रांना वीरमरण आलं.

स्वातंत्र्यापूर्वी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आता स्वातंत्र्यानंतरही भारतमातेच्या संरक्षणार्थ अनेकांना आहुती द्यावी लागतेय. भारतीय जवान आपल्या डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस शत्रूराष्ट्रांच्या हालचालींवर लक्ष ठेवून पहारा देत असतात. अनेक सरकार आलीत आणि अनेक सरकार गेलीत पण जम्मूकाश्मीर सारख्या संवेदनशील भागात अशांतता शांत होण्याची चिन्ह काही दिसत नाहीत. राजकारण तर खूप झालं पण आता कृतीची गरज आहे. अजून किती जवान आपल्या प्राणांची आहुती देणार? अजून किती परिवार रस्त्यावर येणार? अजून किती छोटे तान्हुले आपल्या बापाला मुकणार? अजून किती मायबहिणी विधवा होणार? बस आता हे असह्य होतंय... आता हा प्रश्न निकाली काढावा लागणार..

राजकीय शक्तींनी एकत्र येऊन ह्या गोष्टीची दाहकता समजून घेण्याची नितांत गरज आहे. जवान भारतभूमीच संरक्षण करतात, आपण त्यांच्या संरक्षणाची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. अनेक मान्यवरांनी आपल्या भावना प्रखरतेने व्यक्त केल्या, त्यात "आपण सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून या हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ आहे " ह्या राज ठाकरेंनी व्यक्त केलेल्या भावनेची सरकारने आणि सर्व राजकीय पक्षांनी दखल घेणं तितकंच महत्वाचं आहे.

माझ्या भारतभूमीच्या ह्या वीरपुत्रानंच हे वीरमरण आता वाया जायला नको. माझ्या भारतभूमीच्या जवानांना दीर्घायुष्य लाभो आणि असा आघात पुन्हा कधीही न होवो हि ईश्वरचरणी प्रार्थना. कालच्या हल्यात शाहिद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली..

डॉ. प्रशांत शिरोडे.

५ टिप्पण्या:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...