दैवत छत्रपती...



महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज कि ... म्हंटल्यावर आपसूकच हृदयातून "जय" मुखात येणार नाही असा एकही व्यक्ती नसेल. १८ पगड जाती आणि १२ बलुतेदार मिळून स्वराज्य प्रत्यक्षात आणणारे छत्रपती शिवाजी महाराज, म्हणूनच महाराष्ट्रातील मराठमोळ्या माणसाच्या हृदयस्थ आहेत. मातीसाठी लढणारे शिवराय कधीच जातीसाठी लढले नाही कारण स्वराज्य हे अदभूत सुवर्णस्वप्न त्यांना प्रत्यक्षात उतरवायचं होत.

जगाच्या पाठीवर अनेक सम्राट, राजेमहाराजे झाले आणि त्याची दखल इतिहासानसुध्दा घेतली पण ४०० वर्षानंतर आत्मियतेने आणि सन्मानाने ज्यांना रयतेच प्रेम भेटतय ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज होय. असा कुठलाच माणूस नाही ज्याला शिवरायांच्या विचारांचा आदर नाही. ज्यांनी शिवराय जाणले त्यांनी ते हृदयस्थ केले. महाराज देव नव्हते पण देवापेक्षा कमी नव्हते. महाराजांचा आदर्श ज्यांनी मनाशी ठेवला त्याच्या वाटेत अडथळा येणं अशक्य आहे. आपल्या उच्चशक्तीला बळ देण, आपल्यातील कमकुवत बाजूला बलस्थान करण, आलेल्या संधीच सोन करण आणि आपलं स्वप्न पूर्ण होत नाही तो पर्यंत हार न मानणं हे स्वराज्य घडवणाऱ्या शिवरायांकडून शिकाव. शिवाजी महाराजांच्या कुठल्याही एका विचाराला मनस्वी स्वीकारल तरी यशाची पायरी चढायचं सोपं होईल.

आज शिवरायांची जयंती.. शिवजयंती हा उत्सव आहे ज्याला कुठल्या धर्माचं, कुठल्या जातीचं किंवा कुठल्या प्रांताच अधिकारत्व लाभलेलं नाही. आपल्या स्वराज्याच त्या काळी बघितलेलं स्वप्न आजच्या काळातही त्याच सन्मानानं स्वीकारलं जात, पण दुर्दैव म्हंटल तर त्याला तितक्या आत्मियतने आत्मसात करताना दिसत नाही. शिवजयंती हि विचारांची व्हावी, शिवजयंती हि किल्लेसंवर्धनसाठी व्हावी, शिवजयंती स्वराज्य प्रेरणेसाठी व्हावी, शिवजयंती माणुसकीच्या बंधनासाठी व्हावी, शिवजयंती जगाच्या कल्याणासाठी व्हावी...

"स्पर्श" ह्या आजच्या वर्षांपूर्वी सुरु केलेल्या ब्लॉगच्या शृंखलेची अर्धशतक पूर्ण होताना ५० वा ब्लॉग शिवचरणी अर्पण करून छत्रपती शिवरायांना जन्मदिनी मानाचा मुजरा करतो..

जय शिवराय...

डॉ. प्रशांत शिरोडे.

३ टिप्पण्या:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...