मराठी शिववीर..



जय देव, जय देव, जय शिवराया,
या या अनन्य शरणा, आर्या ताराया.
त्रस्त आम्ही, दिन आम्ही, शरण तुला आलो,
परवशतेच्या पाशी, मरणोन्मुख झालो,
साधू परित्राणाया, दुष्कृती नाशाया,
भगवन भगवतगीता सार्थ कराया या...

शिवरायांची आरती??? थोडं आश्चर्यच वाटलं ना..? आपण तर देवाचीच आरती म्हणतो! मग शिवरायांची आरती का? आणि कोणी लिहिली? शिवाजी महाराज दैवत होते का? ह्या साहजिकच पडलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर... देशासाठी स्वतःला वाहून देणाऱ्या सावरकरांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य शौर्यातून प्रभावित होऊन, त्यांच्या कार्याप्रती आदरपूर्वक नतमस्तक होऊन लिहलेली हि भावपूर्ण आरती.

स्वातंत्र्यवीर सावरकर एक स्वातंत्र्यसैनिक, कवी, लेखक, राजकारणी, हिंदुसंघटक आणि साहित्यिक.. आणि त्यांच्या ह्या सर्व गोष्टीत आपला विशेष प्रभाव निर्माण करणार अभूतपूर्व व्यक्तिमत्व.

अरे हा मी शिवाजी महाराजांबद्दल लिहीत  असताना मध्येच स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल लिहायला लागलो. दोन महान व्यक्तींना व्यक्त करताना माझं मन कसं लिहावं? आणि कुठून सुरवात करू? ह्या सारख्या अनेक प्रश्नाच्या शोधात अडकलंय. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर ह्या भारतभूमीच्या दोन महान पुत्रांना शब्दांच्या पुष्पसुमनांनी गुंफण म्हणजे महान यशोगाथेचा गौरव करणं...

माझ्या मराठी बोलू कौतुके,
परी अमृतातही पैजा जिंके,
ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. .

संत ज्ञानेश्वरांच्या मराठी भाषेबद्दल कौतुकाच्या ओळींना खरं ठरवलं शिवाजी महाराजांनी. परकीयांच्या आक्रमणामुळे मराठी भाषेत अनेक उर्दू शब्द वापरण्यात येत असताना मराठी भाषेचं प्रथम शुद्धीकरण करून तिला राजभाषेचा दर्जा दिला. सावरकरांनी महाराजांचा हाच आदर्श समोर ठेवून मधल्या परकीय आक्रमणातून मराठी भाषेला शुद्धीकरण करून मायमराठीचा सन्मान मिळवून दिला. माझ्या मराठी भाषेला जरी राजकीय दृष्टया अभिजात दर्जा मिळत नसेल तरी ह्या दोन माहात्म्यांमुळे ती आजतागायत अभिजातच आहे.

महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलेल्या रत्नानंच कौतुक करावं तितकं कमीच. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापून परकीयांची आक्रमण उधळवून लावली. सावरकरांनी अन्यायाला वाचा फोडत पारतंत्र्यातून भारतभूमीला मुक्त करण्यासाठी इंग्रजांची सत्ता हलवून लावली.

शिवाजी महाराज म्हणजे शौर्याचा सूर्य तर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे क्रांतीचे सागर. शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्यसंस्थापक, तर  स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे स्वातंत्र्ययोद्धा. शिवाजी महाराज म्हणजे पराक्रमाची यशोगाथा, तर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ. शिवाजी महाराज म्हणजे दैवत..तर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे दैवताची सावली...

देव, देश आणि धर्मासाठी आपल्या पराक्रमाची परिसीमा पार करणारे शिवाजी महाराज अनेकांना आदर्शस्थानी आहेत आणि त्या आदर्शांना जपणारे सावरकरांसारखे महान व्यक्ती ह्या भूमीत जन्माला आलेत ते ह्या भूमीच भाग्यच म्हणावं लागेल.  सावरकरांनी आयुष्य जगताना शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून भारतभूमीला परकीयांच्या गुलामगिरीतून मूक्त केल. आदर्शांचा महामेरु शिवाजी महाराज आहेत आणी ह्या आदर्शांना प्रत्यक्षांत आत्मसात करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. भारतभुमीला लाभलेली ही शूरवीरांची श्रुंखला नेहमीचं आदर्शस्थानीं राहों हिच मराठी भाषा दिनी शिवचरणी प्रार्थना. मराठी भाषा दिनाच्या मनोभावे
शुभेच्छा...

जय हिंद.. जय महाराष्ट्र..

डॉ. प्रशांत शिरोडे.

३ टिप्पण्या:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...