अभिनंदन ...


मिराज, एफ-१६, मिग-२१ हे शब्द दोन दिवसापासून सारखे कानावर पडतायेत. त्याच कारण पण तसंच, नुकतंच भारतीय वायू दलाने केलेलं "एअरस्ट्राईक". एअरस्ट्राईक म्हणजे  परकीय विघातक भूमीवर वायू दलाने मानवी जीवनाच्या उत्कर्षासाठी केलेला हल्ला. भारतीय वायू दलाने पाकिस्तानी जैश ए मोहंमद ह्या अतिरेकी संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रावर पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन केलेला हल्ला.

भारताच्या ह्या नैतिक हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून पाकिस्तानकडून दुसऱ्या दिवशी भारतीय हद्दीत येवून बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न भारतीय वायू दलाने हाणून पाडला. ह्या हल्यात पाकिस्तानच एफ-१६ हे विमान पाडण्यात भारताला यश येताना वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान चालवत असलेलं मिग-२१ विमान निकामी झाल्यामुळे ते पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पडले. युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तानात पडणं म्हणजे नरकात जाण्यापेक्षा कमी नव्हत. आणि झालंही तसंच पाकिस्तानच्या हद्दीत पडल्यावर अभिनंदन यांनी सभोतालचे लोक बघितले तर ते वेशभूषेने वेगळे जाणवल्यानंतर त्यांनी समयसूचकता दाखवून "जय माता दि" हा जयघोष केला. ह्यानंतर स्थानिक लोकांच्या भावमुद्रा बघून आपण भारतात नसल्याचं समजून घेतल, त्यानंतर स्थानिक लोकांनी त्यांच्यावर चालून जाण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी आपल्या बंदुकीतून एक राऊंड फायर करून तिथून पळ काढला. आपल्याकडील दस्तऐवज आणि माहिती पाकिस्तानच्या हाती लागू नये म्हणून जवळ असलेली कागद स्वतः खाऊन घेतली आणि राहिलेली कागद नदीत फेकून दिली आणि मगच  स्वतःच समर्पण केलं. ह्या कठीण परिस्थितीत हि समयसूचकता दाखवणं तितकंच कौतुकास्पद आहे. त्यानंतर त्यांना स्थानिकांच्या आणि पाकिस्तानी सैन्याच्या अमानुष रोषाला समोर जावं लागलं. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलं आणि त्यांची विचारपूस चालू केली. अशा परिस्थितीत आपलं नाव आणि सैन्यदलाचा नंबर ह्याशिवाय दुसरी कुठलीय माहिती न देण्याचं धाडस अभिनंदन यांनी दाखवलं.

आताच थोड्या वेळापूर्वी अभिनंदन ह्यांना पाकिस्तानने ६० तासानंतर भारताच्या स्वाधीन केल. आतापर्यंतच्या भारतीय युद्धकारवाईत युद्धकैद्याला हस्तांतरित करण्याची हि सर्वात वेगवान कारवाई झाली. पाकिस्तानने ह्या हस्तांतराची कारवाई हि जिनेव्हा जागतिक करारानुसार केली. ह्या करारानुसार युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थितीत समोरच्या भूमीत कुठला सैनिक युद्धाच्या हालचालीत अडकला असेल तर त्याला योग्य ती वागणूक देऊन सात दिवसाच्या आत त्याच्या देशाकडे सोपवन बंधनकारक आहे अन्यथा युद्ध अटळ असत. ह्याच नियमाच्या आधारे अभिनंदन ह्यांना भारताकडे सोपवण्यात आलं.

अभिनंदन पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असताना आपल्या नाव आणि नंबर ह्याशिवाय कुठलीही माहिती न देता आपलं धाडस दाखवत असताना आपल्या येथील अतिउत्साही आणि मूर्ख प्रसारमाध्यम त्याच घर, परिवार, सैन्याची माहिती जगासमोर आणताना दिसत होते. २६/११ च्या मुंबई हल्यात ह्या प्रसारमाध्यमांच्या मुर्खपणामुळे मोठी किंमत चुकवावी लागली असताना आपल्या अतिशहाणपणाचा कळस प्रसारमाध्यमांनी पुन्हा गाठला होता. ह्या वर निर्बंध असणं आवश्यक आहे जेणेकरून सैनिकांचं संरक्षण होणं सोपं होईल.

असो अश्या परिस्थितीत पाकिस्तानातून परतणं म्हणजे दुसरा जन्म झाल्यासारखाच आहे. साऱ्या देशाचं लक्ष लागलेला क्षण म्हणजे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतभूमीत पुन्हा भारतमातेच्या सेवेसाठी दाखल होणार आणि सर्व भारतीयांना त्याचा अभिमान वाटणार. आंतरराष्ट्रीय दबाव असो, तमाम भारतीयांची प्रार्थना असो वा सरकारच्या मुत्सदगिरीच यश असो अभिनंदन भारतात येणं महत्वाचं होत. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच मनापासून मायभूमीत स्वागत आणि अभिनंदन..

जय हिंद.. जय महाराष्ट्र..

डॉ. प्रशांत शिरोडे.

५ टिप्पण्या:

  1. खूप छान मांडणी..!
    अभिनंदन यांना शुभेच्छा आणि आमच्या मायभुमितला निनाद मांडवगडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!
    त्या चिमुकलीच्या " तू परत कधी येणार बाबा?" या प्रश्नाचं उत्तर मिळता मिळतं नाही आहे. सर्वांना शोधावं लागेल..!
    जय हिंद

    उत्तर द्याहटवा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...