लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्प्याच्या तोफा थंडावत असताना २०१९ निवडणूक एका वेगळ्या टप्प्यावर येवून ठेपली आहे. प्रचाराच्या विविध माध्यमातून, शैलीतून आपली बाजू जनमाणसांना पटवून देण्याचं काम नेहमीसारखं केलं जातंय.. कुणी भक्तीत दंग तर कुणी समजावण्यात दंग..
देशाने ६० वर्षाचा काळ काँग्रेस बरोबर अनुभवल्यानंतर अटलजींनंतर भाजपचा प्रतंप्रधान विकासाच्या आणि देशहिताच्या मुद्यांवर निवडून दिला. बोलता बोलता पाच वर्ष संपलेत पण बोलल्या गेलेल्या शब्दांची जणू बाजूच पलटली. भाजपकडून प्रचारात विकास काम आणि काँग्रेसविरहित सरकारची भूमिका मांडणं अपेक्षित असताना ३० वर्षांपूर्वीच्या मुद्यांना आणि गांधी घराण्याच्या टीकेची साद घ्यावी लागते हे बदलेल्या राजकारणाला जणू पुन्हा त्याच जागेवर आणून ठेवल्याचं दिसतंय. दुसरीकडे काँग्रेसकडे असलेल्या दीर्घ अनुभवाचा पुन्हा एकदा काश्मीर सारख्या मुख्य मुद्यात असलेला विचार जणू सामान्यांना विकासाच्या मुख्य वाटेपासून दूर नेताना दिसतोय. एकाने फेकावं आणि दुसऱ्याने सोडावं जणू लोकशाहीचा तमाशाच मांडलाय.
गेल्या आठवड्यात गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी मुद्देसूद भाषण, त्याची खरी मांडणी आणि दोन वेगळ्या परिस्थितीची चित्रफितीद्वारे दाखवलेली संकल्पना जणू नवराजकारणाची नांदीच होती. सामन्यांची होणारी फसवणूक आधीपण आणि आजपण तशीच आहे हे सत्यस्थितीवर पटवून देण्यात त्यांनी योग्य पद्धतीने जनतेला भाषणातून सांगितलं. हे सत्य कदाचित भरपूर कार्यकर्त्यांच्या पचनी पडणार नाही हे मात्र निर्विवाद सत्य आहे..
नव्या राजकारणाच्या नांदीवर लोकशाही कशी बळकट होईल, विकास खरंच कसा होईल, देश एकसंघ कसा राहील ह्या गोष्टींना ध्यानात घेणं महत्वाचं आहे.
फेकणाऱ्याने शब्द फेकत जावे,
सांगणाऱ्याने शब्द सांगत जावे,
सामान्यांनी शब्दामध्ये रोजच मरत जावे,
लोकशाहीचे हाल शब्दातूनच होत जावे..
नवराजकारणाची नांदी हि विकासासाठी, सत्यासाठी, देशहितासाठी आणि लोकशाहीसाठी महत्वाची आहे. फेकणारे, सांगणारे त्यांचं काम करतील, नमो आणि रागा ह्या मुर्खांच्या बाजारात न पडता विकास आणि नैतिकतेच्या जोरावर स्थानिक व्यक्ती पाहूनच मतदान करावं. आणि हे नसेल तर नोटा आहेच.. चला नवराजकारणाची नांदी ओळखूया आणि लोकशाहीला बळकट करूया...
डॉ. प्रशांत शिरोडे..
Khup Chan prashant 1no 👍👍👍
उत्तर द्याहटवा