राजपर्व..


लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्प्याच्या मतदानाचा दिवस उजाडताना देशासह महाराष्ट्र प्रचाराने आणि अनेक सभांनी नवनवीन शैलीत रोमांचक होवून गेला. एक नवीन राजकारण महाराष्ट्र बघताना तरुण शिक्षित मतदारांना चालूघडामोडी आणि देशाची आगामी होणारी वाटचाल खऱ्या आत्मीयतेने पटवून देण्याचा एक प्रयत्न करण्यात येतोय. जे कोणाला जमलं नाही, जे कोणाला जमत नाही, जे कोणाला जमणारही नाही, असं एक नवीन राजकारणाचं पर्व जनतेसमोर आणणारा विचारी आणि अभ्यासू नेता म्हणजे "राज ठाकरे" आणि त्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण सभांच्या माध्यमातून एक राजकारणातील नवीन पर्व सुरु केलं ते म्हणजे "राजपर्व".

कदाचित माझ्या ह्या स्तंभाला राज ठाकरे समर्थक म्हणून ठरवलं जाईल पण जे मांडतोय ते अराजकीय विचाराने मांडतोय. २०१४ च्या निवडणुकात ६० वर्षाच्या काँग्रेसच्या सत्तेला कंटाळून एक नवीन सत्ताकेंद्र देशाने उभं केलं आणि त्यांनी दाखवलेल्या स्वप्नांना सत्तेच्या माध्यमातून बळ दिल. स्वप्न स्वप्नचं राहिली, नोटबंदी, जीएसटी, स्वच्छ भारत, स्टार्ट अप इंडिया, मेड इन इंडिया, स्मार्ट सिटी, आधार अश्या अनेक स्वप्नाचा खेळ मांडल्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या मतदानापर्यंत सत्ताधारी पक्षाकडून एकही शब्द आपल्या प्रचारातून न निघता निर्लजपणे देशाच्या जवानांच्या जोरावर देशाला गृहीत धरून मत मागितलं जाताना देशाला अंधारात लोटलं जातंय. मी विकास केला ह्या गोष्टीला जनतेसमोर आणायला हिंमत लागते आणि त्याच प्रेसेंटेशन म्हणजेच सादरीकरण देशात पहिल्यांदा गेल्या विधानसभा निवडणुकात मांडणारा पहिला नेता म्हणजे राज ठाकरे.. आजपर्यंतच्या इतिहासात विकासावर इतकं ठामपणे मत मांडणारा नेता भारतीय राजकारणाला लाभला नाही.

देशाचे प्रंतप्रधान, हेकेखोर शाही विकासाच्या जोरावर मत मागताना दिसत नाहीत. देशाच्या सर्वोच्च स्थानी बसल्यावर, जनतेला दाखवलेल्या स्वप्नापैकी एकही स्वप्न पूर्ण न झाल्याने जवानांच्या प्रतिमेला पुढे ठेवून देशाची भूल करतायेत, हेच राज ठाकरे भारतीय राजकारणाला नव्या वळणावर नेताना ह्याच नेत्याच्या आधीच्या आणि आताच्या व्हिडिओतून जनतेसमोर सादर करत आहेत. ह्या नवीन राजपर्वातून भारतीय राजकारणात जनतेला खोट बोलून गृहीत धरण्याचा प्रयत्न पुढील काळात होणार नाही हेच ह्यातून साध्य होईल. "ये तो लावरे व्हिडीओ" असं ऐकल्यावर सत्ताधाऱ्यात धडकी भरली जातेय म्हणून खडसे सोमय्याच्या झालेल्या स्थितीत शिक्षणाचा विनोद केलेलं मंत्री उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत. मराठी असून स्वाभिमान नसणारे खऱ्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी केविलवाणे स्वतःची समजूत काढण्यासाठी, एक उमेदवार नाही दिला पण सभा घेत आहेत अश्या नैराश्याच्या माध्यमातून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतायेत.

आपल्या सभेची उत्कृष्ट मांडणी, रक्तात असलेलं संभाषण कौशल्य, सविस्तर अभ्यास, पहिल्या खुर्ची पासून तर शेवटच्या माणसापर्यंत शब्दन शब्द पोहचवण्याची पद्धत, एकही उमेदवार उभा न करता जनतेत जावून विरोधकांपेक्षा मोठ अस्थित्व निर्माण करून देशाला नवीन राजकीय पर्व प्रस्थापित करताना एक उत्कृष्ट प्रयत्न म्हणजे राजपर्व.... देशाला ह्या विचारांच सोनं मिळेल नाही मिळेल, पण शिवरायांच्या महाराष्ट्रभूमीला आगामी विधानसभेत स्थान भेटो हीच शुभेच्छा ...

डॉ. प्रशांत शिरोडे.

३ टिप्पण्या:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...