'राज'कारण...



लोकसभेच्या तिसऱ्या टप्याच्या मतदान करायला जाताना भारतीय राजकारणाच्या पाऊलखुणांना जरा डोकावून बघत असताना, राजकीय क्षितीजाच्या पलीकडे देश कसा आहे हे बघणं तितकंच महत्वाचं आहे. काँग्रेसची ५० वर्ष, भाजपाची १० वर्ष हा मुख्य केंद्रीय सत्येचा कालखंड.

२०१९ लोकसभा मतदान म्हणजे देशाच्या एका निर्णायक टप्प्यावरच मतदान. काँग्रेसने ५० वर्षाची सत्ता भोगताना देशाचा विकास करत असताना आपलं राजकीय अस्थित्व लोकांना गृहीत धरून चालूच ठेवलं. विकासाचा दर बघता भ्रष्टाचाराचा दरही तितकाच वाढल्यामुळे, विकास पूर्णपणे होण्यासाठी सत्तापरिवर्तन झालं. एक कुटुंबाभोवती सत्तेचं केंद्रीकरण असल्यामुळे राजकीय दृष्ट्या दिल्लीतून निर्णय होणं राज्यिय राजकारणासाठी तितकस ठीक नव्हतं. पारतंत्र्यानंतर देश उभारण्याची जबाबदारी पेलत असताना देशाच्या सुरक्षितेला पाहिजेल तेवढ लक्ष देता आलेलं दिसत नाही. देशद्रोह, ३७० ह्या गोष्टींवरच भाष्य हे संघीय राजकारणाच्या दृष्टीने घातक आहे. जातीय राजकारण अप्रत्यक्षपणे करण्याचं काम ह्या काळात नक्कीच झाल, पण देश एकसंघ ठेवण्यात तितकच यशस्वी राजकारण काँग्रेसने राजकीय पटलावर केलं.

भ्रष्टाचाराला कंटाळून देशाच्या खुंटलेल्या विकासाला चालना देण्यासाठी २०१४ साली विकासाच्या स्वप्नांसाठी सत्तापरिवर्तन झालं ते भाजपच्या माध्यमातून. स्वप्नाच्या पूर्ततेसाठी कासावीस झालेल्या देशाला स्वप्नांची मेजवानीच दाखवण्यात आली आणि बोलता बोलता ५ वर्ष झाली पण स्वप्न स्वप्नच राहिली. विकासाच्या जोरावर सत्तेच्या खुर्चीला चिकटलेल्या भाजपनेही जनतेला गृहीतच धरलं. ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करताना आपण आणलेल्या एकही योजनेचं स्पष्टीकरण न देणार सरकार भावनिक आव्हान करून देशाला पुन्हा त्याच वाटेवर नेताना दिसतंय. गेली ३० वर्ष धर्माच्या राजकारणावर राममंदिर हे आश्वासन पुन्हा एकदा आपल्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध करताना देशाला त्याच आशेवर पुन्हा नेताना दिसत आहे. विकासाची पायवाट विसरून जातीच्या राजकारणातून देशाची दिशाभूल करण्याचा अनोखा प्रयत्न करणं तितकंच लज्जास्पद आहे. लोकशाहीच्या मूलभूत स्तंभांच विकेंद्रीकरण करताना देशाला पुन्हा एकदा गृहीत धरल्याचं दिसतंय..

राजकारणाचा एक नवा अध्याय समोर आणताना देशाची गरज ओळखून गेल्या लोकसभेचे स्वप्नाचं खरं चित्र राजकीय निष्टेतून महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या माध्यमातून बघायला भेटलं. राजकीय नेतृत्व देशाला गृहीत कस धरत ते प्रकर्षाने राजकीय पटलावर यशस्वीपणे उमटवल.जनतेला दिलेली आश्वासन, स्वप्नातील विकास हा सार्वजनिक माध्यमातून पुढे कसा येतो ह्याच उत्तम 'राज'कारण करताना सत्ताधाऱ्यांची झोप मात्र नक्कीच उडवली.

राजकीय पट्टालावरचे डावपेच सामान्यांनी ओळखून, २०१९ च्या लोकसभेला आपलं मत देशाच्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी, खऱ्या विकासासाठी आणि सर्व राज्यांच्या विकासासाठी टाकावं..

डॉ. प्रशांत शिरोडे.

४ टिप्पण्या:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...