'मत'दान..





लोकशाहीच्या १७ व्या लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाचा आजचा दिवस. मुंबईसह महाराष्ट्रातील  अनेक ठिकाणी होणाऱ्या निर्णायक लढतीचा आजचा दिवस. सत्तेचं निर्णायक मत उत्तरप्रदेशानंतर देणार राज्य म्हणजे महाराष्ट्र. लोकसभेच्या निर्णयाला आणि भारतीय व्यवस्थापानेला बळकट करणार राज्य म्हणजे महाराष्ट्र.

शेवटच्या टप्यात मतदानाला जाताना लोकशाही बळकट आणि टिकून राहण्यासाठी ह्यावेळेचं मतदान. विकासाच्या खऱ्या स्वप्नांसाठी आणि त्यांना प्रत्यक्षात बघण्यासाठी ह्यावेळेचं मतदान. जातीच्या राजकारणाला छेदून राष्ट्रीय ऐक्यासाठी मतदान. लोकशाहीतील लोकहितासाठी लोककल्याणासाठी ह्यावेळेचं मतदान. राजीय नाही तर राष्ट्रीय विकासासाठी मतदान.

सत्तेच्या चाव्या सांभाळताना जनतेला गृहीत न धरणाऱ्या सत्ताधीशांना त्यांच्या चुकांची जाण करून देणारा हा महोत्सव. आंतरराष्ट्रीय स्थराबरोबर राष्ट्रीय स्थर तितकाच महत्वाचा असताना देशाला बळकट करण्यासाठी लोकशाहीचा हा महोत्सव. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत एकसंघ राष्ट्रासाठी आणि समांतर विकासासाठी हा महोत्सव. दाखवलेली स्वप्न आणि त्याची केलीली पूर्तता ह्याच मूल्यमापन करणारा महोत्सव..

महाराष्ट्राने नेहमीच निर्णायक पाऊलांची वाट दाखवली आहे. अन्यायाला वाचा, विकासाला साथ, सर्वोत्तम योगदान अश्या अनेक माध्यमातून देशाला बळकट केलंय. चला देशाला एका योग्य क्षितिजावर घेऊन जाण्यासाठी मतदान करू या.. महाराष्ट्र भूमीची परंपरा टिकवूया.

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...