महापूर ..



सांगली, कोल्हापूर ह्या दोन जिल्ह्याना महापुराच्या संकटाचा विळखा अजून काही सुटत नाही.. काही दिवसापूर्वी दुष्काळाचं संकट महाराष्ट्रभूमीवर असताना आता ओला दुष्काळ काही भागात पडलाय.. सगळ्यांची नजर ह्या तिन्ही जिल्ह्यांच्या पुराकडेच.. कधीकाळी २००५ मध्ये पाण्याचा कहर झाल्यानंतर आता आलेला हा महाप्रलय जणू होत्याच नव्हतं करून गेला..

लाखो लोकांना ह्या संकटातून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात प्रशासनाला आणि मदतीला धावून आलेल्या सर्वाना यश आलं. ह्या मदतीच्या कार्याला थोडं गालबोट लागला आणि काही निरपराधांना ह्या निसर्ग प्रलयात आपला जीव गमवावा लागला. जीवाचा हा खेळ थांबता थांबेना कारण वरुणराजाचं हे बरसलेलं रूप महाकाय होत, ते सावरायला अजून थोडी प्रतीक्षाच करावी  लागेल. काही ठिकाणी अजून मदत पोहचू शकलेली  नाही तरी भारतीय सैनिक, नौदल, महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्राचे सुपुत्र तिथे पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारतीय सैनिक आणि सर्व मदतीला धावून येणारे जणू परमेश्वराचे अवतार असल्याचं पुरग्रस्तांची स्वाभाविक प्रतिक्रिया येत आहे. ऐका चित्रफितीत  "सुजाता अंबी" नावाची महिला सुरक्षित वाचल्यानंतर जवानांचा पाय पडताना दिसत आहे. तिची प्रतिक्रिया हि जणू परमेश्वराच रूपच बघितल्यासारखं आहे. सर्व पूरग्रस्तांना जवानांची हि मदत बघून जणू तेच परमेश्वराचे रूप आहेत हि भावना आहे. त्यांच्या मते "मंदिर मज्जीद सब डूब गये, भगवान वर्दी मी घूम रहे". ह्या सर्व सैनिकांना पूरग्रस्त महिलांनी राखी बांधून आपली प्रेमाची भावना व्यक्त केली.

महाराष्ट्र एकीकडे कोरड्या दुष्काळाने होरपळत आहे आणि दुसरीकडे महापुरात भिजत आहे. हि सर्व काही वरुणराजाची इच्छा. महापुराच्या ह्या ओघात सर्व परिस्थिती विस्कटलेली असताना आता मदतीचा महापूर येऊ दे हेच सर्व महाराष्ट्रीय जनतेला आव्हान..

डॉ. प्रशांत शिरोडे.

२ टिप्पण्या:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...