प्रवास चांद्रयानाचा ..


आज मध्यरात्री सुमारे २ वाजेच्या दरम्यान चांद्रयान २ चांदोमामाच्या दुनियेत पोहचणार होत. ५५ दिवसाच्या यशस्वी प्रवासानंतर व्यवस्थितरीत्या चांद्रयान चंद्रावर पोहचण्याचा प्रवास करत होता. भारतीय अंतराळ केंद्र म्हणजे इसरो च्या बंगळुरू केंद्रातून सर्व शास्रज्ञ, प्रतप्रधान आणि सर्व अंतराळ प्रेमी ठरल्या वेळाप्रमाणे चांद्रयानावर आपला डोळा लावून बसले होते.

रात्रीचा तो क्षण काही वेगळाच होता, जस चांद्रयान चंद्राच्या जवळ जवळ जात होत तसं शास्त्रज्ञाचा आनंद वाढत होता. अगदी २.१ किलोमीटर वर चांद्रयान येईपर्यंत सगळं अलबेल होत आणि अचानक चांद्रयानाशी अंतराळ केंद्राचा संपर्क तुटला. सगळी कडे काही क्षणापुर्वी असलेलं आनंदाचं वातावरण चिंतेत बदललं. होत्याच नव्हतं झालं.. साऱ्या जगाचं लक्ष लागलेली मोहीम अचानक स्तब्ध झाली. रात्रभर जागून प्रयत्नांची पराकाष्टा करत चांद्रयानावर माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न चालू होता आणि तो अजूनही चालू आहे.

जागतिक स्थरावर चंद्रावर अशी मोहीम करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीन नंतर चौथा देश होता. सर्वात कमी खर्चात हि मोहीम हाती घेण्यात आली होती. दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरणार होता. गेल्या १० वर्षांपासून हि मोहीम हाती घेण्यात आली होती..

चांद्रयान २ हि मोहीम तशी खूप रहस्यमय होती. चांद्रयान अवघ्या २.१ किलोमीटरवर चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचण्यापासून संपर्कातून तुटला.. जणू काल्पनिक गोष्टीसारख्या चांदोमामाच्या कुशीत तो माहिती देण्याचं विसरला...असो.. प्रतप्रधानांनी शास्त्रज्ञांचं मनोबल वाढवून संबोधीत करताना "प्रयोग हा प्रयोग असतो अपयश नसतो..". प्रतप्रधान इसरो केंद्र सोडत असताना इसरो प्रमुख डॉ. के. शिवन प्रंतप्रधानांच्या गळ्यात पडून आपले आसू अनावर करू शकले नाही...सगळं भावनिक वातावरण झाल होत. असो.. तरीहि हि मोहीम इसरो ह्या भारतीय अंतराळ संस्थेला एक विशेष स्थरावर घेऊन गेली. सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन आणि भावी वाटचालीस भारतीयांच्या शुभेच्छा...

डॉ. प्रशांत शिरोडे..

५ टिप्पण्या:

  1. प्रशांत शास्त्रज्ञांनी खूप चांगले प्रयत्न केले.भावी वाटचालीसाठी सर्व शास्त्रज्ञांना मनापासून शुभेच्छा.जय हिंद.जय जवान,जय किसान,जय विज्ञान .

    उत्तर द्याहटवा
  2. सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन����

    उत्तर द्याहटवा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...